जळगाव दि. 12 ( जिमाका वृत्तसेवा )- १० वी १२ वी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये जळगाव शहरातील महाविद्यालयामध्ये प्रवेशित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास, निर्वाह भत्ता तसेच शैक्षणिक भत्ता इ सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे. ही योजना यापुर्वी जिल्हा स्तरावरच लागू करण्यात आली होती. परंतु आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तालुकास्तरावर देखील लागू करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा Online अर्ज भरण्यासाठी दिनांक १५ मार्च, २०२५ पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे.
सन २०२४-२५ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना online अनुसूचित
जाती प्रवर्गातील विद्यार्थाना https://hmas.mahait.org या पोर्टलवर स्वाधार योजनेचे
अर्ज भरता येणार आहेत. ऑनलाईन पोर्टल हे वसतिगृह प्रवेश प्रक्रिया व स्वाधार योजनेसाठी
एकत्रित तयार केलेले असून सर्व प्रथम विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते नुसार शासकीय वसतिगृहास
निवड होईल. तसेच पात्र असूनही ज्या विद्यार्थ्यांची गुणवत्ते अभावी शासकीय वसतिगृहात
निवड होणार नाही अश्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज Online प्रणालीद्वारे स्वाधार योजने
करिता ग्राह्य धरले जाणार आहेत.
दिनांक
१५ मार्च, २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरून ऑफलाईन अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधित
वसतीगृहाचे गृहपाल/ सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव येथे सादर करावा, असे आवाहन योगेश
पाटील, सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी केले आहे.
0000000000
No comments:
Post a Comment