Tuesday, 13 October 2020

शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखीव ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

             जळगाव, (जिमाका) दि. 13 - चालू हंगामात सोयाबीन पिकाची काढणी सुरु आहे, सोयाबीन पिकाची मळणी शक्य असल्यास घराच्या घरी हाताने करावी अथवा मळणी यंत्राचा वापर करतांना यंत्राचे फेरे (आयपीएम) 350 ते 450 पेक्षा अधिक असू नये. यामुळे बियाण्यास ईजा होणार नाही व बियाण्याची गुणवत्ताही चांगली राहील. तसेच साठवणूक करतांना सोयाबीन बियाणे थप्पीची उंची 7 फुटापेक्षा जास्त ठेऊ नये. सोयाबीन बियाण्याचे कवच नाजुक असल्यामुळे कमीत कमी हाताळणी करावी. तसेच पुढील खरीप हंगाम 2021 मध्ये लागवडीसाठी कमीत कमी 100 किलो सोयाबीन बियाणे यामधुन राखीव ठेवावे. असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

            या गोष्टीचा अवलंब केल्यास शेतक-यांना बियाण्याचा तुटवडा भासणार नाही. पुढील हंगामासाठी उत्कृष्ठ प्रतीची उगवण क्षमता असणारे बियाणे जतन करुन ठेवता येईल. यासाठी शेतकरी बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

No comments:

Post a Comment