जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 23 – जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांना महाराष्ट्र शासन मार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. सदर पुरस्कार प्राप्त उद्योजकास प्रथम क्रमांकास रुपये 15,000/- व व्दितीय क्रमांकास रुपये 10,000/- व मानचिन्ह तसेच शाल व श्रीफळ देण्यात येते. सदर पुरस्कारासाठी लघु उद्योजकांची निवड त्यांनी केलेली भांडवली गुंतवणुक तंत्रज्ञान, स्वालंबन, उद्योजकता, कौटुंबिक पार्श्वभुमी, उत्पादीत वस्तुंची गुंणवत्ता, निर्यातक्षमता इ. बाबीचा विचार राष्ट्रीय पुरस्कारा प्रमाणे जिल्हा पुरस्कार यशस्वी उद्योजक निवडीसाठी निकष असतात. त्याप्रमाणे नोंदणीकृत लघु उद्योग घटकांची मागील तीन वर्षातील स्थिर भांडवल गुंतवणुक, रोजगार निर्मिती व नफयांची वाढ विचारात घेतली जाते. घटकाचे उत्पादनासाठी वापरलेले तंत्रज्ञान गुणवत्ता प्राप्त उत्पादन, मशिनरी व बिल्डींग मेन्टेनन्स, कामगार कल्याणासाठीच्या योजना यांचा विचार करुन या बरोबरच थकबाकी येत नाही. याची खात्री वित्तीय संस्थेकडुन केली जाते. जिल्हास्तरीय सल्लागार उपसमितीने सदर बाबींची सुक्ष्म छाननी करुन घटकांना प्रत्यक्ष भेटी दिल्यानंतर मुल्यांकन करुन सदर समिती कडुन यशस्वी उद्योगजकांची निवड केली जाते.
तरी जिल्हयातील गेल्य तीन वर्षा अगोदर
उत्पादन सुरु असलेल्या व वरील निकषा नुसार जास्तीत जास्त उद्योजकांनी जिल्हा
उद्योग केंद्र, जळगाव येथे समक्ष संपर्क साधावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा
उद्योग केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment