Monday, 2 May 2022

अक्षयतृतीयेच्या दिवशी होणारे बाल विवाह रोखण्यात यावे जिल्हाधिकारी : अभिजित राऊत

        जळगाव, दि.२ (जिमाका वृत्तसेवा)कोरोना कालावधीत इतर समास्या सोबत भेडसावणारी महत्वपूर्ण समस्या बालविवाह सततचे लॉकडाऊन बंद, ऑनलाईन शाळा बेरोजगारी यामुळे  बालविवाहांचे प्रमाण वाढत आहे. एप्रिल, २०२१ ते मार्च, २०२२ या संकटातील एक वर्षाच्या काळात राज्यातील वेगवेगळया भागात एकूण १३३८ बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

          ३ मे,२०२२ रोजी अक्षयतृतीया या दिवशी भारतात काही मोठया प्रमाणात विवाह आयोजित केले जातात. यावेळी ही बालिविवाह सुध्दा मोठया प्रमाणात होण्याची शक्यता असते बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ संपुर्ण राज्यात लागु करण्यात आलेला आहे. त्यानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीन पात्र गुन्हा आहे व महाराष्ट्र राज्यात देखील र्मोठया प्रमाणात बालविवाह होतात राज्यात / जिल्हयात बालविवाह होउ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

          भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील  महत्वाची आणि सार्वत्रित सामाजिक  क्रिया आहे.  सहाजिकच शुभमुहूर्तावर विवाह विधी केल्या जातात. अक्षयतृतीया हा महत्वाचा मुहूर्त असल्याने या शुभ मुहूतांवर सामुदायीक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात यामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठया प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह रोखण्यासंदर्भात केंद्र आणि राज्यशासनाकडून वेळोवेळी सुचना निर्गमित करण्यात येत आहे. व बाल विवाह ही प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार असे विवाह बेकायदा ठरतात आणि याविरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे. सदर कायदयाच्या अंमलबजावणी संदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या अधिसुचनेनुसार ग्रामिण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. त्यामळे बालविवाह रोखणे आणि बाल हक्कांच्या संरक्षणासाठी अधिक संक्षमपणे प्रयत्न होणे आवश्यक आहे. या बाबत                 मा. जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणा, विभाग, कार्यालये यांनी आपल्या अधिकारी क्षेत्रात (ग्राम/तालुका व जिल्हास्तरावर) बालविवाह होउ नयेत यासाठी जाणीव जागृती कार्यक्रम प्रशिक्षण, रॅली इ.  प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात व बाल विवाह होत असल्याचे लक्षात आल्यास त्यावर तातडीने आवश्यक कायदेशीर कारवाई करावी,  जिल्हयातील बाल कल्याण समिती, जळगाव यांच्या समक्ष आणण्यात यावे याबाबतचे निर्देश दिलेले आहे.

          तसेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जनतेला आवाहन करण्यात येत की, बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार १८ वर्षा आतील मुलींचे व २१ वर्षा आतील मुलाचे विवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबधितांनी चाईल्ड लाईन-१०९८, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव येथे ८००७९८६५५७/९५०३७५४००७ व बाल कल्याण समिती, जळगाव ०२५७-२२३९८५१ येथे संपर्क करुन माहिती दयावी, व प्रशासनाला बाल विवाह रोखण्यासाठी अपेक्षित मदत व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

          असे आवाहन सदस्य सचिव जिल्हास्तरीय कृतीदल तथा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment