Wednesday, 20 May 2020

जिल्ह्यात 4 जूनपर्यंत 37 (1) (3) कलम लागू


            जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 20 - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 4 जून, 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) (3) लागू करण्यात आले आहे.
            या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास, स्थानिक पोलीस कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुक, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी रविंद्र भारदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment