Tuesday, 27 September 2022

एक्सपोर्ट कॉनक्लेव्हचे आयोजन

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 27- उद्योग संचालनालया मार्फत "Conclave on Investment Promotion, Ease of Doing, Export & One District Product ही कार्यशाळा 29 सप्टेंबर ते 30 ऑक्टोंबर  या कालावधीत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केलेली आहे. जिल्हयातील निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नव उद्योजक, औद्योगिक संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, निर्यातदार व प्रगतीशील शेतकरी, शेतकरी सह संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, राज्य शासनाचे अधिकारी, निर्यात प्रचलन समितीचे सदस्य, निर्यात विषयक कामकाज करणारे सर्व घटक, व्यापारी बँका, इ. यांना आमंत्रित केलेले आहे.

                     या कार्यशाळेत निर्यात वृद्धी, उद्योग विषयक गुंतवणूक वृद्धी, एक जिल्हा एक उत्पादन व व्यवसाय सुलभीकरण बाबत विविध तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच निर्यातक्षम उत्पादनांचे (वस्तुंचे)  प्रदर्शनही 29 व 30 सप्टेंबर  रोजी सकाळी 10.00 ते 5.00 पर्यंत हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज, एमआयडीसी पोलिस स्टेशन जवळ आयोजित करण्यात आलेले आहे.

                   त्या अनुषंगाने जास्तीत जास्त उद्योजकांनी सदर कार्यक्रमास भेट देऊन मार्गदर्शन घ्यावे,  असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी  एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

                                                       000000

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची विशेष मोहिम

               जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 27 - शैक्षणिक तसेच त्रुटीपुर्तते अभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी 27 आणि 28 सप्टेंबर रोजी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या दिवशी सकाळी 10 ते 6 पर्यंत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिर समोर जळगाव या ठिकाणी ज्यांना ऑनलाईन, ई – मेलव्दारे त्रुटी कळविण्यात आली आहे, अशा उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सह सदर दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

          तसेच दक्षता पथक व सुनावणीसाठी प्रलंबित अर्जदारांना स्वतंत्ररीत्या संपर्क साधण्यात येईल. या कालावधीमध्ये आवश्यक ती पुर्तता करुन घेणे ही अर्जदाराची जबाबदारी राहील. या कालावधीमध्ये त्रुट/पुर्तता आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्यास होणाऱ्या नुकसानीस अर्जदार स्वता जबाबदार राहील, याची नोंद घेण्यात यावी असे  आवाहन सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी कळविले आहे.

                                        000000

Friday, 23 September 2022

विशेष मोहिम अंतर्गत जाहिर आवाहन

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -23-   शैक्षणिक तसेच इतर प्रकरणांचा निपटारा करणेकरीता कार्यायात दिनांक 27 सप्टेंबर, 2022 ते 28 सप्टेंबर, 2022 रोजी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. तसेच सदर दिवशी त्रुटीपुर्तते अभावी प्रलंबित असलेल्य प्रकरणांतील अर्जदारांनी दिनांक 27 सप्टेंबर, 2022 ते 28 सप्टेंबर रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी  10 ते 6 पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मार्यादेवी मंदिर समोर जळगाव या ठिकाणी आवश्यक त्या कागदपत्रांसह ज्यांना त्रुटी ऑनलाईन ई- मेलव्दारे कळविण्यात आली आहे. अशा उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सह सदर दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

          दक्षता पथक व सुनावणीसाठभ्‍ प्रलंबित अर्जदारांना स्व्तंत्ररित्या संपर्क साधण्यात येईल. तसेच सदर कालावधीमध्ये आवश्यक ती पुर्तता करुन घेणे ही अर्जदाराची जबाबदारी राहील. सदर कालावधीमध्ये त्रुटी / पुर्तत आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्यस होणाऱ्या नुकसानीस अर्जदार स्वता:  जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी, असे आवाहन सदस्य सचिव  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीव्दारे कळविण्यात आले आहे.

०००००

आठवडे बाजार नियमित दिवस ऐवजी इतर सोईस्कर दिवशी भरविणे बाबत

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -23-   पोलीस अधिक्षक जळगाव यांनी दिनांक 15 सप्टेंबर, 2022 रोजीच्या पत्रान्वये दिनांक 26 सप्टेंबर, 2022 ते 6 आक्टोंबर,2022 या कालावधीत दुर्गादेवी उत्सव-2022  साजरा होणार आहे. त्याचप्रमाणे दिनांक  26 सप्टेंबर, 2002 ते 06 ऑक्टोंबर, 2022 पावेतो चोपडा, धरणगाव, पारोळा, भडगाव या ठिकाणी याच काळामध्ये बालाजी वहनोत्सव व रथोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे जिल्हयातील सर्वत्र मोठया  प्रमाणावर दुर्गादेवी विसर्जन व वहनरथ या मिरवणुका  निघणार आहेत. तरी कायदा व व्यवस्थेच्या दृष्टीने जळगाव जिल्हयातील शहरातील व तालुका स्तरावरील आठवडे बाजार नियमित दिवस ऐवजी इतर सोईस्कर दिवशी ठेवणेबाबत विनंती केलेली आहे.

          जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत जळगाव , मुंबई मार्केट ॲण्ड फेअर्स ॲक्ट 1862 चे कलम 5 (अ) व (क) अन्वये करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन मी जळगाव शहरातील व तालुकास्तरावरील  दिनांक  26 सप्टेंबर, 2022 ते 06ऑक्टोंबर, 2022 रोजी जळगाव शहर व तालुक्यातील इतर ठिकाणी आठवडे बाजार भरणार असल्यास सदरचा आठवडे बाजार भरणार असल्यास सदरचा बाजार नियमित दिवस ऐवजी इतर सोईस्कर दिवशी भरविण्यास मंजूरी देत आहे. असे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000      

पसंतीचा नोंदणी क्रमांक जारी करण्याच्या शुल्कात वाढ

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -23-    जळगाव जिल्ह्यातील नागरीकांना कळविण्यात येते की, नविन वाहनाच्या पसंतीचा नोंदणी क्रमांक जारी करण्याच्या शुल्कात वाढ करण्याबाबत संदर्भिय शासनाचे प्रारुप नियमाची अधिसूचना दिनांक 15 सप्टेंबर, 2022 रोजी प्रकाशित करण्यात आलेली आहे.

