खासलेख -
·
जिल्ह्यातील 5 हजार 488
कृषीपंपधारक ग्राहकांनी 5 कोटी 37 लाख रुपयांची थकबाकी भरुन घेतला योजनेचा लाभ
शेतकरी सुखी तर देश सुखी
या तत्वाने राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. शेतकऱ्यांना
शेतीसाठी वीज व पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्राधान्य देत आहे. गेल्या काळात
शेती व्यवसायात होणाऱ्या चढउतारांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीही बदलली आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक
स्थितीचा विचार करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिपंपधारक ग्राहकांसाठी
मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017 जाहिर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून
कृषीपंप ग्राहकांना वीज बिलाच्या थकबाकीमध्ये सवलत देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय
घेतला आहे. कृषी ग्राहकांच्या वीज बिलांचा भरणा करण्याचे प्रमाण अत्यल्प म्हणजे
साडेसात टक्के इतकेच आहे. मार्च 2017 अखेर राज्यातील 40.82 लाख ग्राहकांपैकी 37.64
लाख ग्राहकांकडे थकबाकी आहे. त्यांच्याकडील व्याज व दंडाची एकूण रक्कम 8 हजार 382 कोटी एवढी आहे.
एकट्या जळगांव जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यात 30 हजार
रूपयापेक्षा कमी थकबाकी असलेले कृषीपंप ग्राहकांची संख्या 80 हजार 463 असून
त्यांच्याकडे 152 कोटीची थकबाकी आहे. त्यात मुळ थकबाकी 114 कोटी तर व्याज व दंड 38
कोटी रुपये इतके आहे. तर जिल्ह्यात 30 हजार
रूपयापेक्षा अधिक थकबाकी असलेले कृषीपंप ग्राहकांची संख्या 1 लाख 422 असून
त्यांच्याकडे 1 हजार 359 कोटीची थकबाकी आहे. त्यात मुळ थकबाकी 769 कोटी तर व्याज व
दंड 589 कोटी आहे. जिल्ह्यातील 28 हजार 651 शेतीपंप ग्राहकांनी वीज
जोडणी घेतल्यापासून एकदाही वीजबिल भरले
नाही. या ग्राहकांकडे 193 कोटी रूपये थकबाकी आहे. धरणगांव विभागात
सर्वाधिक 8 हजार 105 ग्राहक असून त्यांच्याकडे 57 कोटी 23 लाख थकबाकी आहे
त्यापाठोपाठ पाचोरा विभागात 6 हजार 331 ग्राहकांकडे 42 कोटी 17 लाख थकबाकी आहे. या ग्राहकांना त्यांच्याकडील थकबाकीत सवलत
देण्याकरिता ही योजना जाहिर केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 5 हजार 488
कृषीपंपधारक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांनी 5 कोटी 37 लाख 24 हजार
रुपयांची थकबाकी भरली आहे. जिल्ह्यातील उर्वरित थकबाकीदार कृषीपंप
ग्राहकांनी चालू वीजबील येत्या 30 नोंव्हेंबरपर्यंत भरुन मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी व्हावे. तसेच योजनेच्या निकषानुसार मुळ थकबाकी पाच ते
दहा समान हप्त्यात भरून या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन मुख्य अभियंता श्री. ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.
मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेची ठळक वैशिष्ट्ये –
राज्यातील सर्व
कृषीपंपधारक, उपसा जलसिंचन योजनेसहित, या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र
राहणार आहे.
माहे एप्रिल
2017 पुढील त्रैमासिक चालू वीज देयके 30 नोव्हेंबर 2017 पूर्वी भरुन ह्या योजनेत
सहभागी होता येणार आहे.
या योजनेत 31
मार्च 2017 अखेरीस असलेली वीजबिलाची मूळ थकबाकीची रक्कम खालीलप्रमाणे हप्त्यात
भरावयाची मुभा देण्यात आली आहे.
अ) ग्राहकांची मूळ थकबाकी रुपये 30 हजार पेक्षा जास्त असल्यास
ती 10 समान हप्त्यांमध्ये प्रत्येक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये भरणा करणे आवश्यक
राहील.
ब) मूळ थकबाकी
रुपये 30 हजार पेक्षा कमी असल्यास ती 5 समान हप्त्यांमध्ये प्रत्येक तीन
महिन्याच्या कालावधीमध्ये भरणा करणे आवश्यक राहील.
ज्या प्रमाणात
पाच समान हप्ते कृषीग्राहक वेळेवर भरतील, त्याप्रमाणात कृषीपंप ग्राहकांचे व्याज व
दंडनीय आकार माफ करण्याबाबत शासनातर्फे विचार करण्यात येणार आहे.
पाच समान
त्रैमासिक हप्ते हे अनुक्रमे डिसेंबर 2017, मार्च 2018, जून 2018, सप्टेंबर 2018 व
डिसेंबर 2018 अखेरीस भरणे आवश्यक राहील.
या योजनेत भाग
घेण्याकरीता कृषीपंपधारक ग्राहकांनी मार्च 2017 अखेरची मूळ थकबाकी 31 डिसेंबर 2018
पूर्वी दिलेल्या मुदतीत चालू देयकासहीत भरणे बंधनकारक राहणार आहे.
संकलन
- जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव
No comments:
Post a Comment