जळगाव, दि.
20 (जिमाका) - महाराष्ट्र वन सेवा (मुख्य)
परीक्षा -2019 च्या मुलाखती 4 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2020 अखेर आयोजित करण्यात
आलेल्या आहेत. अशी माहिती किशोर राजे निंबाळकर, सचिव, आपत्ती व्यवस्थापन,
महाराष्ट्र शासन यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
दिनांक
4 ऑगस्ट, 2020 रोजी मुंबई आयोगाचे कार्यालय येथे, दिनांक 6 व 7 ऑगस्ट रोजी नागपूर
येथे, दिनांक 10 ते 14 ऑगस्ट रोजी पुणे येथे, दिनांक 17 व 18 ऑगस्ट रोजी औरंगाबाद
येथे तर दिनांक 20 व 21 ऑगस्ट, 2020 रोजी नाशिक याठिकाणी परीक्षा होणार आहेत.
सध्या
महाराष्ट्रात कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव असल्याने आंतर जिल्हा प्रवासाचे नियमन
केले जात आहे. त्यामुळे मुलाखतीचा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याच्या अनुषंगाने
मुलाखतीसाठी येणा-या उमेदवारांना त्यांच्या मुलाखतीच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित
राहण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. उमेदवारांचे मुलाखत पत्र हे त्यांच्यासाठी
आंतर जिल्हा प्रवासाचा पास म्हणून ग्राहय धरण्यात यावा. यासाठी स्वतंत्र ई पास/इतर
कोणत्याही परवानगीची आवश्यकता असणार नाही. (संबंधीत उमेदवार यांनी प्रवासाच्या
दरम्यान त्यांचे मुलाखतीचे पत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे)
कोव्हिड-19
विषाणुचा प्रसार होवु नये म्हणून केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या
सूचना/ निर्देशाचे पालन करण्यात यावे. नागपूर, पुणे, औरंगाबाद व नाशिक येथे आयोजित
मुलाखती संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील ज्या अधिकारी/कर्मचा-यांची नियुक्ती
केली जाईल. त्यांचेसाठी मुंबई मुख्यालयातून मुलाखतीच्या ठिकाणापर्यंत व परतीच्या
प्रवासासाठी त्यांच्या या संदर्भातील नेमणुकीचे आदेश आंतरजिल्हा प्रवासासाठी पास
म्हणून ग्राहय धरण्यात येईल. (संबंधीत अधिकारी/कर्मचारी यांनी प्रवासाच्या दरम्यान
त्यांचे ओळखपत्र व नियुक्तीचे आदेशाची प्रत सोबत बाळगणे आवश्यक आहे) कोणताही
उमेदवार मुलाखतीपासून वंचित राहणार नाही व कोणत्याही ठिकाणी त्यांची अडवणुक होणार
नाही याबाबतच्या सुचना संबंधितांना निर्गमित करण्यात याव्यात. असेही श्री.
निंबाळकर, सचिव, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र शासन यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment