Friday, 29 July 2022

आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र 31 जुलै पर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

 

          जळगाव, दि.29 (जिमाका वृत्तसेवा) : - सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यावसायिक, कारखाने, कंपनी इ. यांनी त्यांच्याकडील माहे  30 जून,2022 या कालावधीचे कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) दि 31 जुलै, 2022 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या https;//rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे. सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा, 1959 व नियमावली, 1960 अन्वये त्रैमासिक विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे.

           या अनुषंगाने माहे 30 जून,2022 अखेर आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-1) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरील नियोक्ता  (Employer) या ऑप्शनवर क्लिक करुन आपल्या  नियोक्ता लॉग –इन आयडी (Employer Login ID) व पासवर्डच्या सहाय्याने 31 जुलै, 2022 पर्यंत भरावे अथवा सोबत जोडलेल्या Format  मध्ये माहिती भरुन या कार्यालयाचा ई मेल  jalgaonrojgar@gmail.com  वर सादर करण्यात यावे.याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 0257-2959790 वर संपर्क साधावा. असे सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव  वि.जा.मुकणे, यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

परिवहन विभागाचा ऑगस्ट महिन्याचा तालुकानिहाय दौरा जाहिर

   जळगाव, दि२९ (जिमाका वृत्तसेवा) : - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगावमार्फत ऑगस्ट महिन्याचा तालुकानिहाय मासिक दौरा आयोजित करण्यात आला असून याची जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.  

ऑगस्ट-2022 चे शिबीर कार्यालयाचे वेळापत्रक, दौऱ्याचे ठिकाण

 अमळनेर-पहिला व पाचवा सोमवार व तिसरा शनिवार, जामनेर-दुसरा व चौथा बुधवार, पाचोरा-पहिला व तिसरा बुधवार, भुसावळ-पहिला व तिसरा गुरुवार, चाळीसगाव-पहिला, तिसरा,  चौथा शुक्रवार व दुसरा शनिवार , सावदा – पाचवा मंगळवार, चोपडा – चौथा सोमवार,    रावेर – पहिला मंगळवार, बोदवड - दुसरा शुक्रवार, पारोळा - दुसरा सोमवार, एरंडोल – चौथा मंगळवार,  मुक्ताईनगर- चौथा गुरुवार, याप्रमाणे दौरा राहील.           

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द करण्यात येईल. असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी   श्याम लोही यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये म्हटले आहे. 

                                                  0000

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 1 ऑगस्ट रोजी ऑफलाईन होणार

 

            जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 29 - नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते

त्यानुसार जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिन येत्या सोमवार, 1 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता  आयोजित करण्यात आलेला आहे.  तरी नागरिकांनी यापुर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावर कोणतेही उत्तर मिळालेले नसेल अशा वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन सदरहू लोकशाही दिनी वेळेवर उपस्थित रहावे. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

00000

महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम 1923 चे कलम 5 अंतर्गत दंडाची रक्कम वसुली करणेकामी जप्त केलेल्या मालमत्तेचा जाहिर लिलाव्दारे विक्री

       जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 29 –  श्री किरण रघुनाथ गुजर केबल ऑपरेटर शेंदुर्णी यांच्याकडून रक्कम रुपये 50000/- अक्षरी पन्नास हजार महाराष्ट्र करमणुक शुल्क अधिनियम 1923 चे कलम 5 अंतर्गत दंडाची रक्कम वसुली करणे बाबत आदेशीत करण्यात आलेले होते. यापूर्वी श्री किरण रघुनाथ गुजर केबल ऑपरेटर शेंदुर्णी यांनी रक्कम रुपये 5000/- अक्षरी पाच हजार रक्कम रुपये चलनाव्दारे भरणा केलेला आहे. परंतु उर्वरीत रक्कम रुपये 45000/ अक्षरी पंचेचाळीस हजार रुपये भरणा केलेला नसल्यामुळे त्यांचेकडील महाराष्ट्र करमणुक शुल्क अधिनियम 1923 चे कलम 5 अंतर्गत दंडाची रक्कम वसुल करणेकामी मौजे शेदुर्णी येथील मालमत्ता क्रमांक 3129 मालमत्तेची लांबी 37.3 इमारतीचे क्षेत्रफळ 401 चौ.मी. या जागेचे दि.22 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 12.00 वाजता तहसिल कार्यालय जामनेर येथे जाहीर लिलाव करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती किंवा संस्थानी लिलावात भाग घ्यावा. लिलावातील अटी व शर्ती, लिलावातील जागा, लिलावातील बोलीहातची किंमत इत्यादी बाबत कार्यालयीन वेळेत तहसिलदार जामनेर यांचेशी संपर्क साधावा. असे तहसिलदार अरुण शेवाळे जामनेर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००००

Monday, 18 July 2022

आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र 31 जुलै पर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

           जळगाव, दि.१८ (जिमाका वृत्तसेवा) : - सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यावसायिक, कारखाने, कंपनी इ. यांनी त्यांच्याकडील माहे  30 जून,2022 या कालावधीचे कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) दि 31 जुलै, 2022 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे. सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा, 1959 व नियमावली, 1960 अन्वये त्रैमासिक विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे.

           या अनुषंगाने माहे 30 जून,2022 अखेर आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-1) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरील नियोक्ता  (Employer) या ऑप्शनवर क्लिक करुन आपल्या  नियोक्ता लॉग –इन आयडी (Employer Login ID) व पासवर्डच्या सहाय्याने 31 जुलै, 2022 पर्यंत भरावे अथवा सोबत जोडलेल्या Format  मध्ये माहिती भरुन या कार्यालयाचा ई मेल  jalgaonrojgar@gmail.com  वर सादर करण्यात यावे.याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 0257-2959790 वर संपर्क साधावा. असे सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव  वि.जा.मुकणे, यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००  

 

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी 25 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत

        जळगाव, दि.18 (जिमाका वृत्तसेवा) : - सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये या सरासरी 60% किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त झाले असतील, अशा उतीर्ण झालेल्या मांतग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विदयार्थी / विदयार्थीनीना महामंडळाकडून जेष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार प्रथम 03 ते 05 विदयार्थ्यांस निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. उपलब्ध निर्धाच्या अधीन राहून साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते त्यामुळे दिनांक 25 जुलै 2022 च्या आत संपूर्ण कागदपत्रानिशी मांतग समाज व तत्सम  12 पोटजातीतील विदयार्थी / विदयार्थीनींनी जिल्हा कार्यालयात संपर्क करावा, उशिरा आलेल्या  अर्जाचा मुख्यालयामार्फत विचार करण्यात येणार नाही.

खालीलप्रमाणे मुळ कागदपत्रे दोन प्रतीसहित आणावीत.

          मार्कशीट (गुणपत्र), शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, दोन पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकिटसह व  जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी कागदपत्रासह कार्यालयात संपर्क साधावा.   असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, मायादेवी नगर स्टॉप समोर, हातनुर कॉलनी, जळगाव फोन नं. 0257-2263294 येथेसंपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जळगाव ताराचंद कसबे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

                                                          ०००००


 

अनुसूचित जमातीतील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण

                         जळगाव, दि.18 (जिमाका वृत्तसेवा) : - आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र रावेर जि. जळगांव या कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परिक्षाकरीता दिनांक  1 ऑगस्ट,2022 ते 15 नोव्हेंबर, 2022 असे एकुण 3 महिने 15 दिवसांचे प्रशिक्षण मोफत दिले जाते प्रवेशाकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

प्रवेशासाठी अटी :

1)    उमेदवार हा अनुसूचीत जमातीचा असावा. (जातीचा दाखला आवश्यक) 2) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा 3) उमेदवार हा शालांत परिक्षा (10 वी) उत्तीर्ण असावा.            4) उमेदवार हा 18 वर्ष पुर्ण असावा.

2)     वरील प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्या आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांकडुन विविध शासकीय/निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणा-या स्पर्धा परिक्षांची तयारी करुन घेतली जाते प्रशिक्षण काळात उपस्थित प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा रु.1000/- विद्यावेतन देण्यात येते प्रशिक्षणामध्ये प्रवेश मिळविण्याकरीता खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व मुळ प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.

1) शाळा सोडल्याचा दाखला 2) 10 वी 12 वी गुणपत्रिकेची प्रत 3) आधार कार्ड 4) बैंक पासबूक 5) दोन पासपार्ट साईज फोटो 6) जातीचा दाखला

          अधिक माहीतीसाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. 2, शनि मंदीरा मागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर किंवा संपर्कासाठी दुरध्वनी क्र. 02584-251906 या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वतः करावी लागेल, असे सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता, वि जा मुकणे, जळगाव यांनी एक प्रसिध्दी पत्रकान्वये कळविलेले आहे..

०००००


 

मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, यांच्या प्रमुख उपस्थित पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन संपन्न

          जळगाव, दि.18 (जिमाका वृत्तसेवा) : - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राने जागतिक युवा कौशल्य दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दिनांक 15 जुलै 2022 सकाळी 11.00 वाजता  मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, यांच्या प्रमुख उपस्थित पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन शासकीय औदयोगीक प्रशिक्षण संस्था (आय.टी. आय) मेस हॉल, नॅशनल हायवे नं.6 जळगांव येथे करण्यात आले होते.

          या मेळाव्यासाठी एकूण सात औदयोगिक / खाजगी आस्थापनांनी 10 वी 12 वी पास आय टि आय, डिप्लोमा धारक पदवीधर आणि इतर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या होत्या. मेळाव्याचा एकूण 123 उमेदवारांनी लाभ घेतला व विविध आस्थापनांच्या स्टॉलवर भेटी देऊन मुलाखती दिल्या, या पैकी एकूण 82 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आलेली असून अंतिम निवडीची कार्यवाही उदयोजकांचे स्तरावर सुरु आहे.

          मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मा. जिल्हाधिकारी महोदयांनी मनोगत व्यक्त करुन उपस्थित उमेदवारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यां त्याचप्रमाणे विभागाच्या रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत (ईपीपी) आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यांत आल्या आहेत. अशा उदयोजकांना मा. जिल्हाधिकारी महोदयांचे शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचे सामूहिक प्रयत्नातून आयोजित केलेल्या मेळाव्याचा समारोप करण्यात आला, असे सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता, वि जा मुकणे, जळगाव यांनी एक प्रसिध्दी पत्रकान्वये कळविलेले आहे.

                                                         ०००००

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन - 2022-23

        जळगाव, दि.18 (जिमाका वृत्तसेवा) : - "जळगाव जिल्हयात प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2022-23 खरिप हंगाम करीता (Cup & Cap Model 80:110) नुसार अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरून योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत खरीप हंगामाकरिता शेतकरी सहभागाची मुदत 31 जुलै 2022 आहे.

          शेतकरी पिक पेरणी बाबात स्वयंघोषणापत्र देऊन विमा योजनेत सहभाग घेतात. पण प्रत्यक्ष शेतात पेरलेले पीक वेगळे असते. शेतक-यांनी शेतात पेरलेल्या पिकाचाच विमा घेणे आवश्यक आहे. विमा घेतलेले पीक शेतात पेरले नसल्यास शेतक-याचा विमा अर्ज बाद केला जातो व त्याने भरलेला "विमा हप्ता जप्त केला जातो आणि त्यास विमा नुकसान भरपाईचा कोणताही दावा मिळत नाही.

          सदर पिक विमा योजनेमध्ये चालू हंगामात ई-पिक पाहणी मध्ये केलेली नोंद ही अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतक-यांनी आपल्या पिकाची नोंद वेळेत पीक पाहणीमध्ये करुन घ्यावी, असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                      000000       


 

Monday, 11 July 2022

मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (नविन), येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

       जळगाव, दि.11 (जिमाका वृत्तसेवा) : -   मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह, सिंधी कॉलनी जळगाव येथे  वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.   सन 2022 -23 या शैक्षणिक वर्षासाठी  शालेय विद्यार्थ्यांनी दिनांक 15 जुलै,2022 पर्यंत तर कनिष्ठ विभाग विद्यार्थ्यांनी दिनांक 30 जुलै, 2022 पर्यंत व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून, तसेच बीए/बीकॉम/बीएसएस्सी इयत्ता 12 वी नंतरच्या पदवीका / आणि पदवी नंतरचे पव्युत्तर विद्यार्थ्यांनी दिनांक 24 ऑगस्ट 2022 पर्यंत (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) व व्यवसायीक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया दिनांक 30 सप्टेबर,  2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन गृहपाल मागासर्वीय मुलांचे शासकीय वसतिगृह जळगाव यांनी केले आहे.

          वसतीगहामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 8 वी पासुन ते पुढील अभ्यासक्रमा करीता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.  शालेय विद्यार्थी इयत्ता 10 व 11 वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक व्यवसायीक अभ्यासक्रमातील प्रथम व व्दितीय वर्षाच्या प्रवेशासाठी  विद्यार्थ्याना समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल. अभ्यासक्रमा करिता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची  प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता  इतर सोयी सुविधा शासना मार्फत विनामुल्य पुरविण्यात येतात.

          ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल त्यानी तेथुनच अर्ज प्राप्त करुन नमुद दिनांका पंर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विद्याथ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहीत वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह सबंधित वसतिगृहातच सादर करावेत, अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन,            मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह जळगाव, गृहपाल मुकेश भिंगारे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                ०००००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृह साठी प्रवेश प्रक्रिया

        जळगाव, दि.11 (जिमाका वृत्तसेवा) : -   डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, सिंधी कॉलनी जळगाव येथे  वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.   सन 2022 -23 या शैक्षणिक वर्षासाठी  शालेय विद्यार्थ्यांनी दिनांक 15 जुलै,2022 पर्यंत तर कनिष्ठ विभाग विद्यार्थ्यांनी दिनांक 30 जुलै, 2022 पर्यंत व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून, तसेच बीए/बीकॉम/बीएसएस्सी इयत्ता 12 वी नंतरच्या पदवीका / आणि पदवी नंतरचे पव्युत्तर विद्यार्थ्यांनी दिनांक 24 ऑगस्ट 2022 पर्यंत (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) व व्यवसायीक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया दिनांक 30 सप्टेबर,  2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन गृहपाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासर्वीय मुलांचे शासकीय वसतिगृह जळगाव यांनी केले आहे.

          वसतीगहामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 8 वी पासुन ते पुढील अभ्यासक्रमा करीता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.  शालेय विद्यार्थी इयत्ता 10 व 11 वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक व्यवसायीक अभ्यासक्रमातील प्रथम व व्दितीय वर्षाच्या प्रवेशासाठी  विद्यार्थ्याना समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल. अभ्यासक्रमा करिता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची  प्रक्रिया सुरु झाली आहे.  प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता  इतर सोयी सुविधा शासना मार्फत विनामुल्य पुरविण्यात येतात.

          ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल त्यानी तेथुनच अर्ज प्राप्त करुन नमुद दिनांका पंर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विद्याथ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहीत वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह सबंधित वसतिगृहातच सादर करावेत, अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन,            डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह जळगाव, गृहपाल सुर्यभान पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                               ०००००

नानाजी देशमुख कृषि संजीवनी (प्रोक्रा) प्रकल्पांतर्गत प्रकल्प उभारणी पश्चात अनुदान वितरण

        जळगाव, दि.11 (जिमाका वृत्तसेवा) : -  नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत, जळगांव जिल्हयातील समाविष्ट 460 गावांमध्ये 6 वर्ष कालावधी (सन 2018-19 से 2023-24 पर्यंत) कार्यान्वित आहे. प्रकल्पांतर्गत कृषि व्यवसाय प्रकल्प उभारणी करणेसाठी जिल्हयातील शेतकरी उत्पादक कंपनी , संघ व प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या गावातील नोंदणीकृत शेतकरी गट प्रस्ताव सादर करु शकतात. या प्रकल्पांतर्गत आजपर्यंत जिल्हयातील एकूण 2-शेतकरी उत्पादक कंपनी व 28-शेतकरी गट यांनी सादर केलेल्या प्रकल्प मुल्य एकूण रक्कम रु.6,03,44,000/- च्या 60% प्रमाणे एकूण रक्कम रु.3,03,96,000/- इतके अनुदान वितरीत करून प्रकल्प कार्यरत झाले आहेत. यामध्ये

1)    स्वच्छता व प्रतवारी, धान्यप्रक्रिया, बांधकाम व सौर उर्जा केंद्र उभारणी, 1-गोदाम बांधकाम, 2) हळद प्रक्रिया उद्योग 24-भाडे तत्वावर कृषी अवजारे केंद्र इत्यादींचा समावेश आहे.

          तरी शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट (शेतकरी गटाचे गांव पोक्रा प्रकल्पात समाविष्ट असावे) यांनी गोदाम बांधकाम, औजारे बैंक, रायपनिंग चेंबर, कोल्ड स्टोरेज, पशुखाद्य युनिट (मुरघास युनिट), शेतमाल प्रक्रिया युनिट प्रकल्प उभारणीकरीता प्रकल्प मुल्यांच्या 60% पर्यंत अनुदानावर देय आहे. तसेच आपणास इच्छुक प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी (https://dbt.mahapocra.gov.in) या संकेत स्थळावर अर्ज सादर करावा. त्याचबरोबर अधिक माहिती व अनुभव जाणून घेण्याकरीता प्रकल्पाने लाभान्वीत केलेल्या पुढील शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच अधिकच्या माहितीकरीता नजीकच्या तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन   जिल्हा कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                         ०००००

शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळाव्याचे आयोजन

       जळगाव, दि.11(जिमाका वृत्तसेवा) : -  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता, मार्गदर्शन केंद्र जळगाव कार्यालयाचे वतीने दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजता शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था (आय.टी. आय) मेस हॉल जळगांव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यासाठी खाजगी आस्थापनांनी त्यांचेकडील एकूण 474 रिक्तपदांची मागणी अधिसूचित केलेली आहेत. रिक्तपदासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास/ 12 वी पास आय टि आय. डिप्लोमा धारक आणि इतर   सर्व शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. तसेच उदयोजकाना विविध रिक्तपदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची असल्याने आपण स्वखर्चाने मेळाव्यास उपस्थित राहावे, मेळाव्यास येतांना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीसह उपस्थित रहावे. तसेच जिल्ह्यातील उमेदवारांची नांव नोंदणी सन 2013 पासून विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर सुरु झालेली आहे. उमेदवार विभागांच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनबलाईन नांव नोंदणी करावी. उमेदवारांनी ऑन लाईन नांव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधाचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता येईल.

          अल्पसंख्याक उमेदवारांनी देखील आयोजीत करण्यांत आलेल्या मेळाव्याचा लाभ घेण्यांचे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता, मार्गदर्शन केंद्र जळगांव,. वि.जा. मुकणे, यांनी केले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते संध्या.6.15) या वेळेत दूरध्वनी क्रमांक 0257- 2959790   वर संपर्क साधावा. असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता, मार्गदर्शन केंद्र जळगांव,. वि.जा. मुकणे, यांनी केले आहे.

                                      ०००००

Friday, 8 July 2022

खरीपातील हंगामी पिकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत पाणी अर्ज करण्याचे आवाहन

 जळगाव, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) : - कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा फायदा घेणारे बागाईतदारांना दि. 1 जुलै ते 14 ऑक्टोबर, 2021 या कालावधीकरीता सुरु होणाऱ्या खरीप हंगाम 2022 मध्ये भुसार/अन्नधान्न्ये/चारा/डाळी/ कपाशी/भुईमुग व इतर हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार अटी व शर्तींवर पाणी अर्ज सादर करण्याची मंजुरी देण्याचे ठरले आहे.

तरी बागाईतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात दिनांक 31 ऑगस्ट, 2022 पर्यंत सादर करावे. असे आवाहन कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000


 

धनगर समाजातील भटक्या जमाती -क विदयार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रीया सुरु

 जळगाव, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) : -  धनगर समाजाच्या भटक्या जमाती –क विदयार्थ्याना शहरातील इग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता 1 ली व 5 वी च्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विदयार्थ्याना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना इतर मागास बहुजन कत्याण विभागा मार्फत राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ चाळीसगाव जि जळगाव संचलित हॅरीसन पब्लिक स्कुल चाळीसगाव जि. जळगाव निवासी शाळेची निवड शासनाने केली आहे.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती खालीलप्रमाणे

       सदर योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या विदयार्थी हा धनगर समाजाचा ( भटक्या जमाती –क ) असावा, विदयार्थ्याच्या पालकाने विदयार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या धनगर समाजाच्या ( भटक्या जमाती –क ) दाखल्याची साक्षांकीत प्रत व मुळ प्रत तपासण्यासाठी सादर करावी, जर विदयार्थी दारिद्रयरेषेखालील असेल तर त्या संबंधीत यादीतील अनुक्रमांक व दाखला सादर करावा, या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रु.1 लाख इतकी राहील, इयत्ता 1 ली साठी प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्याचा जन्म 31 डिसेबर, 2016 किंवा त्या पुर्वी झालेला असावा, तसेच इ. 2 री ते 5 वी च्या वर्गात प्रवेशासाठी सध्या शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड सादर करावे.विदयार्थ्याचे वैदयकीय प्रमाणपत्र सादर करावे, तसेच विदयार्थ्याचे पालक शासकीय / निमशासकीय नोकरदार नसावेत, निवासी शाळेत राहणाऱ्या विदयार्थ्याना वर्षातून दोनदा पालकांना भेटण्यासाठी स्वग्रामी जाण्याकरीता प्रवास खर्च  व वर्षातून दोनदा पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत येवून भेटण्याकरीता प्रवास खर्च देण्यात येईल, विधवा/ घटस्फोटीत/ निराधार/ परित्यक्ता व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील धनगर समाजाच्या विदयार्थ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल,

प्रवेश पाठविण्यासाठी संपर्क  - सहाय्यक आयुक्त समाज कल्याण  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,  महाबळ रोड जळगाव  येथे संपर्क साधून प्रत्यक्ष पाल्याचा जन्म दाखला व आधार कार्ड साक्षांकीत प्रत सादर केल्यानंतर प्रवेश अर्ज विनामुल्य प्राप्त करुन घेऊन सदरील अर्ज परिपूर्ण भरुन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव येथे दिनांक 15 जुलै, 2022 पर्यत सादर करावा. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव  योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अंमळनेर येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

 जळगाव, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) : -  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग संचलित मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह अमळनेर   येथे  सन 2022 -23 या शैक्षणिक वर्षासाठी  शालेय विद्यार्थ्यांनी दिनांक 15 जुलै,2022 पर्यंत तर कनिष्ठ विभाग विद्यार्थ्यांनी दिनांक 30 जुलै, 2022 पर्यंत व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून, तसेच बीए/बीकॉम/बीएसएस्सी इयत्ता 12 वी नंतरच्या पदवीका / आणि पदवी नंतरचे पव्युत्तर विद्यार्थ्यांनी दिनांक 24 ऑगस्टख्‍ 2022 पर्यंत (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) व व्यवसायीक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया दिनांक 30 सप्टेबर,  2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन गृहपाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासर्वीय मुलींचे शासकीय वसतिगृह अमळेर यांनी केले आहे.

          अमळनेर शहरातील शैक्ष्णिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शालेय विद्यार्थी इयत्ता 10 व 11 वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक व्यवसायीक अभ्यासक्रमाती प्रथम व व्दितीय वर्षाच्या प्रवेशासाठभ्‍ विद्यार्थ्याना समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल. त्याचप्रमाणे, तालुका स्तरावर मुला / मुलींचे शासकीय वसतिगृह येथे इयत्ता 8 वी पासुन ते पुढील अभ्यासक्रमा करिता प्रवेश अर्ज वाटपाकरिता  प्रक्रिया सुरु झाली आहे.

          प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तेसेच निर्वाह भत्ता देण्यात येतो.  विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल त्यानी तेथुनच अर्ज प्राप्त करुन नमुद दिनांका पंर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विद्याथ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहीत वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह सबंधित वसतिगृहातच सादर करावेत, अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन, गृहपाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अमळनेर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

शासकीय वसतिगृह प्रवेशप्रकिया सुरु, अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

         जळगाव, दि.८ (जिमाका वृत्तसेवा) : -   29 जून, 2022 पासून  समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जळगांव जिल्ह्यातील एकुण 12 शासकीय वसतिगृहासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षा करिता शालेय विद्यार्थ्यांनी दि. 15 जुलै 2022 पर्यंत तर कनिष्ठ विभाग विद्यार्थ्यांनी  दिनांक 30 जुलै 2022 पर्यंत व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून, तसेच बीए/बीकॉम/बीएसएस्सी इयत्ता 12 वी नंतरच्या पदवीका /आणि पदवी नंतरचे पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी दि. 24 ऑगस्ट 2022 पंर्यत (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) व व्यवसायीक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया दि.30 सप्टेबर 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडुन करण्यात आले आहे.

          जिल्हयातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शालेय विद्यार्थी इयत्ता 10 वी 11 वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक / व्यवसायीक अभ्यासक्रमातील प्रथम व व्दितीय वर्षाच्या प्रवेशीत विद्यार्थ्याना समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल. त्याचप्रमाणे, तालुका स्तरावर मुला/मुलींचे शासकीय वसतिगृह येथे इयत्ता 8 वी पासुन ते पुढील अभ्यासक्रमा करिता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.

          शालेय विद्यार्थीसाठी दि 15 जुलै 2022 इयत्ता 10 व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थीसाठी दि 30 जुलै 2022  बी.ए./बी.कॉम / बी.एस.सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमा मध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका / पदवी आणि एम.ए/ एम.कॉम./ एम.एस.सी असे पध्दती नंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यवसायीक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थी यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत हो दि 24 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. तर व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यर्थ्यांनी दि. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता देण्यात येतो.

          विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल त्यानी तेथुनच अर्ज प्राप्त करुन नमुद दिनांका पंर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विद्याथ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहीत वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह सबंधित वसतिगृहातच सादर करावेत, अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतिगृह तसेच संबंधित जिल्हयाचे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जळगांव येथे संपर्क साधावा, असे आवाहन, सहायक आयुक्त समाज कल्याण जळगांव वाय.पी.पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मुक्ताईनगर येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

 जळगाव, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) : -  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग संचलित मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मुक्ताईनगर  येथे  सन 2022 -23 या  शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे.

1) विदयालय विभागासाठी एकूण 14, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी -07, जागा रिक्त आहेत.

  प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इयत्ता 8 वी ते महाविदयालयीन शिक्षण घेणाऱ्या गरजू विदयार्थ्यांना सदर प्रवेशासाठी अर्ज वसतिगृह कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.  परिपूर्ण भरलेला अर्ज घेवून शालेय विभाग 15 जुलै पर्यंत, कनिष्ठ महाविदयाल विभाग 30 जुलै, पर्यंत , वरिष्ठ महाविदयालय विभागासाठी 24 ऑगस्ट पर्यंत तसेच व्यावसायिक शिक्षणासाठी दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत वसतिगृह कार्यालयात जमा करावेत. प्रवेश पात्रतेच्या अटी व नियम प्रवेश अर्जासोबत पहावयास मिळतील

 तरी विदयार्थ्यांनी वरील पत्त्यावर संपर्क साधावा, वसतिगृह प्रवेश रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार दिला जाईल. पहिल्या व दुसऱ्या निवड यादी वरील वसतिगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास प्रथम येणाऱ्या विदयार्थ्यास प्राधान्य देवून त्यास तात्काळ प्रवेश दिला जाईल.

 वसतिगृहात निवड झालेल्या प्रवेशितांना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य तसेच महाविदयालयीन विदयार्थ्याना साहित्यासाठी रुपये 4000/- रोख तसेच दरमहा निर्वाह भत्ता रुपये 500/- व इतर अनुषंगिक सुविधा दिल्या जातील, असे आवाहन गृहपाल     डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मुक्ताईनगर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

रावेर येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

       जळगाव, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) : -  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग संचलित मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह रावेर   येथे  सन 2022 -23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे.

  प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इयत्ता 8 वी ते महाविदयालयात पदवी/ पदविका प्रथम वर्षासाठी  शिक्षण घेणाऱ्या  रावेर शहरात शिकणाऱ्या गरजू विदयार्थ्यांना सदर प्रवेशासाठी अर्ज वसतिगृह कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.

          परिपूर्ण भरलेला अर्ज घेवून शालेय विभाग 15 जुलै पर्यंत, कनिष्ठ महाविदयाल विभाग 30 जुलै, पर्यंत , बिगर व्यावसायिक महाविदयालयासाठी   दिनांक 24 ऑगस्ट पर्यंत दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत तसेच व्यावसायिक महाविदयालयासाठी   दिनांक   30 सप्टेंबर पर्यंत वसतिगृह कार्यालयात जमा करावेत. प्रवेश पात्रतेच्या अटी व नियम प्रवेश अर्जासोबत पहावयास मिळतील वसतिगृह प्रवेश रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार दिला जाईल

तरी विदयार्थ्यांनी वरील पत्त्यावर संपर्क साधावा, वसतिगृहात निवड झालेल्या प्रवेशितांना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य व इतर सुविधा दिल्या जातील,  असे आवाहन  गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह रावेर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह भुसावळ येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

        जळगाव, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) : -  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग संचलित मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह भुसावळ  येथे  सन 2022 -23 या  शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे.

1) विदयालय विभागासाठी एकूण 13, कनिष्ठ महाविदयालय विभागासाठी -08   वरिष्ठ महाविदयालय विभागासाठी -05, इत्यादि जागा रिक्त आहेत.

  प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इयत्ता 8 वी ते महाविदयालयीन शिक्षण घेणाऱ्या गरजू विदयार्थ्यांना सदर प्रवेशासाठी अर्ज वसतिगृह कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.  परिपूर्ण भरलेला अर्ज घेवून शालेय विभाग 15 जुलै पर्यंत, कनिष्ठ महाविदयाल विभाग 30 जुलै, पर्यंत , वरिष्ठ महाविदयालय विभागासाठी 24 ऑगस्ट पर्यंत तसेच व्यावसायिक शिक्षणासाठी दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत वसतिगृह कार्यालयात जमा करावेत. प्रवेश पात्रतेच्या अटी व नियम प्रवेश अर्जासोबत पहावयास मिळतील तरी विदयार्थ्यांनी वरील पत्त्यावर संपर्क साधावा, वसतिगृह प्रवेश रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार दिला जाईल. पहिल्या व दुसऱ्या निवड यादी वरील वसतिगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास प्रथम येणाऱ्या विदयार्थ्यास प्राधान्य देवून त्यास तात्काळ प्रवेश दिला जाईल.

          वसतिगृहात निवड झालेल्या प्रवेशितांना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य तसेच महाविदयालयीन विदयार्थ्याना साहित्यासाठी रुपये 4000/- रोख तसेच दरमहा निर्वाह भत्ता रुपये 500/- व इतर अनुषंगिक सुविधा दिल्या जातील, असे आवाहन गृहपाल  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह भुसावळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

भुसावळ येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

 जळगाव, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) : -  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग संचलित मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह भुसावळ  येथे  सन 2022 -23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे.

1) विदयालय विभागासाठी एकूण 15, कनिष्ठ महाविदयालय विभागासाठी -08   वरिष्ठ महाविदयालय विभागासाठी -02,  व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 01 इत्यादि जागा रिक्त आहेत.

  प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इयत्ता 8 वी ते महाविदयालयीन शिक्षण घेणाऱ्या गरजू विदयार्थ्यांना सदर प्रवेशासाठी अर्ज वसतिगृह कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.

          परिपूर्ण भरलेला अर्ज घेवून शालेय विभाग 15 जुलै पर्यंत, कनिष्ठ महाविदयाल विभाग 30 जुलै, पर्यंत , वरिष्ठ महाविदयालय विभागासाठी 24 ऑगस्ट पर्यंत तसेच व्यावसायिक शिक्षणासाठी दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत वसतिगृह कार्यालयात जमा करावेत. प्रवेश पात्रतेच्या अटी व नियम प्रवेश अर्जासोबत पहावयास मिळतील तरी विदयार्थ्यांनी वरील पत्त्यावर संपर्क साधावा, वसतिगृह प्रवेश रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार दिला जाईल. पहिल्या व दुसऱ्या निवड यादी वरील वसतिगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास प्रथम येणाऱ्या विदयार्थ्यास प्राधान्य देवून त्यास तात्काळ प्रवेश दिला जाईल.

          वसतिगृहात निवड झालेल्या प्रवेशितांना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य तसेच महाविदयालयीन विदयार्थ्याना साहित्यासाठी रुपये 4000/- रोख तसेच दरमहा निर्वाह भत्ता रुपये 500/- व इतर अनुषंगिक सुविधा दिल्या जातील,  असे आवाहन  गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह भुसावळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

मालवाहू वाहनांच्या बाबतीत सुधारित वजन हे अनिवार्य न करता एैच्छिक करण्यात आले आहे ….उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही

             जळगाव, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) : -  जळगाव  जिल्ह्यातील  सर्व अवजड मालवाहू वाहनधारकांना कळविण्यात येते की, केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शनानुसार सर्व नोंदणी प्राधिका-यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार मालवाहू वाहनांच्या बाबतीत सुधारित वजन हे अनिवार्य न करता ते ऐच्छिक करण्यात आले असून, अशा वाहनांचा सुधारित वजनावरील कर हा वाहनधारक वाहनामध्ये सकल भार क्षमता GVW वाढवून मिळण्यासाठी ज्या तारखेस अर्ज करेल त्या तारखेपासून वाहनकर सुधारित दराने घेण्यात येईल. तसेच एखाद्या मालवाहू वाहनाच्या नोंदणी पुस्तकामध्ये जो पर्यंत सुधारित भार क्षमतेची नोंद नोंदविली जात नाही अथवा जोपर्यंत वाहन मालक अशा वाहनाच्या बाबतीत वाढीव दराने कर भरत नाही तो पर्यत अशा वाहनांमधून सुधारित भार क्षमतेने माल वाहून नेता येणार नाही. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००

केळी पिकावरील कुकुंबर मोसॅक व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

             जळगाव, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) : -  -जिल्ह्यात केळी हे प्रमुख फळपिक असून सुमारे 50  ते 55 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. कुकुंबर मोसॅक व्हायरस (CVM) हा केळी पिकावरील प्रमुख विषाणुजन्य रोग आहे. दरवर्षी माहे जुलै ते सप्टेंबर दरम्यान CVM रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळुन येतो. CVM रोगाचा प्रादुर्भाव रोखणे व नियंत्रण करण्यासाठी शेतक-यांनी पुढीलकाळजी घेण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे. 

            सततचे ढगाळ वातावरण, जुन-जुलै महिन्यात वारंवार पडणारा अखंडित पाऊस, प्रकाशाची तीव्रता कमी असणे व किमान तापमान 24-25 अंश से. असणे, जास्त आर्द्र हवामान, इत्यादी घटक CVM रोगास पोषक असतात. सुरुवातीस कोवळया पानांवर विरहित, पिवळसर पट्टे दिसणे, पानाचा पृष्ठभाग आकसला जाऊन व कडा वाकडया होऊन पानांचा आकार लहान होणे, पानाच्या शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होणे, पानांच्या शिरांमधील भाग काळपट पडून पाने फाटणे, पोंग्याजवळील पान पिवळे पडून पोंगा सडणे, झाडांची वाढ खुंटणे, इत्यादी लक्षणे CVM रोगात आढळतात.

            CVM विषाणुचा प्राथमिक प्रादुर्भाव रोगट कंदापासून होतो तसेच या रोगाचा दुय्यम प्रसार प्रामुख्याने मावा किडीच्या माध्यमातुन होतो. CVM विषाणुची जवळ-जवळ 1 हजार यजमान पिके येतात. CVM रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी कोणतेही ठोस उपाय करता येत नाही. तथापी CVM रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटुन दुर ठिकाणी जाळुन किंवा गाडुन टाकावी. बागेची 2/3 वेळा चार ते पाच दिवसांनी नियमित निरिक्षण करुन रोगग्रस्त झाडे आढळल्यास त्यांचीही विल्हेवाट लावावी. बागेतील व बांधावरील मोठा केणा, छोटा केणा, धोतरा, काहे, रिंगणी, चिलघोल, शेंदाळे, गाजर गवत इत्यादी प्रकारची तणे काढुन बाग स्वच्छ ठेवावी, पिकाची फेरपालट करावी.

            केळीत काकडी, भोपळा, कारली, दुधीभोपळा, गिलके, चवळी, टोमॅटो, वांगे, मिरची, मका या पिकाची लागवड करु नये, तसेच केळी बागेभोवती रान कारली, शेंदळी, कटुर्ले, गुळवेल यासारख्या रानटी झाडांचे वेल नष्ट करावेत. मावा या वाहक किडीच्या बंदोबस्तासाठी डायमेथेएट 30 ई.सी. 20 मिली किंवा थायोमिथोक्झाम 25 डब्लु जी. 2 ग्राम किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8 एस.एल. 5 मिली या किटकनाशकांची 10 लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

        जळगाव, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) : -  जिल्हा कौशल्य विकास  रोजगार  व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव या कार्यालयामार्फत गुरुवार  दिनांक 14 जुलै, 2022 रोजी सकाळी  11.00 ते 12.00 या वेळेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यांत आलेले आहे.

          या मार्गदर्शन सत्रात  समुपदेशक दिपक बोरसे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जळगांव हे मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन गुगल मिटवर करण्यांत आलेले आहे. गुगल मिट लिंक खालीलप्रमाणे.

गूगल मिट लिंक - meet.google.com/sxr-mywu-kgr

          तरी जिल्हातील जास्तीत जास्त युवक/युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन              सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव वि.जा. मुकणे  यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००  

पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

         जळगाव, दि.८ (जिमाका वृत्तसेवा) : - १) विभागीय व जिल्हास्तरावर इयत्ता 12 वी नंतर पुढे शिक्षण घेणा-या वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून आदिवासी विभागाव्दारे लागू केलेली आहे.2) जिल्हास्तरावर असलेल्या महाविद्यालयामध्ये इयत्ता 12 वी नंतर पुढे शिक्षण घेणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी विद्यार्थीनींना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी www.swayam. mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करु शकतात. तसेच शासन निर्णय आदिवासी विकास विभाग 27 नोव्हेंबर, 2018 अन्वये सदर योजना ही  तालुकास्तरावरील सर्व मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित  महसविद्यालयामध्ये केंद्रीभुत  प्रक्रियाव्दारे प्रवेश घेवून शिक्षण घेणा-या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना सदर योजना लागू झालेली आहे. अशा शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थी या योजनेमध्ये अर्ज करु शकतात 3) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल  या कार्यालयाचे अधिनस्त जळगाव जिल्हयातील 15 तालुक्याचा समावेश आहे. 4) जिल्हास्तरावर इयत्ता 12 वी नंतर सर्व अभ्यासक्रमासाठी व तालुकास्तरावरील सर्व मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय  शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय  तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रक्रियाव्दारे प्रवेश घेवून शिक्षण घेणा-या अनुसूचित  जमातीच्या विद्यार्थ्यांना सदर योजना लागू झालेली आहे. अशा शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशित विद्यार्थी या योजनेमध्ये www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करु शकतात 5) नविन विद्यार्थ्याना सदर संकेतस्थळावर अर्ज भरण्याकरीता प्रथम नोंदणी (registration) करावे. नावनोंदणी प्राप्त युझर आयडी व पासवर्डचा उपयोग करून ऑनलाईन अर्ज भरावा. योजनेमध्ये अर्ज भरण्यासाठी Hostel Addmission किंवा swayam या पैकी swayam पर्याय निवडून काळजीपूर्वकऑनलाईन अर्ज भरावा.

6) जे विद्यार्थी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून योजनेमध्ये प्रवेशित आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांनी देखील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात (जूने विद्यार्थी म्हणून) Renew Application मध्ये अर्ज भरणे आवश्यक आहे.  8) swayam योजनेसाठी अर्ज करतांना online प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे (उदा. मागील वर्षी मिळालेले गुणपत्रक जात प्रमाणपत्र/जात वैधताप्रमाणपत्र / वडीलांचा उत्पन्नाचा दाखला/लिव्हींग सर्टिफिकेट /चालू वर्षी प्रवेश घेतलेल्या शाळा / महाविद्यालयाचे कॅप  राऊन्ड  सर्टिफिकेट (व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी)/ बोनाफाईड/ प्रवेश पावती, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेतील आधार संलग्न खात्याचे पासबुक झेरॉक्स व इतर आवश्यक कागदपत्र विद्यार्थ्यांनी सोबत बाळगावेत 9) या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक आहे.

अटी व शती

1) विद्यार्थी/ विद्यार्थीनी है अनुसूचित जमातीचे असावे, 2) विद्यार्थ्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, ३) विद्यार्थ्याचे पालकाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 2.50 लक्षच्या आत असणे आवश्यक आहे.4) विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे बंधनकारक आहे व सदरचे खाते हे आधार क्रमांकाशी सलग्न असावे, 5) विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे. अशा शहरातील सदर विद्यार्थ्याचे पालक रहिवासी नसावे  6) सदर विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त सात वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल 7) विद्यार्थ्याचे कमाल वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे 8) आदिम जमातीच्या व अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्याना सदर योजनेचा लाभ प्राधान्याने देय राहील 9) विभागीय शहर/महानगरपालिका/जिल्हास्तरावर कार्यरत शैक्षणिक संस्था/महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यानी मान्यता प्राप्त महाविद्यालय / संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्याक्रमासाठी  प्रवेश घेतलेला असावा तसेच तालुकास्तरावर मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश घेणे आवश्यक आहे.           10) विद्यार्थ्यानी आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीव्दारे  Online  करणे बधनकारक राहील,     11) विद्यार्थ्यास आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्य वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा, 12) विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा, 13) एका शाखेची पदवी मध्येच सोडून दुसऱ्या शाखेची पदवीसाठी  प्रवेश घेतत्यास किंवा एका शाखेची पदची/ पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण झाल्यानंतर इतर शाखेच्या पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास सदर योजनेचा लाभ मिळणार नाही. 14) केंद्र शासनाच्या पोस्ट्र मॅट्रीक शिष्यवृत्तीकरीता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना सदर योजनेतर्गत लाभ देण्यात येईल. तथापी दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.   15) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग दिनांक 27 नोव्हेंबर 2018 अन्वये सदर योजनेचा लाभ विद्यार्थ्याच्य आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी फसवणूक केल्याचे आढळल्यस संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था व्याजासह वसुलीस व कायदेशी कार्यावाहीस पात्र राहतील, असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विनिता सोनवणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु

        जळगाव, दि.८ (जिमाका वृत्तसेवा) : - राज्यात विभागीय, जिल्हा तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी विकास विभागाव्दारे शासकीय वसतीगृह योजना कार्यन्वित आहे.

             2) विभागीय व जिल्हास्तरावर तालुका व ग्रामीण स्तरावर इयत्ता 12 वी पासून  पुढे शिक्षण घेणाऱ्या नविन व जुने विद्यार्थ्यांनी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावयाची आहे.

            ३) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत एकूण 17 आदिवासी मुला / मुलींचे शासकीय वसतीगृह कार्यरत आहे. या सर्व वसतीगृहामध्ये ऑनलाईन प्रणालीव्दारे शैक्षणिक वर्ष सन 2022-23 करीता प्रवेश अर्ज  www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर  स्विकारण्यात येत आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी नविन व जूने महाविद्यालय प्रवेशाच्या आधारावर विविध अभ्यासक्रमासाठी खालील वेळापत्रकानुसार दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज भरावेत.

५) नविन व जुन्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी वरील संकेतस्थळावर दिलेल्या user manual  चे वाचन करून त्या आधारे अचूक अर्ज भरावा 6) विदयार्थ्यांनी सदर संकेत स्थळावर अर्ज भरण्याकरीता प्रथम नोंदणी (registration) करावे. नावनोंदणी नंतर प्राप्त user id व passward चा उपयोग करून अर्ज भरावा. अर्ज भरण्यासाठी नविन विद्यार्थ्यांनी Hostel Addmission मधील  New Addmission हा पर्याय काळजीपूर्वक निवडावा 7) जे विद्यार्थी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात (जूने विद्यार्थी) प्रवेशित होते अशा विद्यार्थ्यानी चालू शैक्षणिक वर्षात देखील अर्ज भरणे आवश्यक आहे. या करीता Hostel Addmission यामध्ये Renew Hostel Addmission  हा पर्याय काळजीपूर्वक निवडून पुढील अर्ज भरावा.

8)जुन्या विद्यार्थ्यानी युझर आयडी व पासवर्ड मिळणेसाठी www.swayam.mahaonline.gov.in या वेबसाईडच्या होम पेजवर  forgot passward चा वापर करावा यामध्ये आवश्यक ती माहिती भरून पासवर्ड रिसेट करून घ्यावा 9) वसतिगृह प्रवेशअर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्याने प्रथम महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे. 10) वसतीगृहासाठी अर्ज करताना ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे (उदा. मागील वर्षी मिळालेले गुण/ गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र क्रमांकासहीत टी. सी. चालू वर्षी प्रवेश घेतलेल्या शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड/ प्रवेश पावती, आधारकार्ड, वडीलांचा (पालकाचा) चालू वर्षांचा उत्पन्नाचा दाखला, राष्ट्रीयकृत बँकेतील आधार संलग्न खात्याचे पासबुक झेरॉक्स, वैद्यकीय ताखला व इतर आवश्यक कागदपत्रे) विद्यार्थ्यांनी सोबत बाळगावीत. 11) याबाबत अधिक माहितीसाठी आपण प्रवेश घेवू इच्छीत शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक.

 

सन 2022-23 आदिवासी मुला/मुलींचे शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक

            इयता / अभ्यासक्रम- Senior College (१२ वी पासून पुढे), अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक  27 जुलै, 2022, नविन विद्यार्थ्याची गुणवत्तेनुसार  निवड यादी तयार करणे नुसार 1 ऑगस्ट, 2022,  निवड यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा कालावधी -  4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट, 2022,

            वेळापत्रकामध्ये अंशतः बदल करण्याचे सर्व अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांना राहतील,  असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल विनिता सोनवणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

Tuesday, 5 July 2022

शिछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे क्रीडा प्रबोधिनी येथे जलतरण या खेळासाठी निवड चाचणीचे आयोजन

           जळगाव, दि.5 (जिमाका वृत्तसेवा) : - शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथील क्रीडाप्रबोधिनीत जलतरण या खेळाच्या प्रशिक्षण व संघ उभारणी करीता नव्याने खेळाडु भरती करण्यासाठी वयोगट ८ ते १६ वर्षातील खेळाडुंच्या राज्यस्तर निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर राज्यस्तर निवड चाचणीचे आयोजन दिनांक १२ जुलै,२०२२ रोजी सकाळी ७.०० वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथे करण्यात आलेले आहे. सदर चाचण्याकरिता खेळाडुंची जन्मतारीख दिनांक १ जानेवारी, २००६ ते ३१ डिसेंबर, २०१४ या कालावधीत असावी. सदर निवड चाचणीकरिता मानके पुढीलप्रमाणे अ) खेळाडु जलतरण या खेळामध्ये कीमान राज्यस्तरावर सहभागी असणे आवश्यक आहे. (कौशल्य चाचणी) ब)खेळाडु जलतरण या खेळामध्ये राज्यस्तर स्पर्धेत प्राविण्य प्राप्त असावा, तसेच निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडुंचे निकष, १)खेळाडुची उंची २)शरिरीक क्षमता ३)कौशल्य चाचणी ४) खेळातील कामगिरी ५) जलतरण चाचण्या-५० मी फ्री १०० मी. मेनस्ट्रोक,४०० मी. फ्रीस्टाईल (१४ वर्षा आतील), ८०० मी. फ्रीस्टाईल (१४ वर्षाआतील) ६) ८०० मी. धावणे, शोल्डर लेन्थ असे असेल तसेच सदर चाचण्यांमध्ये सहभागी होणाऱ्या फक्त खेळाडुंची निवास व्यवस्था करण्यात येणार असून, प्रवास व भोजन खर्च स्व:ता करावयाचा आहे. तरी सदर चाचण्यासाठी जिल्ह्यातील खेळाडुंनी जातांना जन्मदाखला व जलतरण क्रीडा कामगिरीबाबत कागदपत्रे (क्रीडा प्रमाणपत्रे) सोबत घेवून जाणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी मिनल थोरात (राज्य क्रीडा मार्गदर्शक)- ८६२५९४६७०९ यांचेशी संपर्क साधावा,            असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

                                    ०००००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बोदवड येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

            जळगाव, दि.5 (जिमाका वृत्तसेवा) : - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बोदवड, जामनेर रोड बोदवड येथे असून सदर वसतिगृहात सन 2022-23 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.  

प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इयत्ता 8 वी ते महाविदयालयात पदवी / पदविका प्रथम वर्षासाठी शिक्षण घेणाऱ्या बोदवड शहरात शिकणाऱ्या गरजू विदयार्थ्यांना कळविण्यात येते की, सदर प्रवेशासाठी अनुसूचित जाती - 13,  वि.जा.भ.ज 1, वि.मा.प्र. 1, अपंग/ अनाथ -1 जागा रिक्त आहेत.  सदर प्रवेशासाठी अर्ज वसतिगृह कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. परिपूर्ण भरलेला अर्ज घेऊन शालेय विभागासाठी दिनांक 15 जुलै, 2022 पर्यंत कनिष्ठ महाविदयालयासाठी दिनांक 30 जुलै, 2022 पर्यंत बिगर व्यावसायिक महाविदयालयासाठी दिनांक 24 ऑगष्ट 2022 पर्यंत व व्यवसायिक महाविदयालयासाठी दिनांक 30 सप्टेंबर, पर्यंत वसतिगृह कार्यालयात जमा करावेत. प्रवेश पात्रतेच्या अटी व नियम प्रवेश अर्जासोबत पहावयास मिळतील. वसतिगृह  प्रवेश रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार दिला जाईल.

          तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बोदवड, जामनेर रोड बोदवड येथे संपर्क साधावा, वसतिगृहात निवड झालेल्या प्रवेशितांना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य व इतर सुविधा दिल्या जातील असे डॉ. बाबासाहेब आबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तिगृह बोदवड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलै पर्यंत सहभागी व्हावे चारशे रुपयात मिळणार वीस हजाराचे विमा संरक्षण जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागाचे कृषि विभागाचे आवाहन

             जळगाव, दि.5 (जिमाका वृत्तसेवा) : - केंद्र शासनाने खरिप हंगाम-2022  मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुबंई यांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह|यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत 31 जुलै, 2022 पर्यंत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

          अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणा-या शेतक-यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व तसेच बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे. जे कर्जदार शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत, त्या सर्व शेतक-यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.

         

       प्रधानमंत्री पीक विमा योजना खरिप हंगाम-2021 मध्ये राबवण्यिात येत आहे.  योजनेंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम व शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता तपशील खालीलप्रमाणे.

खरिप ज्वारी- विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 480 रुपये,

बाजरी- विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 400 रुपये, 

सोयाबीन- विमा संरक्षित रक्कम 36 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 720 रुपये,  

भुईमुग- विमा संरक्षित रक्कम 32 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 640 रुपये, 

तीळ- विमा संरक्षित रक्कम 22 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 440 रुपये,  

मुग- विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 400 रुपये, 

उडिद- विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 400 रुपये, 

तुर- विमा संरक्षित रक्कम 25 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 500 रुपये,  

कापुस- विमा संरक्षित रक्कम 40 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 2 हजार रुपये, 

मका- विमा संरक्षित रक्कम 26 हजार 200 रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 524 रुपये इतका असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरिप हंगाम 2022 करीता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै, 2022 आहे. शेतकऱ्यांनी 31 जुलै, 2022 अंतिम मुदतीची वाट न पाहता आज पासुनच पिकाचा विमा काढण्यात यावा. जेणेकरुन शेवटच्या दिवशी घाई होणार नाही. जन सुविधा केंद्रावर विनामुल्य अर्ज स्विकारले जाणार आहेत. नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

 

 

या योजनेच्या लाभासाठी संपर्काचे ठिकाण

          आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बॅक, मंडळ कृषि अधिकारी कार्यालय (सर्व), तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सर्व तालुके), उपविभागीय कृषि अधिकारी, कार्यालय, जळगाव, पाचोरा, अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कार्यालय आकाशवाणी शेजारी, प्रशासकीय इमारत, जळगाव, आपले सरकार सेवा केंद्र, सर्व (सी.एस.सी केंद्र)  जिल्हा जळगाव, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, 20 वा माळा, दलाल स्ट्रीट फोर्ट मुंबई, -400023,. टोल फ्री क्रमांक 1800 419 5004, ई – मेल pikvima@aicofindia.com. श्री. कुंदन बारी, जिल्हा प्रतिनिधी, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मो. क्र. 9595554473  येथे संपर्क साधून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन        जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  श्री. संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

          सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर www.maharastra.gov.in  उपलब्ध आहे.

०००००

आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र 30 जुलै पर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

           जळगाव, दि.5 (जिमाका वृत्तसेवा) : - सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यावसायिक, कारखाने, कंपनी इ. यांनी त्यांच्याकडील माहे  एप्रिल ते  जून,2022 या कालावधीचे कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) दि 30 जुलै, 2022 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे. सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा, 1959 व नियमावली, 1960 अन्वये त्रैमासिक विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे.

           या अनुषंगाने माहे एप्रिल,2022 ते जून, 2022 अखेर आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-1) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरील नियोक्ता  (Employer) या ऑप्शनवर क्लिक करुन आपल्या  नियोक्ता लॉग –इन आयडी (Employer Login ID) व पासवर्डच्या सहाय्याने 30 जुलै, 2022 पर्यंत भरावयाची आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 0257-2959790 वर संपर्क साधावा. असे सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव  वि.जा.मुकणे, यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००  

शासकीय वसतिगृह प्रवेशप्रकिया सुरु, अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

         जळगाव, दि.५ (जिमाका वृत्तसेवा) : -   29 जून, 2022 पासून  समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जळगांव जिल्ह्यातील एकुण 12 शासकीय वसतिगृहासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षा करिता शालेय विद्यार्थ्यांनी दि. 15 जुलै 2022 पर्यंत तर कनिष्ठ विभाग विद्यार्थ्यांनी  दिनांक 30 जुलै 2022 पर्यंत व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून, तसेच बीए/बीकॉम/बीएसएस्सी इयत्ता 12 वी नंतरच्या पदवीका /आणि पदवी नंतरचे पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी दि. 24 ऑगस्ट 2022 पंर्यत (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) व व्यवसायीक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया दि.30 सप्टेबर 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडुन करण्यात आले आहे.

          जिल्हयातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शालेय विद्यार्थी इयत्ता 10 वी 11 वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक / व्यवसायीक अभ्यासक्रमातील प्रथम व व्दितीय वर्षाच्या प्रवेशीत विद्यार्थ्याना समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल. त्याचप्रमाणे, तालुका स्तरावर मुला/मुलींचे शासकीय वसतिगृह येथे इयत्ता 8 वी पासुन ते पुढील अभ्यासक्रमा करिता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.

          शालेय विद्यार्थीसाठी दि 15 जुलै 2022 इयत्ता 10 व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थीसाठी दि 30 जुलै 2022  बी.ए./बी.कॉम / बी.एस.सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमा मध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका / पदवी आणि एम.ए/ एम.कॉम./ एम.एस.सी असे पध्दती नंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यवसायीक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थी यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत हो दि 24 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. तर व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यर्थ्यांनी दि. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता देण्यात येतो.

          विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल त्यानी तेथुनच अर्ज प्राप्त करुन नमुद दिनांका पंर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विद्याथ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहीत वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह सबंधित वसतिगृहातच सादर करावेत, अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतिगृह तसेच संबंधित जिल्हयाचे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जळगांव येथे संपर्क साधावा, असे आवाहन, सहायक आयुक्त समाज कल्याण जळगांव वाय.पी.पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००