Friday, 8 July 2022

खरीपातील हंगामी पिकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत पाणी अर्ज करण्याचे आवाहन

 जळगाव, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) : - कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा फायदा घेणारे बागाईतदारांना दि. 1 जुलै ते 14 ऑक्टोबर, 2021 या कालावधीकरीता सुरु होणाऱ्या खरीप हंगाम 2022 मध्ये भुसार/अन्नधान्न्ये/चारा/डाळी/ कपाशी/भुईमुग व इतर हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार अटी व शर्तींवर पाणी अर्ज सादर करण्याची मंजुरी देण्याचे ठरले आहे.

तरी बागाईतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात दिनांक 31 ऑगस्ट, 2022 पर्यंत सादर करावे. असे आवाहन कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000


 

No comments:

Post a Comment