जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -12- विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग नाशिक मोहन वाघ, , व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगांव संभाजी ठाकुर, यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव जिल्हयात 16 भरारी पथकांतील गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांचेमार्फत कृषि सेवा केंद्राच्या तपासण्या सुरू आहेत. दरम्यान, कृषि केंद्र चालकांनी निकृष्ट दर्जाचे विद्राव्य खतांची विक्री करु नये असा इशारा कृषि विभागाने विक्रेत्यांना दिला आहे. तसेच कृषि निविष्ठा खरेदी करतांना शेतकन्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हयातील शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे.
श्री.मोहन
वाघ, विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी
ठाकुर, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जळगाव अरुण
तायडे, , यांनी मे. महेश कृषि केंद्र, रावेर या खत विक्री केंद्रातुन मे.
अॅडव्हांस अॅग्रो इंडस्ट्रीज, शेंद्रा एमआयडीसी, औरंगाबाद यांनी उत्पादित केलेले
विद्राव्य खत 12:61:0 बॅच क्र. A-12-19.06.2022 व विद्राव्य खत 19:19:19 बॅच क्र.
A-19-1 09.06.2022 चे नमुने तपासणीसाठी घेतले असता खत तपासणी प्रयोगशाळेच्या
अहवालानुसार मोठया फरकाने अप्रमाणित झाले आहे. त्यानुसार विक्रेत्याकडील उर्वरित साठयास
खत नियंत्रण आदेश 1985 नुसार विक्री बंद आदेश देण्यात आले असून जिल्हयातील इतर खत
विक्रेत्यांनी वरिल बॅच नंबरचे खतांची विक्री करू नये, तसे आढल्यास खत नियंत्रण
आदेश 1985 नुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद विक्रेत्यांनी घ्यावी. अशा सुचना मोहन
वाघ, विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक यांनी विभागातील सर्व निरीक्षकांना
कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment