जळगाव, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) - शेतक-यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतक-यांचे आर्थिक र्स्थेर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल. त्यासाठी राज्यात प्राधान्याने प्रधानमंत्री फसल बीमा योजना राबविण्यात येत आहे.
योजनेची वैशिष्टे -
सन 2020-21 पासून योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे. जास्तीत जास्त शेतक-यांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतक-यास अधिसुचित फळपिकासाठी 4 हे. क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा असून या योजनेतील जोखमीच्या बाबी - मोसंबी पिकासाठी अवेळी पाऊस/जास्त तापमान/जास्त पाऊस/गारपीट. डाळिंब पिकासाठी जादा तापमान/जास्त पाऊस व आर्द्रता/गारपीट. केळी पिकासाठी - कमी तापमान/वेगाचा वारा/जादा तापमान. आंबा पिकासाठी अवेळी पाऊस/कमी तापमान/जास्त तापमान. मोसंबी व केळी पिकासाठी 31 ऑक्टोबर तर आंबा व डाळिंब पिकासाठी 31 डिसेंबर, 2020 ही सहभागाची अंतिम मुदत आहे.
पिकनिहाय विमा हप्ता दर व संरक्षित रक्कम - मोसंबी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रुपये - 80,000 शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम ( रु) हे. 4,000/-, डाळिंब पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रुपये - 1,30,000/- शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम (रु) हे. 6,500/- केळी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रुपये - 1,40,000/- शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम (रु) हे. 7,000/- आंबा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रुपये - 1,40,000/- शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम (रु) हे. 7,000/- इतकी आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी योजना कार्यान्वयीन करणारी यंत्रणा ही बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि. बजाज अलायन्स हाऊस, एअरपोर्ट रोड, येरवाडा, पुणे- 411 006, दुरध्वनी क्रं. (020) 6602 6666, टोल फ्री क्र. 1800 209 5858 असा आहे.
कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी व्हायचे किंवा नाही याबाबत निर्णय घेऊ शकतात. शेतक-यांनी योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र हंगामाच्या आधी किंवा योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर देणे अपेक्षित आहे.
अधिक माहितीकरीता आपल्या तालुक्यातील नजीकची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बॅक, आपले सरकार सेवा केंद्र, तालुका कृषि अधिकारी (सर्व तालुका), उपविभागीय कृषि अधिकारी, जळगाव/पाचोरा/ अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ,जळगाव आकाशवाणी शेजारी, प्रशासकीय इमारत येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
००००
No comments:
Post a Comment