Monday, 24 March 2025

शंभर दिवसांच्या मोहिमेत जळगाव जिल्ह्यात अतिक्रमित पाणंद रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

                                                                                

             जळगाव दि. 24 मार्च ( जिमाका वृत्तसेवा )-  गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणंद / पांधण / शेतरस्ते /शिवाररस्ते / शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करावे , वहिवाटीचे रस्ते मोकळे  करुन तयार करण्याच्या सुचना जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. त्याअतंर्गत जळगाव जिल्ह्यात अतिक्रमित शेत पाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी शंभर दिवसांची मोहीम राबविण्यात येत आहे . या मोहिमेचा पहिला टप्पा 22 मार्च 2025 रोजी यशस्वीपणे पूर्ण झाला. जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांनी एकत्रितपणे काम करत 155 गावातील 152 रस्ते मोकळे करण्यात यश मिळविले आहे,  ज्यांची एकूण लांबी 223.4 किलोमीटर आहे. या मोहिमेमुळे 6283 शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

तालुकानिहाय माहिती

 * अमळनेर: 6 गावातील 10 रस्ते, लांबी 15.9 किमी, 2280 लाभार्थी

 * भडगाव: 6 गावातील 4 रस्ते, लांबी 5.5 किमी, 65 लाभार्थी

 * भुसावळ: 3 गावातील 4 रस्ते, लांबी 8 किमी, 272 लाभार्थी

 * बोदवड: 2 गावातील 3 रस्ते, लांबी 4 किमी, 20 लाभार्थी

 * चाळीसगाव: 18 गावातील 23 रस्ते, लांबी 29 किमी, 112 लाभार्थी

 * चोपडा: 21 गावातील 21 रस्ते, लांबी 36.5 किमी, 639 लाभार्थी

 * धरणगाव: 18 गावातील 13 रस्ते, लांबी 18.6 किमी, 384 लाभार्थी

 * एरंडोल: 7 गावातील 7 रस्ते, लांबी 9.7 किमी, 382 लाभार्थी

 * जळगाव: 11 गावातील 12 रस्ते, लांबी 19 किमी, 150 लाभार्थी

 * जामनेर: 15 गावातील 8 रस्ते, लांबी 11 किमी, 530 लाभार्थी

 * मुक्ताईनगर: 6 गावातील 6 रस्ते, लांबी 12 किमी, 332 लाभार्थी

 * पाचोरा: 1 गावातील 2 रस्ते, लांबी 2.5 किमी, 140 लाभार्थी

 * पारोळा: 10 गावातील 10 रस्ते, लांबी 4.4 किमी, 108 लाभार्थी

 * रावेर: 15 गावातील 19 रस्ते, लांबी 32.3 किमी, 622 लाभार्थी

 * यावल: 16 गावातील 10 रस्ते, लांबी 15 किमी, 247 लाभार्थी

           या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी अडथळामुक्त मार्ग उपलब्ध होणार आहे. तसेच शेतीमालाची वाहतूक सुकर होऊन वेळ आणि खर्च वाचणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी या उपक्रमाला सहकार्य करून आपल्या हक्काच्या रस्त्यांसाठी पाठिंबा द्यावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

०००००००००००

No comments:

Post a Comment