जळगाव
दि. 9 :- राष्ट्रीय रुरबन मिशन अतंर्गत मुक्ताईनगर गावसमुहासाठी मंजूर करण्यात
आलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार उणीवा निवारण निधी खर्च करावा. असे निर्देश
महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हृयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील
यांनी दिले.
राष्ट्रीय रुरबन मिशन शिखर समितीची
सभा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा शासकीय विश्रामगृहात
संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस माजीमंत्री तथा आमदार एकनाथराव
खडसे, आमदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार सुरेश् भोळे,
आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जळगावचे उपविभागीय अधिकारी जलज शर्मा,
जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक
श्री. बगाडे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले
की, उणिवा निवारण निधी व एककेंद्रभिमुखता यामधुन एकत्रित खर्च होणारे काम अपूर्ण
राहणार नाही याची खात्री झाल्याशिवाय उणिवा निधीतून खर्च करु नये. उणिवा निवारण
निधी खर्च करतांना सार्वजनिक निधी व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब करण्याच्या सूचनाही
त्यांनी यावेळी उपस्थितांना दिल्यात.
प्रकल्प संचालक श्री. बगाडे यांनी
उणिवा निवारण निधीबाबत सविस्तर माहिती सांगून मुक्ताईनगर गाव समुहाच्या
आराखड्यामध्ये 15 बाबींच्या 6 हजार तीनशे 67 कामांचा समावेश असलयाचे सांगून हा
आराखडा 51.72 कोटींचा असल्याचे सांगितले. त्यात 70 टक्के एककेंद्रभिमुख अंतर्गत
करावयाच्या कामांची रक्कम 36.20 कोटी व 30 टक्के उणिवा निवारणी निधी रु. 15.52
कोटी केंद्र शासनाचा हिस्सा आहे. मुक्ताईनगर गाव समुहांतर्गत एकात्मिक गाव समुह
आराखड्यानुसार यंत्रणानिहाय विविध वर्गवारीनुसार 10 कोटी रुपयांची 761 कामे
करण्यात आल्याचे सांगितले.
निधीचा
विनियोग करताना चांगल्या दर्जाची कामे व्हावी तसेच या कामापासून नागरीकांना
चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
0000
No comments:
Post a Comment