जळगाव, (जिमाका) दि. 28 :-
नाबार्डच्या अध्यक्षपदी जी. आर. चिताला यांची नियुक्ती झाली असून त्यांनी 27 मे,
2020 रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
श्री.
चिंताला हे यापूर्वी बेंगलुरु येथील ‘नैबफिन्स’चे व्यवस्थापकीय संचालक होते.
चिंताला भारतीय कृषि अनुसंधान संस्थान, नवी दिल्लीचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत.
नाबार्डमध्ये अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी नाबार्डच्या मुंबई मुख्य
कार्यालयात आणि हैदराबाद, लखनऊ, चंडीगड, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, नवी दिल्ली
आणि बेंगलुरु येथील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विविध पदांवर कार्य केले आहे. श्री
चिंताला ऍग्री बिज़नेस फाइनेंस लि. हैदराबादचे दोन वर्ष उपाध्यक्ष होते. बैंकर
ग्रामीण विकास संस्थान (बर्ड), लखनऊचे निदेशक होते.
जी. आर. चिंताला यांनी विविध
सल्लागार समपुदेशन संबंधित कार्य देखील केले आहे. ज्यात “स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार
योजना (एसजीएसवाई) मध्ये अनुसूचित जाती/जमातींच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रभावोत्पादकता” हा विषय प्रमुख होता. यांच्या शिफारशींमुळे संपूर्ण देशात एसजीएसवाईच्या
जागी राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (एनआरएलएम) सुरू करण्यासाठी मदत झाली. चिंताला
यांनी नाबार्ड मधील त्यांच्या सेवेच्या दरम्यान अंदमान आणि निकोबार द्वीप समूहातील
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना नारळ उत्पादक शेतकऱ्यांना
त्यांच्या मालाला योग्य व लाभदायक दर निश्चित करण्यासाठी तिथे शेतकरी उत्पादक
संघटनेचा शुभारंभ केला.
जी. आर. चिंताला यांनी वीस
पेक्षा अधिक देशात ज्यामध्ये बोलिविया, ब्राज़ील, केनिया, इंडोनेशिया आणि संयुक्त
राज्य अमेरिका, चीन, यूरोपियन देश प्रामुख्याने आहेत, आपले शोध निबंध प्रस्तुत
केले आहेत व समुपदेशनाचे कार्य करण्यासाठी प्रवास केला आहे. जी. आर. चिंताला यांनी
विविध क्षेत्रात केलेले कार्य व त्यांच्या समृद्ध अनुभवाचा नाबार्डला कृषि आणि
ग्रामीण विकासाच्या संदर्भात अधिक फायदा होईल.
00000
No comments:
Post a Comment