जळगांव,
दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) - केंद्र शासनाने खरिप
हंगाम 2020 करीता अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा
योजना भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि, मुंबई यांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात
शासन निर्णय क्रंमाक/प्रपिवियो-2020/प्रक्र40/11 अे/मुंबई, दिनांक 29 जुन, 2020
अन्वये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत 31
जुलै, 2020 अशी आहे.
शेतक-यांना पिक विमा
भरण्यासाठी कमी कालावधी शिल्लक राहीला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पिक विमा
भरण्यापासुन वंचित राहू नये, याकरीता जिल्ह्यातील सर्व सीएससी सेंटर व महा-ई-सेवा
केंद्र शनिवार व रविवारसह सर्व दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत कोविड-19 च्या
अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात येत
आहे. हे आदेश पिक विम्याच्या मुदतीच्या 31 जुलै, 2020 पर्यंतच अंमलात राहतील. असे
आदेश जिल्हाधिकारी
तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले
आहे.
000000
No comments:
Post a Comment