• जिल्ह्यातील हतनुर, गिरणा व
वाघूर या मोठ्या प्रकल्पांत 36.17 टीएमसी उपयुक्त साठा
• मध्यम प्रकल्पांमध्ये 7.02 टीएमसी तर लघु प्रकल्पांमध्ये 5.52
टीएमसी उपयुक्त साठा
• अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर,
अंजनी, मन्याड, बोरी
या मध्यम प्रकल्पांमध्ये 100 टक्के
उपयुक्त साठा
• गुळ प्रकल्पात 90.42 टक्के तर भोकरबारी प्रकल्पात 53.36 टक्के
उपयुक्त साठा.
• अभोरा, मंगरुळ, सुकी, अग्नावती, तोंडापूर, अंजनी, बोरी, मन्याड
या प्रकल्पांच्या
सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु
जळगाव,
दि. 2 - जिल्ह्यातील गेल्या काही दिवासांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे
धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व
वाघूर हे तीनही मोठे प्रकल्प 100 टक्के भरले असून यामध्ये 36.17 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
तर जिल्ह्यातील 13 मध्यम प्रकल्पांपैकी 11 प्रकल्प 100 टक्के भरले असून या मध्यम
प्रकल्पांमध्ये 7.02 टीएमसी तर लघु प्रकल्पांमध्ये 5.52 टीएमसी असा एकूण 48.71
टीएमसी उपयुक्त साठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी जिल्ह्यातील विविध
प्रकल्पांमध्ये फक्त 734.98 दलघफु म्हणजेच 25.95 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक
होता. यावर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात
हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर,
अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा
मध्यम प्रकल्प आहे. तर 96 लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय
उपयुक्त साठा 1427.51 दलघमी म्हणजेच 50.40 टीएमसी इतका आहे. त्यानुसार जिल्ह्यातील
प्रकल्पांमध्ये आजपर्यंत 96.63 टक्के इतका उपयुक्त साठा शिल्लक आहे.
हतनूर
धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे 2 गेट 3 मीटरने उघडण्यात आले असून
धरणातून 16 हजार 545 व्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर गिरणा धरणाचे 6 गेट 2.75 मीटरने उघडण्यात आले
असून धरणातून 70 हजार व्युसेक वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच
वाघूर धरणाचे 10 गेट 0.20 मीटरने उघण्यात आले असून धरणातून 6751 व्युसेक वेगाने
पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्याचबरोबर बोरी धरणाचे 3 गेट 0.15 मीटरने उघडण्यात आले
आहे. अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यातील
मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 1027.10 दलघमी म्हणजेच 36.26 टीएमसी
इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 1024.30 दलघमी म्हणजेच 36.17 टीएमसी उपयुक्त
साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात 8.91 टीएमसी, गिरणा 18.49 टीएमसी, तर वाघूर धरणात 8.78
टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. यावर्षी आजपर्यंत हतनूर धरण क्षेत्रात 1111 मिमी,
गिरणा धरण क्षेत्रात 1005 मिमी तर वाघूर धरण क्षेत्रात 1220 मिमी इतका पाऊस
पडल्याची नोंद झाली आहे.
तसेच
जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 203.91 दलघमी म्हणजेच 7.20
टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 168.98 दलघमी म्हणजेच 7.02 टीएमसी इतका
उपयुक्त साठा आहे. तर जिल्ह्यातील लघु प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 196.50
दलघमी म्हणजेच 6.93 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 156.36 दलघमी
म्हणजेच 5.52 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.
जिल्ह्यातील
तेरा मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरुळ,
सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, मन्याड, बोरी हे अकरा मध्यम
प्रकल्प 100 टक्के भरले आहे. तर गुळ प्रकल्पात 90.42 टक्के तर भोकरबारी प्रकल्पात
53.36 टक्के उपयुक्त साठा आहे. तर अभोरा, मंगरुळ,
सुकी, अग्नावती, तोंडापूर, अंजनी, बोरी, मन्याड या प्रकल्पांच्या सांडव्यातून
पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
000
No comments:
Post a Comment