जळगाव,
दि. 28 (जिमाका) - राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खरिप हंगामपूर्व
जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील
शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे आवाहन केले आहे.
बीजप्रक्रिया - बियाणे पेरणी पूर्वी
पी.एस.बी, ट्रायकोडर्मा, इ. यांची बिज प्रक्रिया करुनच पेरणी करावी. व त्या पिकाचा
त्वरित प्रधानमंत्री पिक योजनेत विमा काढावा.
आंतरपिक - शेतकऱ्यांनी पेरणी क्षेत्रामध्ये आंतरपिके घेतल्याने शेतकऱ्यांचे
उत्पन्न वाढते व नुकसानीची जोखीम कमी होते. याकरिता कापूस पिकामध्ये मुग किंवा
उडीद या सारख्या कमी कालावधीची आंतरपिके घ्यावीत व मका पिकामध्ये मूग किंवा उडीद
किंवा तूर किंवा कडेने चार ओळी नेपिअर गवताच्या लावल्यास लष्करी अळीचा प्रादुर्भाव
कमी होण्यास मदत होते.
फेरोमन ट्रॅप - किडी व अळीमुळे पिकाच्या
झालेल्या नुकसानीची पातळी समजण्यासाठी प्रति हेक्टरी 5 ट्रॅप पिकाच्या उंची पेक्षा
1 ते 1.5 फुट जास्त उंचीवर लावावेत. तसेच कापूस पिकावर प्रति हेक्टरी 25 ट्रॅप
लावल्याने किडीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकते, गुलाबी बोंड अळी
निर्गमनासाठी पेक्टीनो लुर, तसेच सोयाबीन पिकासाठी स्पोडो लुर शेतकऱ्यांनी
लावल्यास किडीचे नियंत्रण होवुन किडीमुळे होणारे नुकसान कमी होते. मका वरील फॉल
आर्मी वर्म या अळीच्या नियंत्रणासाठी फ्रुजीपेरडा या लूरचा वापर करावा.
पक्षी थांबे - कापूस व इतर पिकांवरील अळी
नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी प्रति एकरी कमीत कमी 10 पक्षी थांबे लावावेत. जेणेकरुन
पिकावरील अळीचे नियंत्रण होऊन होणारे नुकसान कमी होते.
कपाशीची पेरणी 1 जून नंतर पुरेसा पाऊस
झाल्यावर करावी - पेरणी करतांनाच एकरी 20 किलो युरिया, 150 किलो सिंगल सुपर
फॉस्फेट, 50 किलो गोणी म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे यानंतर एक महीन्याने 50 किलो
युरिया, यानंतर तिसऱ्या वेळी पुन्हा 50 किलो युरिया खत द्यावेत.
सोयाबीन
पेरणीसाठी घरचे चांगले टपोरे दाणे निवडुन काडीकचरा काढून टाकावा त्यांची
उगवणक्षमता तपासून बियाणे म्हणून वापरावे, इतर आवश्यक माहितीसाठी गावातील कृषि
सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे
आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले
आहे.
00000
No comments:
Post a Comment