            सदर अधिसूचनेतील मसूद्याच्या बाबतीत कोणत्याही नागरिकास हरकती किंवा सुचना घ्यावयाच्या असतील त्यांनी दिनांक 14 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत शासनाचे मा. अपर मुख्य सचिव, गृह विभाग (परिवहन) महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे अथवा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांचेकडे लेखी स्वरुपात सादर करण्यात याव्य असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

राष्टनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अंतर्गत फेरफार नोंदी निर्गत करण्याबाबत

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -23-  सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत / पूर्ण होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने सन 2013 मध्ये आपले सरकार सेवा पोर्टल सुरु केले आहे. सदर पोर्टल अंतर्गत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा विहीत कालमर्यादेत निपटारा होत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे.

            त्याअनुषंगाने सर्व सामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या सेवांचा निपटारा विहीत कालमर्यादेत होण्यासाठी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा दिनांक 17 सप्टेंबर, 2022 ते 2 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडभ्ल पत्र क्र. आरटीएस- 2022 प्र.क्र. 145 / लो. दिक दिनांक 12 सच्टेंबर, 2022 नुसार कळविले आहे. सदर सेवा पंधरवाडयामध्ये प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करण्याबाबतच्या विषयाचाही समावेश करण्यात आला आहे.

              महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी  एक महिन्याच्यावर प्रलंबित फेरफार निकाली काढण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व मंडळ मुख्यालयी विशेष मोहिम राबवून दिनांक 28 सप्टेंबर, 2022 बुधवार रोजी फेरफारअदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. सदर फेरफार अदालतीचे आयोजन करताना खालील सूचनांचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता घेण्यात यावी.

            सर्व प्रथम तहसील स्तरावर मंडळनिहाय एक महिन्याचे वर प्रलंबित असलेल्या साध्या व विवादग्रस्त फेरफारांची संख्या (Online MIS  प्रणालीचा वापर करुन ) निश्चित करण्यात यावी. एकही फेरफार नोंद तलाठी लॉगीला डॅशबोर्ड राहणार नाही याची ही दक्षता घ्यावी.

            जळगाव जिल्ह्यातील सर्व मंडळ मुख्यालयी विशेष मोहिम राबवून दिनांक 28 सप्टेंबर, 2022 रोजी बुधवार फेराफार अदालतीचे आयोजन करावे व सदर दिवशी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील व तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार / अ.का. यांची प्रत्येक मंडळासाठी संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात यावी.

            फेरफार अदालतीच्या दिवशी प्रलंबित फेरफार नोंदीच्या संदर्भात अर्जदार व हरकतदार यांना आवश्यक त्या पुराव्यांसह उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजाविण्यात यावी.  संबंधित मंडळ अधिकारी यांनी सर्व प्रलंबित फेरफार उपलब्ध अभिलेखावरुन नियमानुसार असल्याचे निष्पन्न होत असल्यास त्याच दिवशी प्रमाणित करण्यात यावेत.

            सदर परिपत्रकाची तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तंतोतंत अंमलबजावधी करावी व सेवा पंधरवाडयाचे यशस्वी आयोजन करावे, असे आवाहन  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

विद्यापिठातील आदिवासी मुलांच्या सुसज्ज वस्तीगृहातचे आदिवासी विकास मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन जळगाव येथे शुक्रवारी होणार कार्यक्रम, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

           जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -23-   जळगाव शहरातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आवारात उभारण्यात आलेल्या शासकीय आदिवासी मुलांच्या वस्तीगृहाचे इमारतीचे उद्घाटन व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री        डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते इमारतीचे उद्दघाटन केले जाणार असुन या कार्यक्रमात  आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण होणार आहे. या कार्यक्रमात राज्याच्या विविध मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे.

          एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने जळगावत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आवारात आदिवासी मुलांचे वस्तीगृह उभारण्यात आले आहे. या नूतन इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते केले जाणार असून या कार्यक्रमात उपस्थित मंत्री गणांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देखील वितरण केले जाणार आहे. तसेच योग व क्रीडा प्रशिक्षण समारोपचा कार्यक्रम देखील त्या दिवशी होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थितीत ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थितीमध्ये खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेश पाटील, विधान परिषद सदस्य एकनाथराव खडसे, सुधीर तांबे, चंदुलाल पटेल, किशोर दराडे, आमदार संजय सावकारे, आमदार चिमणराव पाटील, आमदार शिरिष चौधरी, आमदार  सुरेश उर्फ राजूमामा भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार सौ. लताताई सोनवणे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात विशेष निमंत्रित मध्ये आदिवासी विकास विभाग याचे सचिव अनुपकुमार यादव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी, नाशिक विभागीय आयुक्त हिरालाल सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत, अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, अधीक्षक अभियंता व्ही.ए.पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. तेव्हा दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेला शासकीय आदिवासी मुलांच्या वस्तीगृहाचे उद्घाटन केले जाणार असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पदवी प्रदान सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तेव्हा या कार्यक्रमांमध्ये सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, समाजसेवक, आदिवासी सेवक व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी केले आहे.

०००००

सन 2022-23 मध्ये नाशिक विभागात लोकसहभागातून 11560 वनराई बंधारे बांधण्याचा कृषि विभागाचा मानस....

         जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -23-  सन 2022-23  या वर्षात नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव जिल्हयांत मोठया प्रमाणात पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे सदयस्थितील ओढे-नाले यामध्ये मोठया प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. सदया पावसाळा संपत आल्याने ओढे-नाले यामधील वाहून जाणारे पाणी अडवून पिकांना संरक्षित सिंचन देणे, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणेसाठी वनराई बंधारे लोकसहभागातून बांधण्यात येणार आहेत.

          जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाळी हंगाम संपल्यानंतर ब-याच कालावधीपर्यंत नाले व ओढयांमधून पाण्याचा प्रवाह चालू असतो. हा पाण्याचा प्रवाह पारंपारिक पध्दतीने अडवून पाण्याचा साठा करून बिगर पावसाळी हंगामातील पिकासाठी संरक्षित पाणी घेण्यासाठी ग्रामपातळीवर पाण्याची गरज काही अंशी भागविण्यासाठी उपलब्ध साधनसामुग्रीचा ( सिमेंट / खतांची रिकामी पोती, माती, वाळू ई.) वापर करुन तात्पुरता बांधले

पत्याच्या परानुसार उदा०.६० मोलाच्या भागाकरिता लागणा-या पोत्यांचा तपशिल

का १० मो. याकरिता एकूण पोती २१०३९०६०-६५० ड) वनराई बंधा-याचा एकूण छेद छेद गाभा भितोचा छेद एकूण द  (ई) एक एक थरामध्ये रचताना सांधेमोड करून रचण्याची

दक्षता घ्यावी लागते. मध्ये बांधलेल्या वनराई बंधा-याचा तपशिल अ.क्र. जिला उपलब्ध झालेला आलेले क्षेत्र

६ अपेक्षित संरक्षित सिंचन क्षेत्र :

          वनराई बंधा-याद्वारे सरासरी २ हेक्टर क्षेत्रात संरक्षित सिंचन उपलब्ध होईल. काही ठिकाणी जास्तीचा पाणी साठा उपलब्ध होऊन सिंचन क्षेत्रात वाढ होऊ शकेल. नाशिक विभागात नाशिक जिल्हा ५२०० धुळे जिल्ला १७९०. नंदुरबार जिल्हा १८६०, जळगाव जिल्हा २७१० असे एकूण- ११५६० वनराई बंधारे कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येईल असे अपेक्षित आहे. वनराई बंधारे बांधणेवायत केलेल्या नियोजनाचे यशस्वीतेसाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. नाशिक विभागातील गावामध्ये सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सदर कार्यक्रमात लोकसहभाग नोंदवून वनराई बंधा-याची कामे यशस्वीपणे पूर्ण करणेस सहकार्य करावे असे आवाहन श्री. मोहन बाप विभागीय कृषि सहसंचालक यांनी आवाहन केले आहे. असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००

 

जात प्रमाणपत्राबाबत अधिका-यांनी घ्यावयाची काळजी

                  जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -23-  जातीचे प्रमाणपत्र देतांना संबंधीत अधिका-यांनी योग्य ती काळजी घ्यावी. जसा कोणावर अन्याय होणार नाही या दृष्टीकोणातून काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे प्रमाणपत्र देताना योग्य त्या कागदपत्रांची आपण पडताळणी केली आहे किंवा कसे याबाबत अधिका-यांनी जागृत रहावे, असे प्रतिपादन जात पडताळणी समितीचे अध्यक्ष श्री. गुलाबराव खरात यांनी येथे केले. सामाजिक न्याय विभागातर्फे जिल्हयातील संबंधीत अधिका-यांची कार्यशाळा आज मा.जिल्हाधिकारी जळगाव यांच्या दालना शेजारील मिटींग हॉल मध्ये झालो.         श्री. गुलाबरावजी खरात अध्यक्षस्थानी होते. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी  समितीचे उपायुक्त, राकेश पाटील, तसेच जळगांव जिल्हयातील उपविभागीय अधिकारी भुसावळ श्री. रामसिंग सुलाणे उपविभागीय अधिकारी जळगांव श्री. महेश सुधळकर, उपविभागीय अधिकारी एरंडोल विनय गोसावी, उपविभागीय अधिकारी अमळनेर श्रीमती सीमा अहिरे, उपविभागीय अधिकारी चाळीसगांव श्री. लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय अधिकारी पाचोरा, श्री. विक्रम बांदल, उपविभागीय अधिकारी फैजपुर श्री. कैलास कडलग, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राहूल पाटील तसेच त्यांचे कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

                   श्री.गुलाबराव खरात यांनी अधिका-यांशी संवाद साधला जातीचे प्रमाणपत्र देताना आपण आवश्यक ती जबाबदारी घेतली पाहीजे. जातीचे नावे नावांमधील साधर्म्य कोणत्या कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. कोणत्या समाजाबददल कागदपत्रांची उपलब्धता नसतांना कोणते दाखले विचारात घ्यावेत. जातीचा उल्लेख अनेकदा शैक्षणीक कागदपत्रात नसतो त्यावेळी कोणत्या कागदपत्रांचा उपयोग करावा. यासह विविध मुद्द्यावर विश्लेषण करण्यात आले.

                    सहभागी अधिकारी कर्मचा-यांनी शंकाचे निरसन करुन घेण्याचा प्रयत्न केला. उपायुक्त राकेश पाटील यांनी प्रस्तावीक केले.  तसेच एम. जे. महाविदयालय जळगांव येथे सन 2022-23 या वर्षात इयत्ता 11 वी 12 विज्ञान शाखेच्या विदयार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत श्री. राकेश पाटील, उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव यांनी मार्गदर्शन केले तसेच 11 वी 12 वी विज्ञान महाविदयालयाच्या प्राचार्य तसेच कनिष्ठ लिपीक, यांना जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जाबाबत उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राकेश पाटील, जळगाव यांनी मार्गदर्शन केले.

०००००

Tuesday, 20 September 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचे लोकार्पण

 



                जळगांव दि.20 (जिमाका) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार,पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत,  ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन , खासदार उन्मेष पाटील आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, राजू भोळे, विभागीय आयुक्त  राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया आदी उपस्थित होते.

०००००


Thursday, 15 September 2022

स्मार्टअंतर्गत प्रकल्पाचे 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) :  बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत समुदाय आधारीत संस्थांकडून मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत, असे आत्माचे प्रकल्प संचालक संभाजी ठाकूर यांनी कळविले आहे.

शेतमाल आधारीत मुल्यखळी विकासाचे उपप्रकल्प शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्रकल्प संचालक, आत्मा, प्लॉट नं. 10, पुष्पराज बिल्डींग दिक्षीतवाडी, जळगाव कार्यालयात तसेच इतर उपप्रकल्प संबंधित लोकसंचलित साधन केंद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी, माविम आणि प्रभाग संघांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक, एमएसआरएलएम यांचे कार्यालयात मुदतीत अर्ज सादर करावेत.

शेतमाल, शेळया (मांस व दूध) आणि परसबागेतील कुक्कूटपालन (अंडी) यांच्या मुल्यसाखळी विकासाच्य उपप्रकल्पांसाठी अर्ज आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारीत संस्थांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाव्दारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे. 

  जाहिराती संदर्भातील माहिती, अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इ. माहिती  http://www.smart-mh.org यावर  Call for Proposal  या टॅबमध्ये आहे. यापूर्वी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अर्ज सादर केलेला असल्यास पुनश्च: अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट घ्यावी. त्यामध्ये माहिती भरुन व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून उपप्रकल्प प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही ठाकूर यांनी केले आहे. 

                                                                  ******

नूतन मराठा महाविद्यालयात पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा):  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 28 सप्टेंबरला सकाळी 10 वा. नूतन मराठा महाविद्यालय सभागृह, कोर्ट रोड, जळगाव येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा होत आहे. मेळाव्यासाठी खासगी आस्थापनांनी 316 रिक्तपदांची मागणी नोंदवली आहे. या रिक्तपदांसाठी 12 वी पास, आयटीआय, पदविकाधारक,  पदवीधर आणि इतर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा. मुकणे यांनी केले आहे.  

याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.45 ते संध्या 6.15 या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि नूतन मराठा महाविद्यालयाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. पात्र उमेदवारांनी स्वखर्चाने, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो आदींसह मेळाव्यास उपस्थित रहावे.

 विभागाचे संकेतस्थळ  www.mahaswayam.gov.in यावर नोंदणी न केलेल्या उमेदवारांनी त्वरित नाव नोंदणी करावी. ऑनलाईन नाव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युजर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध सुविधांचा आणि माहितीचा देखील उमेदवारांना लाभ घेता येतो, असेही त्यांनी कळवले आहे.

                                                                               00000

दंडाची रक्कम वसुली करणेकामी जप्त केलेल्या मालमत्तेचा जाहिर लिलावाव्दारे विक्री

         जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -15- महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 176 अन्वये जमीन महसुलाची वसुली करणे बाबत तरतुद आहे. त्यानुसार श्री. संजय घनश्याम शर्मा यांचेकडे करमणुक केबलची थकीत प्रलंबीत  रक्कम रुपये 31.73,478/- प्रलंबीत असुन त्यानुसार प्रस्तुत थकबाकीची रक्कम पुर्णत: वसुल करण्यासाठी संबधित थकबाकीदार यांच्य नावे असलेल्या स्थावर मालमत्ता त्याची मेहरुण शिवारातील सामाईक मालकीचे नाव असलेली बिनशेती क्षेत्र गट नं. 463/1/2 मधील भुखंड 4 क्षेत्रा 289 पैकी 72.25 चौ.मी.वर रक्कम रुपये 31.73.478/- अक्षरी ऐकतीस लाख त्रयात्तर हजार चारशे अठठयात्तर मात्र बोजा दाखल करण्यात आलेला आहे. करमणुक कराच्या थकबाकीचा बोजा बसवुन महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील तरतुद नुसार लिलाव करुन थकबाकीची रक्कम लिलावाच्या रक्कमेतुन वसुल करण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार फेरफार क्र / 94002/दि. 8 जुलै, 2021 रोजी नोंद करण्यात आलेली असुन 7/12 उताऱ्यावर सरकार नांव लावण्यात आलेले आहे. तरी या जागेचे दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी तहसिल कार्यालय जळगाव येथे लिलाव करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती किंवा संस्थांनी लिलावात भाग घ्यावा लिलावातील अटी व शर्ती लिलावातील जागा लिलावातील बोलहातची किंमत इत्यादी बाबत तहसिलदार जळगाव यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

००००

 

Wednesday, 14 September 2022

लंपी रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना अमलात आणा -जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव दि १२ (जिमाका वृत्त सेवा)  जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 29 ठिकाणी जनावरांमध्ये लंपी स्किन डीसीज (Lumpy Skin Disease)  आढळून आला आहे. या रोगाचा प्रसार  निरोगी पशुधनास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा आजार विषाणुजन्य आणि सांसर्गिक असल्याने या रोगाचा प्रसार होउ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ अंमलात आणण्याचे निर्देश 

  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी  दिले. 


 संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार पशुधनातील लम्पी स्किन या रोगाचे प्रतिबंध नियंत्रण व निमूर्लन करण्यासाठी खालील प्रमाणे निर्देश देण्यात आले  आहेत.


 १. जनावरांची खरेदी विक्री साठीचे जळगाव जिल्ह्यातील गुरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात यावे जिल्हयातील इतर राज्यामधुन आंतरराज्य सिमेवरुन पशुधनाची होणारी वाहतुक बंद ठेवण्यात यावी त्याकरीता जिल्हा पोलिस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनी आंतरराज्य सीमेवरील चेक नाक्यावर कसुन तपासणी करावी.

२. पशुधन एकत्र येतील असे सार्वजनिक चराई व सार्वजनिक गुरांसाठीचे पाणी पिण्याचे सार्वजनिक हौद पुढील 15 दिवस बंद ठेवण्यात यावे.

  ३.ह्या रोगाचा प्रसार बाहय किटकांव्दारे ( डास, माश्या, गोचीड इत्यादी) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठयात बाहय किटकांच्या निर्मुलनासाठी ग्रामपंचायतीनी पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने औषधांची फवारणी करावी.

४.  बंदिस्त  परिसरात गोठा स्वच्छता तसेच निर्जंतुक द्रावणाची फवारणी करावी.

 ५. ग्रामपंचायतीनी पशुधन मृत झाल्यास त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी 4 बाय 8 फुट आकाराचे खड्डे करण्याची व्यवस्था करावी. सदर व्यवस्था ग्रामपंचायत स्तरावर शक्य् नसल्यास गट विकास अधिकारी यांचे मार्फत बांधकाम विभाग पंचायत समिती किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे करण्याची व्यवस्था करावी. पशुधन विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पध्दतीने मृत पशुधनाची विल्हेवाट लावावी.


५.सर्व खाजगी पदविकाधारक यांनी / पशुपालकांनी LSD  आजाराची माहिती शासकीय पशुवैदयकीय संस्थेस देणे बंधरकारक आहे. LSD आजराचे उपचार पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांचे मार्गदर्शनानुसारच करण्यात यावे. ६.खाजगी पदविकाधारक यांनी LSD चे परस्पर उपचार केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

  जळगाव जिल्हयातील सर्व पशुवैदयकिय संस्थांनी LSD उपचारासाठी आवश्यक सर्व औषधी वरिष्ठांशी चर्चा करुन उपलब्ध करुन घेण्यात याव्यात.असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव अभिजीत राऊत यांनी कळविले आहे. 

 ०००००

Monday, 12 September 2022

पाण्यात विद्राव्य खतांचे वापराबाबत शेतकऱ्यांना आवाहन

              जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -12विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग नाशिक मोहन वाघ, , व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगांव संभाजी ठाकुर, यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव जिल्हयात 16 भरारी पथकांतील गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांचेमार्फत कृषि सेवा केंद्राच्या तपासण्या सुरू आहेत. दरम्यान, कृषि केंद्र चालकांनी निकृष्ट दर्जाचे विद्राव्य खतांची विक्री करु नये असा इशारा कृषि विभागाने विक्रेत्यांना दिला आहे. तसेच कृषि निविष्ठा खरेदी करतांना शेतकन्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हयातील शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे.

          श्री.मोहन वाघ, विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जळगाव अरुण तायडे, , यांनी मे. महेश कृषि केंद्र, रावेर या खत विक्री केंद्रातुन मे. अॅडव्हांस अॅग्रो इंडस्ट्रीज, शेंद्रा एमआयडीसी, औरंगाबाद यांनी उत्पादित केलेले विद्राव्य खत 12:61:0 बॅच क्र. A-12-19.06.2022 व विद्राव्य खत 19:19:19 बॅच क्र. A-19-1 09.06.2022 चे नमुने तपासणीसाठी घेतले असता खत तपासणी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार मोठया फरकाने अप्रमाणित झाले आहे. त्यानुसार विक्रेत्याकडील उर्वरित साठयास खत नियंत्रण आदेश 1985 नुसार विक्री बंद आदेश देण्यात आले असून जिल्हयातील इतर खत विक्रेत्यांनी वरिल बॅच नंबरचे खतांची विक्री करू नये, तसे आढल्यास खत नियंत्रण आदेश 1985 नुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद विक्रेत्यांनी घ्यावी. अशा सुचना मोहन वाघ, विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक यांनी विभागातील सर्व निरीक्षकांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

जिल्हा खो-खो क्रीडा प्रशिक्षण केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन दोन सत्रात खेळाडूंना विनामूल्य प्रशिक्षण

  जळगाव (जिमाका वृत्त सेवा) दि. -12-   जिल्ह्यात  खो खो खेळाचा प्रचार व प्रसार करणे, खेळाडुंना तंत्रशुध्द प्रशिक्षण देणे तसेच  खेळाच्या विविध अत्याधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करणे या दृष्टिने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत

श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे जिल्हा खो-खो क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना केलेली आहे. सदर क्रीडा प्रशिक्षण केंद्राअंतर्गत खो-खो या खेळाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक यांची सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली असुन त्याच्या मार्फत श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल,जळगाव येथे सकाळ व संध्याकाळ या दोन सत्रात खेळाडुंना विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/ संस्था, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील शाळा, विविध क्रीडा संघटना व क्रीडा मंडळे यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्या / विद्यार्थ्यींना सदर प्रशिक्षण केंद्राचा लाभ घेण्याबाबत सुचित करावे, तसेच प्रशिक्षण केंद्रावरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नांवाची यादी सहीसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे पाठवावी अधिक माहितीसाठी  (राज्य क्रीडा मार्गदर्शक –खो-खो) मिनल थोरात – 8625946709 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

                                                                      000000

Friday, 9 September 2022

आधार जोडणीसाठी 11 सप्टेंबर, 2022 रोजी विशेष शिबीराचे आयोजन....

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -9-  मा.भारत आयोगाच्या सुचनांनुसार मतदान कार्ड आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची मोहिम दि.01 ऑगस्ट 2022 पासून सुरु झालेली असून आतापर्यंत जळगाव जिल्हयात  एकूण 7,40,445 मतदारांनी  मतदार ओळखपत्रास आधार  क्रमांक जोडणी केलेली आहे.

          सदर कार्यक्रमात मतदारांचा सहभाग वाढावा या हेतुने मतदान ओळखपत्र आधार कार्डशी जोडणीसाठी दि.11 सप्टेंबर, 2022 रोजी जिल्हाभरात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सदर दिवशी मतदार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपले मतदान केंद्रावर पुर्णवेळ हजर राहतील तसेच मतदार नोंदणी अधिकारी / सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात नमूना अर्ज 6 ब भरुन  मतदान ओळखपत्राशी आधार जोडणी करता येईल किंवा  NVSP, VHP या पोर्टलचा  देखील वापर करून ऑनलाईन आधार जोडणी मतदारास करता येणार आहे.

          तरी जळगांव जिल्हयातील सर्व मतदारांनी दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित विशेष शिबीराचा लाभ घ्यावा,  व आपले मतदान ओळखपत्र आधार क्रमांकांशी जोडणी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे वतीने व उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

०००००

19 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -9-  समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, शासकीय यंत्रणांकडून सोडवणुकीसाठी समाजातील पीडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होवून प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याचा तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी हा उपक्रम राबविण्यात येतो. त्यानुसार सोमवार दिनांक 19 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली offline आयोजित करण्यात आलेला आहे. या लोकशाही दिनी ज्या महिलांना अर्ज करायचा असेल त्यांनी आपला अर्ज आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ई- मेलवर पाठवावा. तसेच अर्जामध्ये आपला व्हॉटसॲप क्रमांक नमूद करावा, जेणेकरुन या लोकशाही दिनाची लिंक व पासवर्ड अर्जदारास उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी        डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

ई- मेल आयडी असे : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव- dwcwjal@gmail.com, तहसीलदार, जळगाव- tahasildarjalgaon@gmail.com, तहसीलदार, जामनेर- tah.jamner@gmail.com, तहसीलदार, एरंडोल- erandoltahsil123@gmail.com, तहसीलदार, भुसावळ- tahsilbhusawal@gmail.com, तहसीलदार, धरणगाव- dharangaon2014@gmail.com,तहसीलदार, बोदवड- tahsilbodwad@gmail.com तहसीलदार, यावल- tyawal@gmail.com, तहसीलदार, रावेर- tahsilraver@gmail.com, तहसीलदार, भडगाव- tahsildarbhadgaon@gmail.com, तहसीलदार, चाळीसगाव- tahsildar40gaon@gmail.com, तहसीलदार, अमळनेर- amalnertahsil@gmail.com, तहसीलदार, पारोळा- parolatahsil@gmail.com, तहसीलदार, पाचोरा- tahsilpachora@gmail.com, तहसीलदार, मुक्ताईनगर- tahsilmkt@gmail.com, तहसीलदार, चोपडा- tahsidarchopda@gmail.com.

                                                                             00000

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -9-  व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिये अंतर्गत 2022-23 या शैक्षणिक वर्षात आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी व संबंधित शैक्षणिक संस्थांनी जाती प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहीत मुदतीत सादर करावेत, असे आवाहन जळगाव जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी  भा.उ.खरे यांनी केले आहे.

          सीईटी, जेईई, नीट, गेट, नाटा तसेच पदविका अभ्यासक्रम पुर्ण करुन पदवी करीता व्यावसायीक अभ्यासक्रम प्रक्रियेअंतर्गत अंतर्गत आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ज्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव कार्यालयात अर्ज दाखल केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी  bartievalidity.maharashtra.gov.in  या संकेतस्थळाला भेट देऊन तात्काळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करुन त्याची एक प्रत दिनांक 15 सप्टेंबर, 2022 पर्यंत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव या कार्यालयाकडे सादर करावी, असे आवाहन  सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती  भा.उ. खरे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

०००००


 

Thursday, 8 September 2022

लम्पि चर्मरोग आढावा बैठक जनावरांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश


मृत जनावरामागे प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत

मृत जनावरांचे तात्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश

आंतरराज्य जनावरांची वाहतूक बंद

  जळगांव दि.८ (जिमाका)- लम्पि चर्मरोग या जनावरांमधील आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करत असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहे. जनावरांचे लसीकरण करणे ही महत्त्वाची उपाययोजना आहे. त्यामुळे यंत्रणांनी लसीकरणाला प्राधान्य  देत लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यकांचीही मदत घ्यावी असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.

  लम्पि चर्मरोग या जनावरांमधील संसर्गजन्य आजारासंदर्भात पशुसंवर्धन मंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीपूर्वी त्यांनी मस्कावद, खिरोदा, फैजपूर येथे पशुंची पाहणी करून पशुपालकांशी संवाद साधला.  

  या बैठकीस खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार एकनाथ खडसे, आमदार सुरेश भोळे,  पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. व्ही. शिसोदे आदी उपस्थित होते.

श्री. विखे पाटील  म्हणाले की, या रोगामुळे जनावरांचा मृत्यू होऊ नये म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मृत जनावरांच्या पशुपालकास प्रत्येकी 10 हजारांची मदत शासन करणार आहे. बाधीत जनावरांचा उपचार व अबाधित जनावरांचे लसीकरण शासनातर्फे मोफत करण्यात येत आहे.  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या सर्व पशुचिकित्सालयांमध्ये प्रतिबंधात्मक औषधांचा व अन्य औषधोपचारासाठी आवश्यक औषधांचा साठा पुरेसा असल्याची खात्री करावी. लसीकरण हा प्रतिबंधात्मक उपाय युद्धपातळीवर राबविणे आवश्यक असून त्यासाठी शासकीय पशुवैद्यकांना मदतीसाठी खाजगी पशुवैद्यकांनी मदत करावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा व खाजगी पशुवैद्यकांच्या सेवा घ्याव्या. सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासनातल्या यंत्रणा आणि पशुपालक शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण या संसर्गजन्य आजाराच्या साथीतून आपले पशुधन सुरक्षित ठेवू, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. या व अशा अन्य साथीच्या आजारांसाठी पशुविज्ञान विद्यापीठ व पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्त पणे उपाययोजना राबवाव्या. राज्य शासनाच्या प्रयोगशाळांचा आणि विद्यापीठांतील प्रयोगशाळांचा समन्वय साधून त्या योगे अधिक संशोधन करावे व पशुधनाला सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्या, संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. आंतरराज्यीय, आंतर जिल्हा, आंतर तालुकास्तरावर जनावरांची ने आण बंद करण्यात आली आहे, अशी माहिती श्री विखे पाटील यांनी दिली.

  या बैठकीत उपस्थित खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार एकनाथ खडसे, आमदार सुरेश भोळे,यांनीही महत्वाच्या सुचना केल्या. त्यात पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकांची रिक्तपदे भरणे,लसीकरणासाठी आवश्यक निधीची तरतूद करणे, जनावर दगावल्यास शेतकऱ्यास मदत मिळवून देणे, जनावरांसाठी घेतलेले कर्ज माफ करावे, विम्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा आदी मुद्यांचा समावेश होता. 

जिल्ह्यातील नियंत्रण उपाय योजना

1 बाधित पशुधनावर नियमित औषध उपचार

2 सावदा व रावेर येथील जनावरांचे बाजार तात्काळ बंद

3 जिल्हा नियोजन समितीकडून लस खरेदीसाठी 5 लाख एवढा निधी तात्काळ उपलब्ध

4 रिंग पध्दतीने 90 हजार 163 जनावरांचे लसीकरण पूर्ण

5 जिल्ह्यातील जनावरांचे सर्व बाजार बद

6. आंतरराज्यीय जनावरांची वाहतूक बंद


जिल्ह्यातील सद्यस्थिती-

1 जिल्ह्यातील एकूण पशुधन 8 लाख 46 हजार 407 (गाय वर्ग 577302, म्हैस वर्ग 269105)

2. आठ तालुक्यांत 29 बाधित क्षेत्र

3. 90 हजार 163 पशूधन लसीकरण करण्यात आले (उद्दिष्ट्य 1 लाख 6245 )

4. जिल्ह्यात एकूण बाधित पशूधन – 392

5. एकूण बरे झालेले पशूधन- 242

6. सद्यस्थितीत आजारी- 138

7. एकूण मृत्यू- 12


                                                                          ०००००

लम्पी स्कीन डीसीज झालेल्या जनावरांवर शासकीय पशुचिकित्सालयात उपचार करून घ्यावेत - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील





 •मस्कावद, खिरोदा,  फैजपूर येथे पाहणी करून पशुपालकांशी साधला संवाद

जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) : जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसीजची लक्षणे आढळून येताच जनावरांना शासकीय पशुचिकित्सालयात आणावे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पशु चिकित्सालयात आवश्यक पशु औषधे उपलब्ध करून देण्यात येतील, असे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितले.

मंत्री श्री. विखे पाटील यांनी आज दुपारी मस्कावद, खिरोदा आणि फैजपूर येथे भेट देवून जनावरांवर झालेल्या लंपी स्कीन डीसिज बाधित गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पशुपालकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी 

खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, 

पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. व्ही. शिसोदे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले, लम्पी स्कीन डिसीज आजार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील. या आजारामुळे मृत झालेल्या जनावरांचे पंचनामे करून नोंद ठेवावी. लम्पी स्कीन डिसीज वरील उपचाराची पद्धती निश्चित करून औषधोपचार करावेत. 

