जळगाव, (जिमाका) दि. 14 -
जिल्ह्यात सध्या पुरेश्या प्रमाणात सर्व खते उपलब्ध असुन दरमहा खताच्या उपलब्धतेचे
नियोजन केलेले आहे. आवश्यकतेप्रमाणे खते उपलब्ध असल्याने शेतकरी बांधवांनी
कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जादाची खते भरुन ठेवू नये. असे आवाहन वैभव
दत्तात्रय शिंदे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिद्धी
पत्रकान्वये केले आहे.
जुलै
महिन्यात आज रोजी युरिया या जादा मागणी असलेल्या खताचा पुरवठा आरसीएफ कंपनीचा 2900
मे. टन, कृभको कंपनीचा 3400 मे. टन, चंबल या कंपनीचा 3000 मे. टन, एनएफएल कंपनीचा
2800 मे. टन असा एकुण 12 हजार 100 मे. टन उपलब्ध झाला आहे. तसेच पुढील आठवड्यात
आरसीएफ, नर्मदा, बायोक्रेम, झुआरी, नागार्जुना, एनएफएल या कंपन्यामार्फत अजुन 13
हजार 600 मे. टन युरीया जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहे. इफको व कृभको या
कंपन्यामार्फत 10:26:26 या खताचा आजअखेर 4660 मे.टन पुरवठा झालेला असुन पुढील
आठवड्यात अजुन 1500 मे. टन पुरवठा होणार आहे. आयपीएल व झुआरी कंपन्यांमार्फत 8000
मे. टन एमओपी व इफको, जीएसएफसी व इतर कंपन्यांमार्फत 10:26:26 डीएपी व इतर खतांचा
पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरेश्या प्रमाणात सर्व खते उपलब्ध
आहेत.
जिल्ह्यास लागणाऱ्या दरमहा
खताच्या उपलब्धतेचे नियोजन कृषि विभागाने केलेले आहे. त्यामुळे सर्व शेतकरी
बांधवांना आवाहन करण्यात येते की, आवश्यकतेप्रमाणे खते उपलब्ध असल्याने शेतकरी
बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जादाची खते भरुन ठेवू नये. असे आवाहन
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव श्री. शिंदे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment