Tuesday, 31 May 2022

प्रधानमंत्र्यासह मुख्यमंत्र्यांनी साधला दूरदृश्य प्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी संवाद

 







            जळगांव, दि.31 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  आझादी का अमृतमहोत्सवातंर्गत देशात विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून यानिमित्ताने आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

            जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन  सभागृहात दूरदृश्य प्रणालीमार्फत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास खासदार उन्मेष पाटील, आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, मनपा आयुक्त डॉ विद्या गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी राहील पाटील, आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, भारताच्या सामर्थ्यापुढे कोणतेही लक्ष अवघड नाही. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून देशात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक वाढत आहे. कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी भारताने दीडशेपेक्षा जास्त देशांना औषधी, लसचा पुरवठा केला. प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी लडाख, बिहार, त्रिपूरा, कर्नाटक, गुजरात व हिमाचल प्रदेशातील  केंद्रीय योजनेचा लाभ मिळालेल्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, स्वच्छ भारत मिशनi (ग्रामीण व शहरी), जलजीवन मिशन, अमृत योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, एक राष्ट्र- एक रेशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर,म्हणाले प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

            यावेळी दूरदृष्यप्रणालीवरुन बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  म्हणाले की, योजना केंद्राच्या असो किंवा राज्यांच्या त्या सर्वसामान्य लोकांपर्यत पोहचविण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या आहेत. तसेच यापुढेही अधिकाधिक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात याव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्येक लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला, तसेच लाभार्थ्यांच्या काही अडीअडचणी आहेत का ते जाणून घेतल्या. यावेळी मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री यांनी  अहमदनगर, नाशिक,औरंगाबाद, कोल्हापूर तसेच नागपुर या जिल्ह्यातील प्रधानमंत्री घरकुल योजना व इतर केंद्रीय योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमास  जळगांव जिल्ह्यातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

व्यायामशाळा साहित्य मागणीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

     जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) -  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा नियोजन समिती जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत व्यायामशाळा विकास अनुदान योजना राबविण्यात येत असते. सदर योजने अंतर्गत जिल्हयातील ज्या ग्रामपंचायतीचे व्यायामशाळा बांधकाम पुर्ण झालेले आहे. अशा ग्रामपंचायतीनी व्यायामशाळा साहित्य मागणीचे दोन प्रतीत प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.                                     0000000

तृतीयपंथीयांच्या विकास योजनांसाठी समाज कल्याण विभागाचा पुढाकार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विशेष शिबीराचे आयोजन

     जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) -  सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय  व्यक्तीसाठी  National Portal For Transgender Persons –https:transgender.dosje.gov.in  राष्ट्रीय पोर्टल सुरु  करण्यात आले आहे. सदर पोर्टलवर तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळणेसाठी अर्ज करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र सदर पोर्टलवर नोंदणी करण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. त्यामुळे राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींची निश्चित आकडेवारी उपलब्ध होत नसल्याने त्यांचेसाठी नाविन्यपूर्ण व कौशल्य विकासाच्या योजना राबविण्यास अडचणी निर्माण होत आहे. ही बाब लक्षत घेऊन राज्याच्या समाज कल्याण विभागाने आता यासाठी पुढाकार घेतला आहे.

          राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिनांक 23 मे, 2022 ते  14 जुन 2022 या कालावधीत विशेष शिबीराचे आयोजन करण्याच्या सुचना समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नुकत्याच दिल्या आहेत. सदर विशेष शिबीरात तृतीयपंथीय व्यक्तीची सदर पोर्टलवर नोंदणी करण्याबरोबरच तृतीयपंथीय व्यक्तींना तात्काळ प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करणेबाबत सुचित करण्यात आले आहे. नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक 30 मे, 2022 ते 3 जून, 2022 या दरम्यान तर जळगाव येथे दिनांक 1 जून, 2022 रोजी हे विशेष शिबिर होणार आहे. तृतीयपंथी यांचे हक्कांचे संरक्षण व कल्याण योजनेंतर्गत त्यांच्या विकासासाठी, तसेच त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, उपाययोजनांची माहिती व्हावी व जनजागृती करणे इत्यादींसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत तसेच प्रशासनाच्यावतीने तृतीयपंथीयांसाठी सांस्कृतिक संम्मेलन/ कार्यशाळा आयोजित करणेसाठी प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग (सर्व) यांचेमार्फत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण (संबंधीत) यांना निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. समाज कल्याण आयुक्तालय, पुणे येथे तृतीयपंथी समुहाचे सामाजिक सहभाग, स्वावलंबन, आरोग्य, स्वयंरोजगार नोंदणी, यावर नुकताच संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणेरी प्राईड संस्था, मैत्र क्लिनिक, गायत्री परिवाराचे प्रतिनिधी यांनी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थान, आयुष विभाग, आरोग्य मंत्रालय भारत सरकार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे, इस्कॉन शोध आरंभ रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन, पुणे व श्री संत जगदगुरु संत तुकाराम फाउंडेशन फोर फिलांथ्रोपी हे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये तृतीयपंथीयांची नोंदणी करणे, याबाबत प्रथम प्राधान्य देवून सदर नोंदणीसाठी विशेष उपक्रम घेऊन त्यांची नोंदणी करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आयुक्त समाज कल्याण यांनी निर्देश दिले आहेत. स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी यांचे सहाय्याने प्रत्येक जिल्ह्यात एकदिवशीय शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

          चौकट राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तीची निश्चित आकडेवारी (माहिती) उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी विकासाच्या योजना राबविण्यास अडचणी निर्माण होत आहे.  ह्या अडचणी दुर होण्यासाठी व राज्यातील तृतीयपंथी यांच्या विकासाकरिता धोरण निश्चित करण्यासाठी तृतीयपंथी यांची नोंदणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तृतीयपंथीय व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या समाजातील सर्व घटकांनी यासाठी सहकार्य करावे,

डॉ. प्रशांत नारनवने , आयुक्त समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे

          खालील कालावधीत राज्यातील विभागांमध्ये जिल्हा निहाय विशेष शिबीर आयोजन करण्यात आले आहे.

          मुंबई व पुणे विभाग दिनांक 23 मे, 2022 ते 31 जून, 2022,

नाशिक विभाग दिनांक 30 मे 2022 ते 3 जून, 2022

औरंगाबाद व लातुर विभाग दिनांक 1 जून ते 6 जून, 2022

नागरपूर व अमरावती विभाग दिनांक 1 जून ते 14 जून, 2022

          बुधवार दिनांक 1 जून, 2022 रोजी सकाळी  10.00 वाजता सामाजिक न्याय भवन, जळगाव येथे विशेष एकदिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना केंद्र शासनाच्या (https://transgender.dosje.gov.in)  या वेबसाईटवर तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तृतीयपंथी व्यक्तीचे आधार कार्ड, मतदान कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, नावात बदल केला असेल तर शासनाचे गॅझेट व एफीडेव्हीड सादर करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी आपली नोंदणी करावी, तसेच अडचणी आल्यास सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिर समोर महाबळ रोड, जळगाव            (0257-2263328-29)  येथे संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण जळगाव योगेश पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे.

०००००

खरीप, 2022 हंगामात विविध कृषी निविष्ठां खरेदीसाठी अकराव्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार

        जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : - शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PMKISAN) योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु.2000/- प्रती हप्ता या प्रमाणे 3 हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- लाभ अदा करण्यात येत आहे.

          दिनांक 31 मे, 2022 रोजी माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभहस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजने (PMKISAN) अंतर्गत देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना अकराव्या हप्त्यातील (एप्रिल, 22 ते जुलै, 22) देय्य लाभ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सिमला, हिमाचल प्रदेश येथून ऑनलाइन समारंभाद्वारे वितरीत होणार आहे. अकराव्या हप्त्याची हस्तांतरित करावयाची रक्कम शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे सारख्या कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे . फेब्रुवारी, 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून महाराष्ट्र राज्यात या योजने अंतर्गत सुरुवातीपासून दिनांक 27 मे, 2022 अखेर 109.46 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण        रु. 18151.70/- कोटी रकमेचा लाभ हस्तांतरित झाला आहे. तसेच दि. 31 मे, 2022 रोजीच्या समारंभात दिनांक 1 एप्रिल, 2022 ते दिनांक 31 जुलै, 202 या कालावधीकरिता देय्य अकराव्या व इतर हप्त्यांमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकुण 101.94 लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारण रू. 2038.86/- कोटीचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे.

          या योजनेचा लाभ आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. राज्यातील 88.73 लाख लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न लाभ अदायगीसाठी नोंदणीकृत झाले आहेत. उर्वरीत सर्व लाभार्थी यांनी PM KISAN योजनेचा लाभ जमा होण्यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न करण्याकरीता संबंधित बँकेत जाऊन आवश्यक अर्ज बँकेत सादर करून आधार संलग्न करण्याची प्रक्रिया पुर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. खरीप, 2022 हंगामात विविध कृषी निविष्ठां खरेदीसाठी अकराव्या हप्त्याचा हा लाभ शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. या मुळे कृषी उत्पादन वाढीला चालना मिळणार आहे. असे कृषि आयुक्त तथा राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख पी. एम किसान योजना महाराष्ट्र राज्य पुणे धीरज कुमार यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.                                        00000

महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणासाठी कर्मचारी पाठविण्याचे आवाहन

          जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) :विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग नाशिक यांच्यामार्फत महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण 13 जून ते 25 ऑगस्ट, 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती  देवराव  म्हस्के, प्र. सहाय्यक संचालक, (प्रशिक्षण) लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिली आहे.

             नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्याकडील लिपीक वर्गीय कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावे. या प्रशिक्षणासाठी इच्छुकांना प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचारी यांना प्रशिक्षण सक्तीचे केले आहे. प्रशिक्षणासाठी संपूर्ण 50 दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे. ज्यांना  पूर्णवेळ कर्मचारी पाठविणे शक्य नाही त्यांना विशिष्ट मोडयुल्सना प्रवेश घेण्याची अनुमती देण्यात येणार आहे. असे आवाहन सहसचालक लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे                                                                                                  

                                                                        ०००००

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



       जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जंयतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

          याप्रसंगी निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसिलदार सुरेश थोरात, तहसिलदार जितेंद्र कुंवर, तहसिलदार  अमित भोईटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

000


Monday, 30 May 2022

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत भ्रष्टाचार तक्रारीच्या चौकशी

       जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : -   नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प    ( पोक्रा) अंतर्गत गैरव्यवहाराची चौकशी करण्या संदर्भात महाराष्ट्रातील फक्त 15 जिल्ह्यामध्ये राबविली जात आहे. त्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. आपल्या पत्रात प्रकल्पांतर्गत लाभान्वित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वाटप करुन 2261 कोटी रु. खर्च झाल्याचे वृत्तपत्रात दाखवण्यात आला असून त्यात साहित्य पुरवठा कंपनी व कंपनीचे डिलर एजंट व कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या गळयात हात टाकून कोटयावधी रुपयाचा भ्रष्टाचार घोटाळा केल्या प्रकरणी कार्यवाही करणेबाबत संदर्भ क्र. 1 अन्वये कळविले होते. त्यानुसार सदर संघटनेकडून दिनांक 25 मे, 2022 रोजी उपोषणास बसले होते. संदर्भ क्र. 3 अन्वये  दै. लोकमत व दै. सकाळ वृतपत्रा मध्ये  दि. 26 मे, 2022 रोजी बातमी प्रसिध्द करण्यात आली आहे.

          तरी आपणास या पत्रान्वये कळविण्यात येते की, सदर उपोषणास बसलेले श्री. कैलास बजरंग परदेशी (राजपूत), खान्देश व विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष, व भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे पदाधिकारी यांना संदर्भ क्र. 2 अन्वये पत्रव्यवहार करुन संदर्भ क्र. 1 च्या पत्रामध्ये संपुर्ण प्रकल्पांतर्गत झालेल्या कामांबद्दल नमुद केले आहे. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील कोणते शेतकरी, कोणते कंपनी डिलर किंवा कृषी अधिकारी यांनी भ्रष्टाचार केल्याचा स्पष्ट उदबोध होत नव्हाता त्यामुळे त्यांनी दाखल केलेली तक्रार अत्यंत मोघम स्वरुपाची असल्याने त्याची चौकशी यास्तरावरुन तात्काळ तपासणी करणे शक्य नाही.

           तरी सदरची तक्रार जळगाव जिल्ह्याशी निगडीत व विशिष्ट शेतकरी, डिलर किंवा अधिकारी यांच्याबाबत असल्यास त्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी करणे शक्य असल्याचे पत्र संबंधित उपोषणकर्ते यांना देण्यात आली असून त्यात त्यांनी समाधान व्यक्त करुन त्यांचे उपोषण मागे घेण्यात आले आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी  दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

अनधिकृत एचटीबीटी कापुस बियाणे आणून विक्री करणाऱ्या दत्तात्रय शालीग्राम पाटील चोपडा यांचे विरुध्द गुन्हा दाखल

        जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : -  29 मे, 2022 रोजी मिळालेल्या माहितीनुसार  शासनाकडुन मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत एचटीबीटी कापुस बियाणे आणून विक्री करणाऱ्या श्री. दत्तात्रय शालीग्राम पाटील  वय – 45 यांच्या हातेड येथील गॅरेज व काझीपुरा ता चोपडा येथील राहत्या घरातुन गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, श्री अरुण श्रीराम तायडे जळगाव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने व तालुका कृषि अधिकारी  दिपक साळुंखे, चोपडा, हे. कॉ. राकेश पाटील, हे. कॉ. किरण धनगर व हे. कॉ. पल्लवी वाणी यांच्या सहकार्यांने सापळा रचुन एकुण रु. 416250/- किमतीचे 333 एचटीबीटी कापुस बियाणे पाकीटे जप्त केली आहे.

          याबाबत श्री. दत्तात्रय शालीग्राम पाटील वय – 45 रा. काजीपुरा ता. चोपडा यांचे विरुध्द सरकारतर्फे बियाणे नियम 1968 व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 नुसार चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे क्र.62/2022 दिनांक 29 मे, 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          खरीप हंगाम 2022 मध्ये अनधिकृत एचटीबीटी, अवैधरीत्या व बिना बिलाने खरेदी करु नये. तसेच या बियाण्यांची कोणत्याही परिस्थित शेतकरी बांधवांनी लागवड करु नये, अशा कापुस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसुन आल्यास या कार्यालयाचा मोबाईल क्र. 08468909641 व दुरध्वनी क्र. 0257-2239054 वर माहिती दयावी, असे आवाहन, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात येत आहे.

०००० 

चेतना व्यसनमुक्ती केंद्र व रोटरी क्लब जळगाव यांच्यातर्फे व्यसनमुक्ती दिंडीचे 31 मे रोजी आयोजन

        जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : -  31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. आज जगामध्ये प्रत्येक सेकंदाला 8 लोकांचा मृत्यू हा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे झालेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रमध्ये प्रत्येक वर्षी 9 लाख लोक हे तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्यामुळे मृत्यूमुखी पडतात. हे थाबले पाहिजे यामुळेच आजच्या दिवशी चेतना व्यसनमुक्ती केंद्र आणि रोटरी क्लब जळगाव यांच्या संयुक्त विदयमानाने व्यसनमुक्तीच्या दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

          दिंडीमुळे सांघीक भावना निर्माण होते व कार्याची पुर्तता झालेली दिसुन येते आपला जळगाव जिल्हा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनापासून दूर राहिले पाहिजे, हया उद्देशातून सदरील दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. हि दिंडीची सुरवात सकाळी 8.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळया पासून सुरु होणार असून, समाप्ती राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळया जवळ होणार आहे.

          सदरील लोकजागर कार्यक्रमात सर्व जळगावकरांनी या कार्याक्रमात सहभागी होवून व्यसन मुक्तीचा जागर प्रत्येकाच्या मनामनात करु या,  असे आवाहन  चेतन व्यसन मुक्तीचे संचालक नितीन विसपुते आणि रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष संदीप शर्मा यांनी केलेले आहे.

                                                         ०००००

भारतीय स्वातंत्रयाच्या स्मरणार्थ देश “आझादी का अमृत महोत्सव” मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गरीब कल्याण संमेलन.. शत प्रतिशत सशक्तीकरण अंतर्गत वेब संवाद व खरीप पूर्व शेतकरी मेळावा व तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन 31 मे रोजी

           जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : - भारतीय स्वातंत्रयाच्या स्मरणार्थ देश आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे. या महत्वाच्या प्रसंगाचा एक भाग म्हणून       मा. पंतप्रधान भारत सरकारच्या नऊ मंत्रालये व विभागांच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील.

          जळगाव जिल्हा या कार्यक्रमाचा एक भाग असल्याचा अभिमान असून दिनांक 31 मे, रोजी सकाळी  10.00 वाजता कृषि  विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव आयोजित कार्यक्रमासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केली आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख  उदघाटक म्हणून मा. खासदार लोकसभा मतदार संघ श्री. उन्मेशदादा भैय्यासाहेब पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून मा. ना. श्री. गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव, मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जळगाव, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हास्तरीय कार्यक्रम सकाळी 11.00 वाजता  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम मा. प्रधानमंत्री महोदय पहिल्या सत्रात विविध लाभार्थ्यांशी संवाद साधणार असून दुसऱ्या सत्रात जिल्हयातील शेतकरी बांधवांच्या हितार्थ खरीप पुर्व शेतकरी मेळावा व तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास शेतकरी बांधवानी जास्तीतजास्त संख्येन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.  0000

Friday, 27 May 2022

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : वाघूर धरण विभाग जळगाव कार्यक्षेत्रातील वाघूर डावा कालवा व उजवा कालवा तसेच कालवा उपसा व जलाशय उपसा यावरील प्रकल्पावर जेथे शक्य असेल तेथे कालव्याद्वारे (प्रवाही) तसेच अधिसूचित / अनाधिसूचित लाभक्षेत्रातील नदी, नाला व इतर जलाशयातून उपसा सिंचनाने पाण्याचा उपयोग घेणाऱ्या बागायतदारांनी चालू वर्षी प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणी साठ्यानुसार खरीप हंगामासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

            उप कार्यकारी अभियंता, वाघूर धरण विभाग, जळगाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकात म्हटले आहे, ३० मे ते  ३० जून २०२२ या मुदतीत कपाशी, ज्वारी, गहू, हरभरा, बारमाही इतर बारमाही भाजीपाला इतर तेलबिया कडधान्य व भूसार पिके इत्यादी पिकांसाठी पिण्याचे पाण्याचे आरक्षण व्यतिरीक्त उपलब्ध साठ्यातून खालील अटीस अनुसरून पाणी पुरवठा करण्याचे ठरविण्यात आले आहे. खालील अटींच्या पूर्ततेसह नमुना नं. ७ पाणी अर्जावर मागणी करून पाणी अर्ज ३० मे २०२२ चे आत संबंधित वाघूर धरण उपविभाग क्र. १ व २ वराडसिम, वाघुर धरण उपविभाग क्र. ३ व ४ नशिराबाद या कार्यालयात कार्यालयीन वेळेत टपालाने अगर प्रत्यक्ष देण्याचे करावे.

            सिंचनाच्या पाणी पुरविण्यासाठी खालील अटी व शर्ती राहतील. त्या अशा : खरीप हंगाम सन २०२२-२३ अखेर संपूर्ण थकबाकी भरणे आवश्यक राहील,पाटमोट संबंध नसावा, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रासच मंजुरी दिली जाईल, शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजुरी मिळाली असे समजू नये, पाणी अर्जाच्या निर्णय संबंधित उपविभाग, पाटशाखेत,/ ग्रामपंचायत कार्यालय नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल, मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जावर नियमानुसार जादा पाणीपट्टी आकारणी केली जाईल, मंजुर क्षेत्रासच व मंजुर पिकानांच पाणी घ्यावे लागेल, पाणी अर्ज देतांना ७/१२ उतारा किंवा खाते पुस्तिका संबंधित उपविभागास दाखवावी लागेल.

            पाटबंधारे अधिनियम (कायदा) १९७६ च्या प्रचलीत धोरणानुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन आदेशानुसारच मंजुरी देण्यात येईल. उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करून अन्नधान्याचे अधिक उत्पादन वाढवावे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचे ठोक जलप्रशुल्क निर्धारण आदेश दि. २९ मार्च २०२२ नुसार सुधारीत दराप्रमाणे केलेली आकारणी भरणे बंधनकारक राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.

00000

केळीवरील कुकुंबर मोझॅक विषाणूपासून काळजी घेण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यात केळी हे प्रमुख फळपिक असून सुमारे ५० ते ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. कुकुंबर मोसॅक व्हायरस (सी.एम.व्ही.) हा केळी पिकावरील प्रमुख विषाणुजन्य रोग असून दरवर्षी माहे जुलै ते सप्टेंबर दरम्यान सी. एम. व्ही. रोगाचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो. त्यापासून काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

            सततचे ढगाळ वातावरण, जून-जुलै महिन्यात वारंवार पडणारा अखंडित पाऊस, प्रकाशाची तीव्रता कमी असणे व किमान तापमान २४-२५ अंश से. असणे, जास्त आर्द्र हवामान, इत्यादी घटक सी.एम.व्ही. रोगास पोषक असतात. सुरवातीस कोवळ्या पानांवर हरितद्रव्य विरहित, पिवळसर पट्टे दिसणे, पानाचा पृष्ठभाग आकसला जाऊन व कडा वाकड्या होऊन पानांचा आकार लहान होणे, पानांच्या शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होणे, पानांच्या शिरांमधील भाग काळपट पडून पाने फाटणे, पोग्याजवळीन पाने पिवळे पडून पोंगा सडणे, झाडांची वाढ खुंटणे, इत्यादी लक्षणे सी.एम. व्ही. रोगात आढळतात.

            सी. एम. व्ही. विषाणूचा प्राथमिक प्रादुर्भाव रोगट कंदापासून होतो. तसेच या रोगाचा दुय्यम प्रसार प्रामुख्याने मावा किडींच्या माध्यमातून होतो. सी. एम.की. विषाणूची जवळजवळ 1००० यजमान पिके आहेत.  सी.एम. व्ही. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी कोणतेही ठोस उपाय करता येत नाही. तथापि सी.एम.की. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे.

             प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटून दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावीत. बागेचे २-३ वेळा ४ ते ५ दिवसांनी नियमित निरीक्षण करून रोगग्रस्त झाडे आढळल्यास त्यांचीही वरीलप्रमाणे विल्हेवाट लावावी.

            बागेतील तसेच बांधावरील मोठा केणा, छोटा केणा, धोतरा, काहे रिंगणी चिलघोल, शेंदाड, गाजरे गवत, इत्यादी प्रकारची तणे काढून बाग स्वच्छ ठेवावी. पिकांची फेरपालट करावी. केळीत काकडी, भोपळा, कारली, दुधीभोपळा, गिलके, चवळी, टोमॅटो, वांगे, मिरची, मका या पिकांची लागवड करू नये. तसेच केळी बागेभोवती रान कारली, शेंदळी, कटुर्ले, गुळवेल यासारख्या रानटी झाडांचे वेल नष्ट करावेत.  मावा या वाहक किडीच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट ३० ई.सी. २० मिली किंवा थायोमिथोक्झाम २५ डब्लू. जी. २ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड १७.८ एस. एल. ५ मिली या किटकनाशकांची १० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

Thursday, 26 May 2022

“दामिनी” ॲपचा वापर करुन वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : मान्सून कालावधीत विशेषत:  जून व जुलै या महिन्यात विज पडून जिवीत हानी होत असते. विज पडून जिवीत हानी होऊ नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजन म्हणून पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी ‘दामिनी’ ॲप तयार करण्यात आले असून सदरचे ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आपले अधिनस्त तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, गाव स्तरावील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवा, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंयाचत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना सदरचे ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करण्यात यावे तसेच सदरचे ॲप जीपीएस लोकेशन  ने काम करीत असून विज पडण्याच्या 15 मिनिटापूवी सदरच्या ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. करीता आपले अॅप मध्ये आपले सभोवताली विज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबतचे त्यांना निर्देश देण्यात यावे. तसेच इतर सामान्य नागरिक यांना हे ॲप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे. याबाबतच्या सूचना आपले स्तरावरुन निर्गमित करण्यात याव्यात. तसेच याबाबत आपले स्तरावरुन व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करुन दामिनी ॲप गुगल प्ले स्टोअर वरुन डाऊनलोड करणे व वापरणे याबाबत माहिती द्यावी.

            गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी , कर्मचारी यांना सदर ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये प्रापत होणाऱ्या अलर्ट नुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी जिवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास जिल्हाधिकारी  तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

00000

गट, गण प्रभाग रचनांचे काम सुरु

             जळगाव: दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या प्रभागाच्या भौगोलिक सिमा निश्चित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या  पत्रान्वये जाहीर करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानुसार जि.प.पं.स.सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट व गण यांची प्रभागरचना करण्याचे कामकाज ग्रामपंचायत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय येथून करण्यात येत आहे. सदर प्रभाग रचना करण्याचे कामकाज सुरु आहे. काही स्थानिक दैनिकांमध्ये सदर प्रभाग रचनेबाबत आलेल्या चुकीच्या बातमीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे आढळून आलेले आहे.

            तरी जि.प.पं.स.प्रभाग रचनेची अंतिम प्रसिद्धी जाहिर झालेली नसल्याचे सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

00000

बियाणे, खते व किटकनाशके नियंत्रणासाठी कक्ष कार्यान्वित

             जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर वेगवेगळ्या  अडचणी व तक्रारीचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. तसेच कृषी निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी, त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे. यासाठी बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्याचा अनुषंगाने येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात येत असुन सदर नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 08468909641 तसेच कार्यालय दुरध्वनी क्रमांक 0257-2239054 तसेच टोल फ्री क्रमांक 18002334000 या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. सोबतच अडचण किंवा तक्रार saojalgaon@gmail.com वर सुद्धा मेल द्वारे पाठवता/नोंदवता येईल.

            जिल्हास्तरावर बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठा संबधी तक्रार निवारण सुविधा केंद्राची दिनांक निहाय रचना खालील प्रमाणे राहील.

            अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नाव-पदनाम, मोबाईल क्र., नेमणुक कालावधी पुढील प्रमाणे- संतोष भावसार व.लिपीक 08468909641 दि.25 ते 31 मे 2022, मुकेश सुर्वे, कृषी पर्यवेक्षक, 08468909641 दि. 1 ते 7 जुन, 2022, समाधान देवरे, कृषी सहाय्यक, 08468909641 दि. 8 ते 16 जुन, 2022, संतोष भावसार, व.लिपीक, 08468909641 दि.17 ते 24 जुन, 2022 आणि  मुकेश सुर्वे, कृषी पर्यवेक्षक, 08468909641 दि. 25 ते 30 जुन, 2022 असे आवाहन संभाजी कडू ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

             जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु हे शुक्रवारी दि. 27 मे, 2022 व शनिवारी दि. 28 मे, 2022 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

            शुक्रवार दि.27 मे, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता अमरावती येथून भुसावळ, जि.जळगावकडे प्रयाण, श्री. निलेशे बोरा यांच्या घरी सदिच्छा भेट (स्थळ- चौघुले प्लॉट, मुमराबाद नाका, मारोती मंदिराजवळ शनीपेठ, जळगाव), सकाळी 10.00 वा. भुसावळ येथे आगमन व राखीव, सकाळी 11.00 वा. मुख्याधिकारी, प्रांत, तहसिलदार, पोलीस प्रशासन यांच्यासोबत बैठक व शासकीय कार्यक्रम (स्थळ- प्रांत कार्यालय, भुसावळ), दुपारी 12.00 वा. श्री. अनिलभाऊ चौधरी यांच्या निवासस्थानी भेट व राखीव (स्थळ- न्यू एरिया वार्ड, तेली समाज मंगल कार्यालय, भुसावळ), दुपारी 1.00 वा. श्री. फिरोज शेख, प्रहार अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष, जळगाव यांच्या निवासस्थानी भेट (स्थळ- आशा हाईट, खडका रोड, भुसावळ), दुपारी 1.30 वा. श्री. संजय आवटे, प्रहार जिल्हा उपाध्यक्ष, जळगाव यांच्या निवासस्थानी भेट (स्थळ- गडकरी नगर, शंभूराजे मंडळ जवळ, भुसावळ), दुपारी 1.50 वा. श्री. विनोद कदम, प्रहार मागासवर्ग जिल्हाध्यक्ष, जळगाव यांच्या निवासस्थानी भेट (स्थळ- प्रल्हादनगर, रिंग रोड, भुसावळ), दुपारी 2.00 वा. दीपनगर वीजनिर्मिती केंद्र येथे कामगारांच्या समस्यांसदर्भात बैठक (स्थळ- दीपनगर, ता.भुसावळ), दुपारी 3.10 वा. साईबाबा मंदीर दर्शन व भुसावळ कडे प्रयाण (स्थळ-जामनेर रोड, श्रद्धा नगर, भुसावळ), दुपारी 3.30 वा. साईबाबा मंदिर ते अलॉयसिस स्कूल पर्यत बाईक रॅली व रोड शो (स्थळ – नाहाटा कॉलेज-दीनदयाळ नगर-आनंदनगर-साई डेयरी-भवानी पेठ-बाजार पेठ पोलीस स्टेशन-गांधी पुतळा-सेंट अलॉयसिस स्कूल), सायं. 5.00 अकलुद येथे कार्यकर्ता मेळावा व अपंगांना साहित्य वाटप कार्यक्रम (स्थळ-अकलूद), सायं. 5.30 वा. यावल शहरात आगमन व स्वागत समारंभ (स्थळ-बोरवाल गेट, यावल), सायं.5.45 वा. बोरवाल गेट ते सिनेमा टॉकीज रोड शो. (स्थळ- बोरवाल गेट, धनगर वाडा, मेन रोड, बारी चौक, सिनेमा टॉकीज), सायं. 6.30 वा. प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्ता मेळावा व जाहिर सभा (स्थळ-सुदर्शन सिनेमा टॉकीज, यावल), सायं. 7.30 वा. यावल येथून फैजपूरकडे प्रयाण. रात्री 8.00 वा. फैजपूर शहर येथे आगमन व स्वागत समारंभ, रात्री 8.10 वा. फैजपूर येथून रावेरकडे प्रयाण, रात्री 9.00 वा. रावेर येथे आगमन व श्री. योगेश पाटील यांच्या निवासस्थानी भेट (स्थळ- शिक्षक कॉलनी, स्टेशन रोड, रावेर), रात्री 9.30 वा. श्री. राजेंद्र महाजन, जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या विवाह सोहळ्यास सदिच्छा भेट (स्थळ- छत्रपती शिवाजी महाराज चौक, व्यायाम शाळा, रावेर), रात्री 10.30 वा. बुद्ध विहारात मुर्ती स्थापना व श्री. योगेश निकम, प्रहार युवक तालुकाध्यक्ष यांच्या घरी भेट (स्थळ- पिंप्री, ता. रावेर).

            शनिवार दि. 28 मे, 2022 रोजी सकाळी 7.00 वाजता मुक्ताईनगर येथून शासकीय वाहनाने खांडवी मार्गे जामोद, जि.जळगावकडे प्रयाण.

00000

Wednesday, 25 May 2022

तृतीयपंथीयांच्या विकास योजनांसाठी समाज कल्याण विभागाचा पुढाकार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विशेष शिबीराचे आयोजन

     जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) -  सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय  व्यक्तीसाठी  National Portal For Transgender Persons –https:transgender.dosje.gov.in  राष्ट्रीय पोर्टल सुरु  करण्यात आले आहे. सदर पोर्टलवर तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळणेसाठी अर्ज करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र सदर पोर्टलवर नोंदणी करण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. त्यामुळे राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींची निश्चित आकडेवारी उपलब्ध होत नसल्याने त्यांचेसाठी नाविन्यपूर्ण व कौशल्य विकासाच्या योजना राबविण्यास अडचणी निर्माण होत आहे. ही बाब लक्षत घेऊन राज्याच्या समाज कल्याण विभागाने आता यासाठी पुढाकार घेतला आहे.

          राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिनांक 23 मे, 2022 ते  14 जुन 2022 या कालावधीत विशेष शिबीराचे आयोजन करण्याच्या सुचना समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नुकत्याच दिल्या आहेत. सदर विशेष शिबीरात तृतीयपंथीय व्यक्तीची सदर पोर्टलवर नोंदणी करण्याबरोबरच तृतीयपंथीय व्यक्तींना तात्काळ प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करणेबाबत सुचित करण्यात आले आहे. नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक 30 मे, 2022 ते 3 जून, 2022 या दरम्यान तर जळगाव येथे दिनांक 1 जून, 2022 रोजी हे विशेष शिबिर होणार आहे. तृतीयपंथी यांचे हक्कांचे संरक्षण व कल्याण योजनेंतर्गत त्यांच्या विकासासाठी, तसेच त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, उपाययोजनांची माहिती व्हावी व जनजागृती करणे इत्यादींसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत तसेच प्रशासनाच्यावतीने तृतीयपंथीयांसाठी सांस्कृतिक संम्मेलन/ कार्यशाळा आयोजित करणेसाठी प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग (सर्व) यांचेमार्फत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण (संबंधीत) यांना निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. समाज कल्याण आयुक्तालय, पुणे येथे तृतीयपंथी समुहाचे सामाजिक सहभाग, स्वावलंबन, आरोग्य, स्वयंरोजगार नोंदणी, यावर नुकताच संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणेरी प्राईड संस्था, मैत्र क्लिनिक, गायत्री परिवाराचे प्रतिनिधी यांनी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थान, आयुष विभाग, आरोग्य मंत्रालय भारत सरकार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे, इस्कॉन शोध आरंभ रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन, पुणे व श्री संत जगदगुरु संत तुकाराम फाउंडेशन फोर फिलांथ्रोपी हे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये तृतीयपंथीयांची नोंदणी करणे, याबाबत प्रथम प्राधान्य देवून सदर नोंदणीसाठी विशेष उपक्रम घेऊन त्यांची नोंदणी करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आयुक्त समाज कल्याण यांनी निर्देश दिले आहेत. स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी यांचे सहाय्याने प्रत्येक जिल्ह्यात एकदिवशीय शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

          चौकट राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तीची निश्चित आकडेवारी (माहिती) उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी विकासाच्या योजना राबविण्यास अडचणी निर्माण होत आहे.  ह्या अडचणी दुर होण्यासाठी व राज्यातील तृतीयपंथी यांच्या विकासाकरिता धोरण निश्चित करण्यासाठी तृतीयपंथी यांची नोंदणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तृतीयपंथीय व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या समाजातील सर्व घटकांनी यासाठी सहकार्य करावे,

डॉ. प्रशांत नारनवने , आयुक्त समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे

          खालील कालावधीत राज्यातील विभागांमध्ये जिल्हा निहाय विशेष शिबीर आयोजन करण्यात आले आहे.

