जळगाव, (जिमाका) दि. 3 - अमळनेर येथील चौधरी वाड्यातील रहिवासी असलेले एका 92 वर्षीय आजोबांना दम्याचा आजार असतांनाही केवळ इच्छा शक्तीच्या जोरावर कोरोनाशी दोन हात करत विजय मिळवला आहे. त्यांची जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुटी करण्यात आली असून गल्लीतील नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.
सुखदेव
सखाराम महाजन (वय 92) असे या आजोबांचे नाव असून ते अमळनेर चौधरी वाडा येथील
रहिवासी आहेत. सुरुवातीपासून दम्याचा त्रास होता. अमळनेर शहरात कोरोनाचा प्रभाव
वाढल्यानंतर 10 जुन रोजी थोडा दम्याचा त्रास वाढून त्यांचा जीव घाबरत होता,
सुरवातीला नातू तुषार व मुलाने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे
वय पाहता व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याने त्यांना 15 जून रोजी जळगाव येथील कोविड
रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे जाताच त्यांना डॉक्टरांनी तत्काळ व्हेंटिलेटर
उपलब्ध करुन त्यावर ठेवण्यात आले. तेथे त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह
आल्याने चिंता अधिकच वाढली. मात्र हे आजोबा उपचारास प्रतिसाद देत असल्याने रुग्णालयाचे
डॉक्टर व स्टाफने त्यांची विशेष काळजी घेतली. 2 ते 5 दिवसानंतर त्यांना मध्ये
मध्ये व्हेटिलेटर ची गरज पडत होती. मात्र प्रकृतीत सुधारणाही दिसून येत होती.
यावेळी त्यांचा आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती प्रचंड असल्याने मला काहीच होणार नाही.
मी निश्चितपणे ठणठणीत होऊन घरी जाणार असल्याचे ते डॉक्टर व तेथील स्टाफला सांगत.
त्यांची काळजी घेण्यासाठी नातू तुषार चौधरी हा स्वतः लक्ष ठेवून होता. तोही चांगली
काळजी घेत होता त्यांना थोडे बरे वाटू लागल्यानंतर त्यांचा दुसरा स्वॅब घेण्यात
आला. दुर्देवाने तोही पॉझिटिव्ह आल्याने त्यांना अजून काही दिवस रुग्णालयात
ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. अखेर 20 दिवस उपचार घेतल्यानंतर त्याची
प्रकृती बऱ्यापैकी सुधारली यामुळे पुन्हा त्यांचा स्वब घेऊन अहवाल तपासणीसाठी
पाठविण्यात आला. हा अहवाल निगेटिव्ह आल्याने रुग्णालयातील डॉक्टर आणी स्टाफने
प्रचंड आनंद व्यक्त केला.
पुष्पवृष्टी
करून गल्लीत स्वागत
चौधरी
वाडयात त्यांचे पुष्पवृष्टीने जोरदार स्वागत करण्यात आले. कोरोनावर विजय मिळवून
वृद्ध व तरुण मंडळींच्या मनात असलेली कोरोनाबाबतची भीती निश्चितपणे कमी केली
असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. यावेळी आजोबांच्या स्वागतासाठी
प्रभागाच्या नगरसेविका रत्नमाला महाजन, साखरलाल महाजन, मुलगा रघुनाथ महाजन, सून
मालुबाई व नवसाबाई, नातू तुषार व
प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इच्छाशक्तीने
कोरोनाला हरवा- सर्वाना सल्ला
सुखदेव
महाजन हे घरी आल्यानंतर त्यांनी भीतीग्रस्त असलेल्या जनतेस संदेश दिला की, कोणताही
आजार खरेतर आपल्यापेक्षा वरचढ नसतोच, आपली ईच्छाशक्ती आणि आत्मबल मजबूत असले तर
त्याला हरविणे अशक्य नसते. डॉक्टर मंडळी दैवी रुपात येऊन आपल्यावर उपचार करतात.
मात्र त्यावेळी आपले मनोबल शाबूत ठेवणे हे आपले काम असते आणि ते ढासळले तर दैवी
शक्तीही कमी पडते असा सल्लाही आजोबांनी दिला.
0000
No comments:
Post a Comment