जळगाव,
(जिमाका वृत्तसेवा) दि. 4 - जिल्ह्यातील
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 20 मे, 2020 पर्यंत मुंबई पोलीस
अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) (3) लागू करण्यात आले आहे.
या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा
जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची पूर्व
परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश
लग्न समारंभाच्या मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू राहणार
नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी वामन कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले
आहे.
00000
No comments:
Post a Comment