Thursday, 27 January 2022

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकूल योजनेसाठी पात्र लाभार्थीनी अर्ज सादर करावे

           जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) :- पात्रता निकष -  लाभार्थी कुटूंब हे विमुक्त जाती, भटक्या जमाती या मूळ प्रवर्गातील तसेच गावोगावी भटकंती करुन उपजिविका करणारे असाव, लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न रु. 1.00 लाख पेक्षा कमी असावे, लाभार्थी कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर नसावे, लाभार्थी कुटुंब हे झोपडी /कच्चे घर / पालामध्ये राहणारे असावे, लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवास असावा, लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, सदरहू योजनेचा लाभ पात्र कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येईल, लाभार्थी वर्षभरात सह महिने एका ठिकाणी वास्तवव्‍यास असावा,

          अटी व शर्ती :- या योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबांना मिळणारा भूखंडा व त्यावरील घर हे संयुक्तपणे पती व पत्नीच्या नावे केले जाईल, मात्र विधवा व परितक्त्या  स्त्रियांच्या बाबतीत भूखंड व त्यावरील घर त्यांच्या नावेच केले जातील, या योजनेंतर्गत मिळालेला भूखंड व त्यावरील घर लाभार्थी कुटुंबास कोणत्याही कारणास्तव कोणत्याही व्यक्तीला,  कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करता येणार नाही, तसेच भूखंड व घर कोणत्याही परिस्थितीत विकता येणार नाही,  या योजनेतील लाभ कुटुंबातील एकाच कायदेशीर व्यक्तीस देण्यात येईल, भूखडावरील जागेचा वापर हा भाडे तत्वावर अन्य व्यक्तीस / कुटूंबास देता येणार नाही,  तसेच पोट भाडेकरु सुध्दा ठेवता येणार नाही तसेच विकता येणार नाही,  तसे आढळून आल्यास सदरचा लाभ रद्द करण्यात येईल व मंजूर केलेल्या निधीची वसूली केली जाईल. प्रस्तुत घराचे बांधकाम झाल्यानंतर ग्रामपंचायती कडून आकारण्यात येणारी वार्षीक घरपट्टी लाभार्थीने भरणे आवश्यक राहील व घराचे देखभाल व दुरुस्ती ही लाभार्थीने स्वता: करावयाची आहे,

                 लाभार्थाने सादर करावयाची कागदपत्रे – सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1.00 लाखा पेक्षा कमी असल्याचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील वास्त्वया बाबतचे अधिवासी प्रमाणपत्र, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकूल योजनेचा लाभ घेतला नसल्या बदलचे रु 100/- च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र, सदर योजनेचा लाभ ग्रामीण भागात देण्यात येईल, एकूण 10 पात्र लाभार्थी कुटुंबासाठी जमीन उपलब्ध होत असल्यास त्यांना सदरहू योजनेचा लाभ देण्यात येईल, ज्या लाभार्थ्यांकडे स्वता:ची जागा आहे, आणि आजपर्यंत त्याने केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही आवास योजनेचा लाभ घेतला नाही त्यास सदर योजनेचा लाभ देता येईल.

                 सदर योजने करिता संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी पंचायत समिती किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव यांच्याकडे संपर्क साधण्यात यावा, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

No comments:

Post a Comment