Friday, 2 September 2022

पी एम किसान (PM Kisan) सन्मान निधीसठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट

जळगाव (जिमाका) :- पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया 31 ऑगस्ट 2022 पर्यंत कण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. सदर मुदतीत ई- केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थीस पी एम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही.तरी सर्व लाभार्थी यांनी www.pmkisan.gov.in या website ला जाऊन farmer corner या टॅब मध्ये किंवा pmkisan मोबाईल ऍप मध्ये OTP द्वारे मोफत e -KYC करता येईल(सोबत लिंक दिली आहे) किंवा नजिकच्या CSC केंद्राशी संपर्क साधुन आपली ई- केवायसी तात्काळ करुन घ्यावी . . अधिक माहितीसाठी कृषी विभागातील कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक,मंडळ कृषी अधिकारी ,तालुका कृषी अधिकारी तसेच तलाठी आणि महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगांव यांनी केले आहे.

https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx या लिंकवर ई- केवायसी करता येईल.
00000

No comments:

Post a Comment