Friday, 29 May 2020

गुणवत्ता नियंत्रणासाठी 16 भरारी पथकांची स्थापना


        जळगाव, दि. 29 (जिमाका) :- जिल्हयात खरीप हंगाम 2020 साठी कृषि विभागामार्फत जिल्हास्तरीय 1 व तालुकास्तरीय 15 असे एकुण 16 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या भरारी पथकांमार्फत कृषि सेवा केंद्राची तपासणी करुन जादा दराने विक्री, बियाण्यांचा काळाबाजार बोगस / बनावट बियाणे विक्रीला प्रतिबंध करण्यात येणार आहे.
            कृषि विभागामार्फत कृषि निविष्ठा विक्रेत्याना सक्त ताकीद देण्यात येत आहे.  जिल्ह्यातील कोणीही बोगस / बनावट बियाणे / खते/ किटकनाशके विक्री करणार नाही अथवा जादा दराने विक्री किंवा काळाबाजार करणार नाही. असा प्रकार केल्यास त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येईन,
            तसेच याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारीसाठी संबधीत तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी / कृषि अधिकारी पंचायत समिती / उपविभागीय कृषि अधिकारी/ कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव यांचा दुरध्वनी क्रमांक 0257-2239054 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment