जळगाव,
दि. 6 (जिमाका) - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 20
फेब्रुवारी, 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) लागू
करण्यात आले आहे.
या कालावधीत पाच किंवा
पाचपेक्षा जास्ता लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व
परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश
लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर
जिल्हादंडाधिकारी श्री. रविंद्र भारदे यांनी
एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment