जळगाव, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्ह्यातील शेतकरी व महिला या दोन्ही घटकांना स्वयंपुर्ण करणे व त्या क्षेत्रांना चालना देण्यासाठी विविध शासकीय विभाग, महाराष्ट्र राज्य नविन्यता (MSINS) व नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प यांच्या समन्वयातुन पाणी पुरवठा व स्वच्छता महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव मा. ना. श्री गुलावराव पाटील मंत्री यांच्य अध्यक्षतेखाली व जळगाव जिल्हयातील मा. खासदार, मा. आमदार , विविध बॅकेचे प्रतिनिधी आणि विविध विभागाचे कार्यालय प्रमुख अधिकारी व विविध योजनांचे लाभार्थी यांच्या उपस्थितीत कृषि व महिला उद्योजकता – नावीन्यता परिषद शुक्रवार दिनांक 13 मे, 2022 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजन करण्यात आली आहे. तरी सदर परीषदेमध्ये शेतकरी उत्पादक कंपनीतील महिला सदस्य , प्रकल्पात समाविष्ट गांवातील शेतकरी महिला गट आणि एम.एस.आर.एल.एम अंतर्गत समाविष्ट महिला गट यांच्याकरीता कृषी आधारीत उद्योग उभारणी करीता मार्गदर्शनपर प्रत्यक्ष तथा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे युटयुब चॅनेल https;//youtube.com/jalgaonDM व फेसबुक चॅनेल https;//facebook.com/jalgaonDM वर लाईव्ह कार्यशाळा प्रसारित करण्यात येणार आहे. असे प्रकल्प विशेषज्ञ –कृषी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment