जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) :- दारिद्ररेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचविणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी. याकरीता महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना केलेली आहे.
या
महामंडळामार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या पुढील 12 पोटजातीतील व्यक्तींना
अर्थसहाय्य करण्यात येते- मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग
महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12
पोटजातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य करण्यात येते.
महामंडळामार्फत राबविण्यात येणा-या योजनांमधून आर्थिक लाभ मिळण्यास आवश्यक
बाबी
अर्जदार जिल्ह्याचा रहिवासी असावा,
अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापेक्षा जास्त नसावे, अर्जदार हा मातंग समाजातील 12
पोट जातीतील असावा, अर्जदार या जिल्हयाचा रहिवासी असावा, अर्जदाराचे सबिली क्रेडीट
स्कोअर 500 असावा, अर्जदाराने या महामंडळाकडून यापुर्वी व इतर कोणत्याही योजनेचा
लाभ घेतलेला नसावा, अर्जदाराचे वार्षिक
उत्पन्न रु. 3,00,000/-
पेक्षा जास्त नसावे, एका
कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल, अर्जदाराने आधारकार्ड
जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा,
अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या
व्यवसायाचे ज्ञान व अनुभव असावे, अर्जदारास महामंडळाचे प्रचलित नियमानुसार
व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे प्रमाणपत्रे करारपत्रे/ कर्जमागणी
अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. सदर योजनेत साधारणपणे पुरुष व महीला 50% आरक्षण,
ग्रामीण भागासाठी प्राधान्य राहील, तसेच राज्यस्तरावरील क्रिडा पुरस्कृत व्यक्तीना
प्राधान्य राहील. सैन्यदलातील वीरगती वारसाच्या एका सदस्यास प्राधान्याने लाभ
देण्यात येईल. अर्जदाराने कर्जमंजुर कर्ज वितरणापुर्वी त्याच्या वारसदाराचे
बंधपत्र दयावे लागेल, अर्जदाराकडुन कर्जमजुरी नंतर कर्ज वितरणा पुर्वी 02 जामिनदार
(01 नोकरदार, त्याच्या कार्यालयाकडील विभाग कार्यालय प्रमुखाचे वसुलीसाठी
हमीपत्र घेण्यात येईल, 01 मालमत्ता धारक
जामीनदाराच्या मालमत्तेवर महामंडळाच्या कर्जाचा बोजा नोंद करुन देणे आवश्यक आहे.
अर्जदारास कर्ज मंजुर वितरणांपुर्वी कर्ज वसुली पोटीउत्पन्न दिनांकीत धनादेश देणे
बंधनकारक, अर्जदाराने मंजुर कर्जाचा पहिला हप्ता वितरीत केल्यानंतर व्यावसायाचा
विमा महामंडळ व लाभार्थी यांचे संयुक्त नावे करणे बंधनकारक राहील व दर वर्षी
विम्याचे नुतनीकरण करणेसाठी होणारा खर्च लाभार्थीने स्वत: करावा, कर्ज वितरण
झाल्यापासून तीन महीन्यानंतर कर्जाची वसुली ( मुद्दल व व्याज) या प्रमाणे करावी /
महामंडळात कर्ज वसुली दरमाह भरावी, सदर कर्ज योजनेचे फॉर्म कार्यालयात विनामुन्य
आहेत सदर थेट कर्ज योजनेचे , अर्ज स्विकारण्याची मुदत दिनांक – 28 नोव्हेंबर, 2022 ते 20 डिसेंबर, 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत
सकाळी 9.45 ते सांय 6.15 पर्यंत स्विकारले जातील, प्राप्त कर्जप्रकरणांची छाननी / तपासनी शासन
निर्णयानुसार करण्यात येऊन लाभार्थी निवड समितीच्या बैठकीमध्ये संबधित अर्ज
ठेवण्यात येतील. लाभार्थी समितीमध्ये मंजुर झालेल्या पात्र लाभार्थीचे प्रस्ताव
पुढील कार्यवाहीस पाठविण्यात येतील. त्याच प्रमाणे जिल्हा कार्यालयास दिलेल्या
उद्दिष्टां पेक्षा जास्ती कर्जप्रकरणे प्राप्त झाल्यास लाभार्थीची निवड लॉटरी
पध्दतीने शासन निर्गमीत आदेशानुसार लाभार्थी निवड समिती मार्फत करण्यात येईल.
तरी संबधीत होतकरु समाजातील महीला /
पुरुष वर्गानी/ प्रशिक्षीत लाभार्थीनीं सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहरी
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय
भवन, महाबळ रोड, मायादेवी नगर स्टॉप समोर, हातनुर कॉलनी, ताराचंद कसबे यांना एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये
कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment