Monday, 16 October 2017

शेतकरी कर्जमाफी योजनेचा 18 ऑक्टोबरला प्रारंभ ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार जिल्हयातील 50 शेतक-यांचा सन्मान



जळगाव, दि. 16 – शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हयातील 50 शेतक-यांना राज्याचे जलसंपदामंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते  कर्जमुक्ती प्रमाणपत्र देवून प्रारंभ करण्यात येणार आहे. 18 ऑक्टोबर रोजी  सकाळी 11.00 वाजता येथील जिल्हा नियोजन सभागृहात कर्जमुक्त्‍ प्रारंभ कार्यक्रम करण्यात येणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमासंदर्भात राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी,  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याशी चर्चा केली.  तसेच कर्जमुक्ती प्रांरभ कार्यक्रम आयोजनाबाबत सूचना दिल्या.
 राज्यस्तरावर 18 ऑक्टोबर रोजी होणा-या कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असून प्रत्येक जिल्हयातून दोन शेतकरी सपत्नीक उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11.30 वाजता सहयाद्री अतिथी गृहात होणा-या कार्यक्रमांत राज्यातून येणा-या सर्व शेतकरी दाम्पत्यांचा साडी चोळी, धोतर, कुर्ता, टोपी व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात येणार आहे.
            जळगाव जिल्हयातील कार्यक्रम जिल्हा नियोजन भवनात होणार असून राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन उपस्थित राहणार आहे. यावेळी कर्जमुक्तीस पात्र शेतक-यांचा सन्मान केला जाणार आहे.
     जळगाव जिल्हयात होणा-या कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन उपस्थित राहणार असून कर्ज मुक्तीस पात्र शेतक-यांचा सन्मान केला जाणार आहे. कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होणार असून जमा झालेली रक्कम शासनाने उघडण्यात आलेल्या खात्यावर नांवे पडणार असल्याची माहिती अपर मुख्य सचिव एस. एस. संधू यांनी यावेळी दिली.
जिल्हा नियोजन भवनात समारंभाचे आयोजन
 जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी आज व्हि.सी. नंतर संबधीत अधिकारी यांची बैठक घेतली 18 ऑक्टोबरला होणाऱ्या कर्जमुक्ती समारंभाचे नियोजन यावेळी करण्यात आले. जिल्ह्यातून राज्यस्तरावर जाणाऱ्या दोन शेतकरी कुटूंब तसेच जिल्ह्यातून येणारे 50 शेतकरी कुटुंब त्याच्या सन्मानार्थ साडीचोळी, शर्टपीस, पॅन्टपीस, लोकप्रतिनिधीना निमंत्रण, राज्यस्तरावर होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था जिल्हा नियोजन भवनात करणे, प्रमाणपत्र छपाई, प्रसार माध्यम प्रतिनिधींना निमंत्रण आदी बाबींवर चर्चा करुन आवश्यक त्या सूचना संबंधितांना दिल्या.
            या बैठकीस जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, जिल्हा सूचना व ‍विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, अग्रणी बँकेचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास जिल्हयातील शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.
०००००

No comments:

Post a Comment