लम्पी स्कीन डिसीजचा प्रसार होऊ नये म्हणून लसीकरण मोहीम अभियान स्तरावर राबवावी. तसेच पशुपालकांनी घ्यावयाची काळजी याविषयावर जनजागृती मोहीम राबवावी. सर्व पशुचिकित्सालयात आवश्यक औषधांचा साठा करून ठेवावा. यावेळी मंत्री श्री. विखे पाटील यांनी पशुपालकांशी संवाद साधला. त्यांनी लम्पी स्कीन डीसीज झालेल्या जनावरांमधील  लक्षणे, आतापर्यंत केलेले औषधोपचार याविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी लोकप्रतिनिधी, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                                        ०००००

Wednesday, 7 September 2022

शेततळ्याच्या अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, दि. 7 - शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनेतून शेततळ्याचे खोदकाम केले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना तसेच सामूहिक शेततळ्यासाठी असलेल्या योजनांचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर सिंचन सुविधा घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

                                                                       ****

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पदभरतीसाठी मुदतवाढ

    जळगाव,  दि. 7 - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव अंतर्गत लिगल एड डिफेन्स कॉन्सिलमध्ये मुख्य, उपमुख्य्, सहायक पदांसाठी भरतीची मुदत 7 सप्टेंबरहून वाढवून 15 सप्टेंबर केली आहे. पदांची सविस्तर जाहिरात जिल्हा व सत्र न्यायालय, जळगावच्या संकेतस्थळावर आहे. पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी केले आहे.

                                                                 ******

Friday, 2 September 2022

उत्कृष्ट गणेश मंडळांनी पुरस्कारासाठी 2 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव (जिमाका वृत्त सेवा) दि. 1 - गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पर्यावरण, सामाजिक सलोखा यांसारख्या विविध विषयांवर आधारित देखावा व सजावट करणाऱ्या उत्कृष्ट मंडळांना राज्य शासनाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी उत्कृष्ट सजावटी करणाऱ्या गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या ईमेलवर 2 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यातील पहिल्या तीन उत्कृष्ट गणेश मंडळांना प्रथम पुरस्कार 5 लाख रुपये, द्वितीय 2 लाख 50 हजार रुपये व तृतीय 1 लाख रुपये पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर देखील पुरस्कार दिले जाणार आहेत. यासाठी गणेश मंडळांनी पर्यावरण पूरक सजावट, ध्वनीप्रदूषणरहित वातावरण, पाणी बचत, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा, समाज प्रबोधन विषयावर देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीतील देखावा, रक्तदान शिबिर, वैद्यकीय सेवा शिबिर, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक कार्य, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्यासाठी शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक आदींबाबत केलेले कार्य, पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक खेळाच्या स्पर्धा आदीबाबत देखावे व कार्यक्रमाचे आयोजन केलेले असावे.
स्पर्धेतील उत्कृष्ट मंडळाची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीमार्फत निवड करण्यात येणार आहे. समितीमध्ये शासकीय व शासनमान्य कला महाविद्यालयाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी व पोलिस अधिकारी सदस्य म्हणून असणार आहेत. सहभागासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही, असे शासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
******

सुक्ष्म सिंचन संचासाठी पूरक अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव (जिमाका वृत्त सेवा) दि. 1- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक सन 2022-23 अंतर्गत सुक्ष्म सिंचन संचाचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील रु. 1.50 लक्ष मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत पूरक अनुदानासाठी लाभ घेण्यासाठी सुक्ष्म सिंचन संचाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी www.mahabtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन अति.मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांनी केले आहे. विविध योजनांतर्गत सुक्ष्म सिंचन संचाकरिता खालीलप्रमाणे अनुदान देय आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, देय अनुदान टक्के – अल्प,अत्यल्प भूधारक -55 टक्के बहु भूधारक – 45 टक्के, योजनेचे नाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना , देय पूरक अनुदान – 35 टक्के, 45 टक्के, एकूण देय अनुदान -90 टक्के, अटी व शर्ती – लाभार्थी अनु. जाती ,जमाती प्रगर्वाचा असावा, अनु. जाती करिता वार्षिक उत्पन्न मर्या 1.50 लक्षपर्यंत असावी.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, देय अनुदान टक्के – अल्प,अत्यल्प भूधारक -55 टक्के बहु भूधारक – 45 टक्के, योजनेचे नाव – मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, देय पूरक अनुदान – 25 टक्के, 30 टक्के, एकूण देय अनुदान -80 टक्के, 75 टक्के अटी व शर्ती – लाभार्थी अनु. जाती, प्रवर्गाच्या लाभार्थ्यांकरिता वार्षिक उत्पन्न मर्या 1.50 लक्ष पेक्षा जास्त असावी, इतर प्रवर्गाकरिता उत्पन्न मर्यादा नाही.
योजनेचे नाव – प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, देय अनुदान टक्के – अल्प,अत्यल्प भूधारक -55 टक्के बहु भूधारक – 45 टक्के, योजनेचे नाव – अटल भूजल योजना, देय पुरक अनुदान – 25 टक्के, 30 टक्के, एकूण देय अनुदान -80 टक्के, 75 टक्के अटी व शर्ती – लाभार्थी अटल भूजल योजनेंतर्गत समाविष्ट असणाऱ्या गावातील असावा, असे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी कळविले आहे.
******

गणेशोत्सव कालावधीत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या नेमणुका

जळगाव – : जळगाव जिल्ह्यात 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत मोठ्या उत्साहात श्री. गणेशोत्सव साजरा होत आहे. गणपती मिरवणुका व विसर्जनाचा कार्यक्रम दृष्टीकोनातून गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या नेमणुका केल्या असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कळवले आहे.

कायदा व सुव्यवस्था परिस्थितीबाबत अहवाल सादर करावा. नियुक्त केलेले सर्व कार्यकारी दंडाधिकारी यांनी 31 ऑगस्ट, 2022 ते 9 सप्टेंबर,2022 पर्यंत श्री गणेशोत्सव या सणाच्या कालावधीत नेमणुकीच्या ठिकाणी बिनचूकपणे हजर रहावे. इतर आवश्यक परिस्थितीचा आढावा घ्यावा. कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी सतर्क राहून दक्षता घेण्यात यावी. संभाव्य अथवा घडलेला अनूचित प्रकाराबाबत दूरध्वनी अथवा बिनतारी संदेशाव्दारे तत्काळ जिल्हादंडाधिकारी, अप्पर जिल्हादंडाधिकारी यांना कळवावे, असे जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेशित केले आहे.
*****

शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

जळगाव,(जिमाका): एकात्मिक फलोत्पादन विकास, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करण्यास इच्छुक, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी फळपिकांच्या बागा असलेल्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन घटकाखाली अर्ज करावेत, योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

*****

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतील प्रस्तावांना मंजुरी द्या - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतील प्रस्तावांना त्वरीत मंजुरी देण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेबाबत कृषी प्रक्रिया जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. राऊत बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित राऊत, भारतीय स्टेट बँकेचे अमित कुमार, अशोक वाघेला, अरुण प्रकाश, जिल्हा अग्रणी बँकेचे श्रीकांत झांबरे, इतर बँकांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते. कृषी विभागामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक हरी बाबतीवाले, वैभव शिंदे, कृषी विकास अधिकारी तुषार गोरे, जिल्हा संसाधन व्यक्ती उपस्थित होते.
या कार्यक्रमात सन 2022-23 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा संसाधन व्यक्ती सचिन धुमाळ, प्रशांत पाटील व दिनेश गवळे यांना या योजनेत जास्तीत जास्त प्रस्ताव प्राप्त करुन बॅकांमार्फत कर्ज मंजुरी मिळून देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या. दोन्ही बँकांच्या विभागीय व्यवस्थापक यांना कृषी विभागामार्फत जिल्हाधिकारी यांच्याहस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची घडीपत्रिका व पोस्टरचे विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भोकरे यांनी केले.
*****

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना विशेष गौरव पुरस्कार

जळगाव - राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या, देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य तसेच सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषयक पुरस्कार मिळवणारे आणि शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये इ. 10 वी व इ. 12 वी बोर्डात 900 पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण आयआयटी, आयआयएम व एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक पाल्यांना सैनिक कल्याण विभागाकडून विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

या विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी पात्र असलेल्या माजी सैनिक, पत्नी पाल्यांनी जिल्हा सैनिक कार्यालयात उपलब्ध असलेले कागदपत्रांसाठी 20 सप्टेंबर,2022 पर्यंत कार्यालयात संपर्क साधावा.
ओळखपत्राची छायांकित प्रत, 10 वी , 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नावे असलेल्या पानाची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत तसेच इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावेत. या संधीचा जास्तीत जास्त लाभ माजी सैनिकांनी घ्यावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.
******

माजी सैनिक विधवांच्या पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार

जळगाव - शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये इ.10 वी व 12वी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी 20 सप्टेंबरपूर्वी अर्ज सादर करावा. जास्तीत जास्त माजी सैनिक विधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

अर्जासोबत डी.डी., चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट, 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची व बोर्डाचे सर्टिफिकेटची छायांकित प्रत, ओळखपत्राची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत जोडावी, असेही त्यांनी कळविले आहे.
00000

पी एम किसान (PM Kisan) सन्मान निधीसठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट

जळगाव (जिमाका) :- पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया 31 ऑगस्ट 2022 पर्यंत कण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. सदर मुदतीत ई- केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थीस पी एम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही.तरी सर्व लाभार्थी यांनी www.pmkisan.gov.in या website ला जाऊन farmer corner या टॅब मध्ये किंवा pmkisan मोबाईल ऍप मध्ये OTP द्वारे मोफत e -KYC करता येईल(सोबत लिंक दिली आहे) किंवा नजिकच्या CSC केंद्राशी संपर्क साधुन आपली ई- केवायसी तात्काळ करुन घ्यावी . . अधिक माहितीसाठी कृषी विभागातील कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक,मंडळ कृषी अधिकारी ,तालुका कृषी अधिकारी तसेच तलाठी आणि महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगांव यांनी केले आहे.

https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx या लिंकवर ई- केवायसी करता येईल.
00000

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केली ई - पीक पाहणी ऍपद्वारे नोंद !



(जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या स्वत:च्या शेतावर जाऊन ई-पीक पाहणी ऍपच्या माध्यमातून पेर्याची नोंद केली. सर्व शेतकर्यांनी आपापल्या शेतातील पेरणीबाबतची माहिती यात अपडेट करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.

पाळधी शिवारात असणार्या आपल्या शेतात जाऊन ई-पीक पाहणी ऍपच्या माध्यमातून शेतातील पेर्याची नोंद त्यांनी केली.
राज्य शासनाच्या महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकर्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या मोबाईल ऍप द्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड / कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे. या स्मार्टफोन ऍप्लीकेशनची सुधारित २.० आवृत्ती ही १ ऑगस्टपासून सादर करण्यात आली आहे. यात शेतकर्यांना एक मुख्य आणि तीन दुय्यम खरीप पिकाची नोंद करण्यची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.
या माध्यमातून अगदी अक्षांक्ष व रेखांशनुसार शेतीतील पिकांची नोंद करण्यात येते. या पीक पाहणीत एकदा नोंद केल्यानंतर त्यात बदल करायचा असल्यास ४८ तासांची मुदत देखील देण्यात आली आहे. या सर्व सुविधांचा शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.
दरम्यान, केंद्र व राज्य शासनाने शेतकर्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून यात पीएम किसान योजनेसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन देखील गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले आहे. यावेळी सोबत माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, प्रगतशील शेतकरी नारायणआप्पा सोनवणे, सरपंच प्रकाश पाटील, माजी सरपंच अरुण पाटील, कोतवाल राहुल शिरोळे , किशोर शिरोळे , योगेश पाटील, विजय पाटील , अनिल माळी , आबा माळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
00000

वाहनाचे इरादा पत्र आता ऑनलाईन मिळणार

(जिमाका वृत्तसेवा) : ऑल इंडिया पर्यटन वाहन (AC/Non AC ) महाराष्ट्र AC, स्लीपर बस इत्यादी परवान्याची सेवा ऑनलाईन करण्यात आली आहे. नागरिकांना याबाबतचे इरादा पत्र ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पत्राचे प्रिंट प्राप्त करुन घेता येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.

०००००