जळगाव दि. 4 :- राज्यातील कृषी क्षेत्राच्या दृष्टीने खरीप हंगामास
अनन्यसाधारण महत्व आहे. कृषी क्षेत्राच्या सुक्ष्म नियोजनाच्या दृष्टीने प्रत्येक
जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठकांचे आयोजन
करण्यात आले होते. या बैठकांमधील सुचनांवर विचार विनिमय करणे व खरीप हंगाम पूर्व
तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या
अध्यक्षतेखाली दि. 5 मे, 2018 रोजी सकाळी 11 वाजता रंगशारदा सभागृह, के.सी.मार्ग,
बांद्रा रिक्लेमेशन, बांद्रा (पश्चिम), मुंबई येथे आढावा बैठक आयोजत करण्यात आली
आहे.
कृषी व संलग्न क्षेत्राच्या विकासाच्या
दृष्टीने उपस्थित मुद्यांवर तसेच राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी आवश्यक खते,
बियाणे, औषधे आणि कर्जपुरवठा इ. बाबत केलेल्या सुक्ष्म नियोजनाचा आढावा घेण्यासाठी
मा. मुख्यमंत्री महोदयांचे अध्यक्षतेखाली व सर्व पालकमंत्री, जिल्हा परिषद
अध्यक्ष, उपाध्यक्ष, कृषी समितीचे सभापती, सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरु,
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), विभागीय कृषी
सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), रिझर्व्ह बँक ऑफ
इंडिया, नाबार्ड, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य सहकारी
बँक यांचे प्रतिनिधी, कृषी व संलग्न विभागाचे अधिकारी, बियाणे महामंडळ, कृषी
उद्योग विकास महामंडळाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, भारतीय हवामान
विभागाचे प्रतिनिधी राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीस उपस्थित राहणार आहे.
असे श्री. विजय घावटे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment