जळगाव, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) : - जळगाव जिल्ह्यातील सर्व अवजड मालवाहू वाहनधारकांना कळविण्यात येते की, केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शनानुसार सर्व नोंदणी प्राधिका-यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार मालवाहू वाहनांच्या बाबतीत सुधारित वजन हे अनिवार्य न करता ते ऐच्छिक करण्यात आले असून, अशा वाहनांचा सुधारित वजनावरील कर हा वाहनधारक वाहनामध्ये सकल भार क्षमता GVW वाढवून मिळण्यासाठी ज्या तारखेस अर्ज करेल त्या तारखेपासून वाहनकर सुधारित दराने घेण्यात येईल. तसेच एखाद्या मालवाहू वाहनाच्या नोंदणी पुस्तकामध्ये जो पर्यंत सुधारित भार क्षमतेची नोंद नोंदविली जात नाही अथवा जोपर्यंत वाहन मालक अशा वाहनाच्या बाबतीत वाढीव दराने कर भरत नाही तो पर्यत अशा वाहनांमधून सुधारित भार क्षमतेने माल वाहून नेता येणार नाही. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment