Friday, 23 September 2022

विद्यापिठातील आदिवासी मुलांच्या सुसज्ज वस्तीगृहातचे आदिवासी विकास मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन जळगाव येथे शुक्रवारी होणार कार्यक्रम, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

           जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -23-   जळगाव शहरातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आवारात उभारण्यात आलेल्या शासकीय आदिवासी मुलांच्या वस्तीगृहाचे इमारतीचे उद्घाटन व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री        डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते इमारतीचे उद्दघाटन केले जाणार असुन या कार्यक्रमात  आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण होणार आहे. या कार्यक्रमात राज्याच्या विविध मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे.

          एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने जळगावत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आवारात आदिवासी मुलांचे वस्तीगृह उभारण्यात आले आहे. या नूतन इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते केले जाणार असून या कार्यक्रमात उपस्थित मंत्री गणांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देखील वितरण केले जाणार आहे. तसेच योग व क्रीडा प्रशिक्षण समारोपचा कार्यक्रम देखील त्या दिवशी होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थितीत ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थितीमध्ये खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेश पाटील, विधान परिषद सदस्य एकनाथराव खडसे, सुधीर तांबे, चंदुलाल पटेल, किशोर दराडे, आमदार संजय सावकारे, आमदार चिमणराव पाटील, आमदार शिरिष चौधरी, आमदार  सुरेश उर्फ राजूमामा भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार सौ. लताताई सोनवणे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात विशेष निमंत्रित मध्ये आदिवासी विकास विभाग याचे सचिव अनुपकुमार यादव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी, नाशिक विभागीय आयुक्त हिरालाल सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत, अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, अधीक्षक अभियंता व्ही.ए.पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. तेव्हा दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेला शासकीय आदिवासी मुलांच्या वस्तीगृहाचे उद्घाटन केले जाणार असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पदवी प्रदान सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तेव्हा या कार्यक्रमांमध्ये सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, समाजसेवक, आदिवासी सेवक व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment