जळगाव दि. 5 ( जिमाका ) - जिल्ह्यातील 12 हजार 508 शेतकऱ्यांनी ई -केवायसी चे प्रमाणिकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरुन अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यासाठी गावस्तरावरील तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांच्यामार्फत ई- केवायसी करण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न करण्यात आले होते. तरी देखील अदयापही शेतकऱ्यांनी e-KYC न केल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचीत आहे. त्या सर्वांनी ई -केवायसी करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील सन 2022 पासून शेतीपिकाच्या नुकसानीचे
अनुदान वितरित करण्यासाठी वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार
2 लाख 13 हजार 416 शेतकऱ्यांना शासनस्तरावरुन डीबीटी प्रणालीद्वारे जवळपास 244 कोटी अनुदान वाटप करण्यात आलेले आहे.मात्र जिल्ह्यातील
12हजार
508 शेतकऱ्यांनी ई - केवायसी चे प्रमाणिकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरुन अनुदान
मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यासाठी गावस्तरावरील तलाठी,
कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांचेमार्फत ई - केवायसी करण्यासाठी यापूर्वी प्रयत्न करण्यात
आले आहे. तरी देखील अद्यापही काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी ई - केवायसी न केल्यामुळे
अनुदानापासून वंचीत आहेत.
विशेषत: माहे जानेवारी 2024 ते माहे मे 2024 या कालावधित
जिल्ह्यातील भडगाव, मुक्ताईनगर, पारोळा ,अमळनेर व जामनेर या तालुक्यात अवेळी पावसामुळे
शेती पिकाच्या नुकसानपोटी 5हजार 854 शेतकऱ्यांनी ई- केवायसी प्रमाणीकरण केले नसल्यामुळे
शासन स्तरावरून अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करता
आले नाही.
तरी संबंधित शेतकरी यांनी सी एस
सी केंद्र व महा ई सेवा केंद्र येथे जाऊन ई - केवायसी करावे व आपले शेतपिकाच्या नुकसानीचे
अनुदान त्वरीत प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन सर्व संबंधित शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी,
जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.
०००००००
No comments:
Post a Comment