जळगाव, दि.२३ (जिमाका वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिनाक पासून 15 मार्च, 2022 पर्यंत “ माझे मत माझे भविष्य- एका मताचे सामर्थ्य ” ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. याव्दारे जनतेच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर लोकशाही बळकटीकरणासाठी करण्यात येत आहे. “ माझे मत माझे भविष्य- एका मताचे सामर्थ्य ” या मध्यवर्ती संकल्पनेवर राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत प्रश्नमंजुषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा,गाण्याची स्पर्धा, व्हिडीओ मेकिंग स्पर्धा आणि पोस्टर डिझाईन स्पर्धांचा समावेश आहे.
या स्पर्धेविषयी सविस्तर माहिती https://ecisveep.nic.in/contest/
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच स्पर्धकांनी प्रवेशिका सर्व तपशिलांसह yoter-contest@eci.gov.in
या ईमेलवर 15 मार्च, 2022 पर्यंत पाठवाव्यात ई –मेल करतांना स्पर्धेचे नाव आणि
श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा.
तरी जळगाव जिल्हयातील सर्व नागरिकांनी “ राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा”
अंतर्गत विविध स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांचे मार्फत एका प्रसिध्दी
पत्रकान्वये करण्यात येत आहे.
००००
No comments:
Post a Comment