Thursday, 14 August 2025

नोंदणी विभागाची सेवा तीन दिवस बंद राहणार; नागरिकांनी नोंद घ्यावी.

जळगाव ,दि.14(जिमाका वृत्तसेवा ):- नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे, दि.14 ऑगस्ट 2025 रात्री 12 वाजल्यापासून ते दि.17 ऑगस्ट 2025 रात्री 12 वाजेपर्यंत राज्यातील आय-सरीता प्रणाली अंतर्गत दस्तनोंदणीसह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद राहतील. 

     तरी संबंधित पक्षकार व दस्त नोंदणी करणारे व्यावसायिक यांनी याची नोंद घ्यावी, असे नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय), महाराष्ट्र राज्य, पुणे श्री.उदयराज चव्हाण यांनी कळविले आहे.

                                                                   0000000000

No comments:

Post a Comment