          मुंबई व पुणे विभाग दिनांक 23 मे, 2022 ते 31 जून, 2022,

नाशिक विभाग दिनांक 30 मे 2022 ते 3 जून, 2022

औरंगाबाद व लातुर विभाग दिनांक 1 जून ते 6 जून, 2022

नागरपूर व अमरावती विभाग दिनांक 1 जून ते 14 जून, 2022

           दिनांक 1 जून, 2022 वार बुधवार रोजी सकाळी  10.00 वाजता सामाजिक न्याय भवन, जळगाव येथे विशेष एकदिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना केंद्र शासनाच्या (https://transgender.dosje.gov.in)  या वेबसाईटवर तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तृतीयपंथी व्यक्तीचे आधार कार्ड, मतदान कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, नावात बदल केला असेल तर शासनाचे गॅझेट व एफीडेव्हीड सादर करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी आपली नोंदणी करावी, तसेच अडचणी आल्यास सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिर समोर महाबळ रोड, जळगाव            (0257-2263328-29)  येथे संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण जळगाव योगेश पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे.

०००००

सहकार विभागांतर्गत जी.डी.सी.अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा दिनांक 27 ,28 व 29 मे, 2022 रोजी

              जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा)- सहकार विभागांतर्गत जी.डी.सी.अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा  दिनांक 27 ,28 व 29 मे, 2022 रोजी जळगाव केंद्रावर शेठ. ला.ना. सार्वजनिक विद्यालय, जळगाव जिल्हा पेठ, स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखेजवळ, जळगाव या केंद्रावर घेण्यात येणार आहे.

          तरी ज्या परिक्षार्थींनी सदर परिक्षेचे अर्ज केलेले आहेत अशा परिक्षार्थींनी आपले परीक्षा प्रवेशपत्र gdca.maharashtra.gov.in  या वेबसाईटवरुन आपण तयार केलेल्या लॉगईन आयडीवरुन उपलब्ध करुन घ्यावे. तसेच सदर परीक्षार्थींना काही अडचण असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव संतोष बिडवई यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की आवश्यकतेप्रमाणे खते उपलब्ध असल्याने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जादाची खते भरुन ठेवू नये

         जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा)- खरीप हंगाम 2022 हंगामात जिल्हयात खत पुरवठा सुरळीत सुरु आहे. एप्रिल व मे, महिन्यात आवश्यकतेप्रमाणे खत पुरवठा कंपन्यांमार्फत करण्यात आलेला आहे.  युरीया या खताचा 60910 मे. टन साठा विक्री साठी उपलब्ध आहे. डीएपी खताचा 6493 मे. टन. एमओपी खताचा 8544 मे. टन एनपीके संयुक्त खतांचा 28690 मे. टन व एसएसपी खताचा 47119 खतसाठा विक्रीसाठी उपलब्ध आहे.

          एकंदरीत माहे मे च्या अखेरीस व खरीप हंगामाच्या सुरुवातीस युरीया सह इतर खतांचा पुरवठा मुबलक प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरेश्या प्रमाणात सर्व खते उपलब्ध असून दरमहा खतांच्या उपलब्धतेचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की आवश्यकतेप्रमाणे खते उपलब्ध असल्याने शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जादाची खते भरुन ठेवू नये. तसेच खताच्या बॅगवर निर्धारीत दरापेक्षा जास्त दराने खते खरेदी करु नये. जादा दराने खत विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यस संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे त्वरीत तक्रार करावी. एकाच वेळी जास्त खत खरेदी करुन साठा करुन ठेवू नये, सर्व खते उपलब्ध असल्याने जसे लागेल तसेच खत उचल करावी. खत खरेदी पक्क्या बिलाने व अधिकृत दुकानातुनच करावी. शेतकरी बांधवांनी फक्त युरीया खताचा वापर न करता इतर उपलब्ध सरळ, मिश्र व संयुक्त खतांचा वापर संतुलीत प्रमाणात करावा. जमिनीचे आरोग्य व पर्यायाने स्वत:चे आरोग्य देखील सांभाळावे व खर्चात बचत करावी.

          कृषि निवीष्ठा विक्रेते यांनी कृत्रीम खत टंचाई निर्माण करुन जादा दराने विक्री करु नये म्हणुन जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांमार्फत तपासणी सुरु आहे.  असे कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद, जळगाव वैभव शिंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

विज पडुन जिवीत हानी होऊ नये या साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

        जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) :- मान्सुन कालावधीत विशेषत: जुन व जुलै या महिन्यात विज पडून जिवीत हानी होत असते. विज पडुन जिवीत हानी होऊ नये या साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी दामिनी  ॲप तयार केले असुन सदरचे ॲप Google play Store  वर उपलब्ध आहे. या करीता सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आपले अधिनस्त तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी / कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी / मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसुल सहाय्यक, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्स सेवक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना सदरचे ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करण्यात यावे तसेच सदरचे ॲप GPS  लोकेशन ने काम करीत असून विज पडण्याच्या 15 मिनिटापुर्वी सदरच्या ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. या करिता आपले ॲप मध्ये आपले सभोवताली विज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबतचे त्यांना निर्देश देण्यात यावे. तसेच इतर सामान्य नागरीक यांना हे ॲप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे, याबाबतच्य सूचना आपले स्तरावरुन निर्गमित करण्यात याव्यात. तसेच याबाबत आपले स्तरावरुन व्हिडीओ  कॉन्फरन्स आयोजित करुन दामिनी ॲप Google Play Store  वरुन डाऊनलोड करणे व वापरणे याबाबत माहिती द्यावी व त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

          गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना सदर App-Download  करुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या  Alert  नुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी  जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास कळविण्यात यावे. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                   ०००००

जिल्हाधिकारी कार्यालयात 6 जून रोजी लोकशाही दिन ऑनलाइन होणार

           जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 6 जून, 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ऑनलाईन  व ऑफलाईन पध्दतीने  आयोजित करण्यात आलेला आहे. सदर लोकशाही दिनी ज्या नागरिकांना अर्ज करावयाचा असेल त्यांनी आपला अर्ज            (वैयक्तिक स्वरुपाचेच अर्ज)  lokshahidinjalgaon@gmail.com ”  या ई-मेल आयडीवर पाठविण्यात यावे. सार्वजनिक स्वरुपाचे अर्ज सादर केल्यास ते प्रशासकीय अर्ज म्हणून ग्राहय धरण्यात येऊन लोकशाही दिनांत स्विकारले जाणार नाहीत.

          तसेच अर्जामध्ये Whatsapp no. नमुद करावे. जेणेकरुन सदर लोकशाही दिनाची link व  passward  अर्जदारास उपलब्ध करुन दिला जाईल. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                    00000

Monday, 23 May 2022

जळगाव येथे 2 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

             जळगाव, दिनांक 23 (जिमाका) :  पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवडयांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर जळगाव विभाग, जळगाव येथे दि. 2 जून, 2022 रोजी सकाळी अकरा वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

          या अदालतीत  टपाल, मनी ऑर्डर, बचत बॅंक, स्पीड पोस्ट,कांऊटर सेवा, डाक वस्तु, पार्सल  या संदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह करावा. उदा. दिनांक व ज्या अधिकाऱ्यास मुळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादी संबंधितांनी डाक सेवे बाबतची आपली तक्रार दोन प्रतीत अधिक्षक डाकघर कार्यालय, 1 माळा, हेड पोस्ट ऑफीस बिल्डिंग, जळगाव – 425001 यांच्या नावे दि.26 मे, 2022 पर्यंत पाठवावी, असे आवाहन अधिक्षक डाकघर जळगाव विभाग जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

औरंगाबाद येथे 10 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

             जळगाव, दिनांक 23 (जिमाका) :  औरंगाबाद क्षेत्र संबंधीत टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद यांनी त्यांच्या कार्यालयात दिनांक 10 जून, 2022 रोजी सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित केली आहे.

          नागरिकांनी आपल्या तक्रारी संपूर्ण माहितीसह दोन प्रतीत अ.क.धनवडे, सहाय्यक निदेशक डाकसेवा (. शि)  पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, औरंगाबाद -431 002 या पत्त्यावर दि. 31 जून, 2022 पुर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहितीसाठी www.maharashtrapost.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. असे पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद  क्षेत्र, औरंगाबाद  यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

मुंबई येथे 17 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

             जळगाव, दिनांक 23 (जिमाका) :  पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवडयांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, जी. पी. . बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई 400001 यांच्या नावे दोन प्रती सह दि. 17 जून, 2022 रोजी सकाळी अकरा वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

          या अदालतीत  टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बॅंक खाते,  प्रमाणपत्र या संदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह करावा. डाकसेवेबाबची तक्रार दोन प्रतीत सहाय्यक निदेशक  डाकसेवा (. शि.) आणि सचिव डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, जी. पी. . बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई 400001 येथे दिनांक 31 मे, पर्यंत पाठवावी, असे आवाहन मुख्य पोस्ट मास्टर जनरल महाराष्ट्र सर्किल, मुंबई  यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

 

Thursday, 19 May 2022

धान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी ३० जुन,२०२२ पर्यंत आधार नोंदणी करुन घ्यावी

        जळगाव, दि.19 (जिमाका वृत्तसेवा) : - केंद्र शासनाची अधिसूचना दि २२ मार्च, २०२२ रोजी मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर्स अफेअर्स फूड ॲड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, भारत सरकार यांचेकडील पत्र क्र. FNo. 9-२/२०१६-PD-11/(E-३४४३३६) दि २८ मार्च, २०२२ कक्ष अधिकारी संगणक कक्ष, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून सूचना पत्र क्र. संकीर्ण - २०२२/प्र.क्र. ५६/ सं.क. दि. १२ मे, २०२२ नुसार केंद्र आणि राज्य शासनाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत धान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याचे आधार सिडींग तातडीने विहित मुदतीत करुन घेण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत.

          या सूचनानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांनी आधार क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. जे लाभार्थी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत            अन्नधान्याचा लाभ घेऊ इच्छितात परंतु त्यांच्याकडे आधार क्रमांक नाही अथवा अद्याप आधारसाठी नोंदणी केलेली नाही अशा लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या दि. २२ मार्च, २०२२ च्या अधिसुचनेनुसार आधार क्रमांक सादर करणेसाठी किंवा आधार नोंदणी करण्यासाठी दि. ३० जून, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जे लाभार्थी दिलेल्या मुदतीत आधार क्रमांक जमा करणार नाहीत त्यांचेसाठी शासन निर्देशानुसार नमुद कागदपत्रांची पडताळणी संबंधित शासकीय अधिकारी यांनी केल्यावरच अन्नधान्याचा लाभ अनुज्ञेय होईल. असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.

          यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ज्या लभार्थ्यांनी अद्याप आधार क्रमांक सादर केले नाहीत. अशा लाभार्थ्याचे आधार सिडींग करण्याकरीता दि. २५ जुन, २०२२ पर्यंत आधार क्रमांक सादर करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. या लाभार्थ्यांनी संबंधित रास्त भाव दुकानदार यांचेकडे आधार क्रमांक सादर करावेत. लाभार्थ्यांनी आधार क्रमांक सादर केल्यवर त्वरीत संकलित करण्याच्या सूचना सर्व रास्त भाव दुकानदार यांना देण्यात आल्या आहेत.

          तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आधार क्रमांक सादर केलेले नाहीत अशा लाभार्थ्यांनी दिनांक २५ जुन, २०२२ पर्यंत आपले आधार क्रमांक जमा करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.  असे जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव सुनिल सुर्यवंशी यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००