जळगाव, दि.4:- जिल्ह्यात
कापुस पिकावर मोठ्या प्रमाणात शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. याबाबत
जिल्ह्यात प्रत्यक्ष शेतावर जाऊन प्रादुर्भावाचे सर्व्हेक्षण चालु आहे. याबाबत
शेतकऱ्यामार्फत जी फॉर्म (तक्रार अर्ज)
जमा करण्याची कोणतीही अंतिम तारीख नाही. याबाबत तक्रार अर्ज करण्यासाठी 4 नोव्हेंबर 2017 ही अंतिम तारीख असल्याची अफवा
आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी एक प्रसिद्धी पत्रकान्वये
कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment