जळगाव :-27:-मुद्रालोन प्रकरणे तत्काळ निकाली
काढावेत अशा सुचना जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी बॅकांना आज दिल्या.
जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर
यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अग्रणी बॅकेच्या समन्वय समितीची तीमाही बैठकीचे आयोजन
करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस रिझर्व्हे बॅक मुंबईचे
प्रतिनिधी मनोज के मून , नाबार्डचे श्रीकांत झांबरे, जिल्हा उद्योग केंद्राचे
महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, व विविध बॅकांचे व महामंडळाचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.
जिल्हाधिकार किशोर राजे निंबाळकर यांनी
यावेळी पिक कर्ज, प्रधानमंत्री विमा योजना , मुद्रा लोन विविध
महामंडळाच्या मार्फत देण्यात येणार अर्थसहाय्याचे मंजूर प्रकरणे व प्रलंबीत प्रकरणे याबाबतची बाब
निहाय आढावा घेतला.जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्हयातील विविध बँकांकडे येणारे मुद्रा लोन प्रकरणे
अनुदानाचे प्रकरणे मोठया प्रमाणात प्रलंबित आहेत.
असे प्रकरणे बॅकांनी तातडीने मंजूर करावीत, प्रकरणे बॅकांकडून मंजूर होत
नसतील तर तातडीने परत कराव्यात अशा सूचाही
त्यांनी दिल्यात .
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर म्हणाले की एच डी एफ सी व इतर बॅक मोठया प्रमाणात कर्ज प्रकरणे मंजूर करतात तर राष्ट्रीयकृत बॅंका
प्रकरणे मंजूर करण्यास टाळाटाळ करत
असतील तर जिल्हाधिकारी यानात्याने त्यांच्यावर कार्यवाही करण्याची पूर्व परवानगी आपल्याकडे
असल्याचेही त्यांनी याचेळी सांगितले.
यावेळी लिड बॅकेचे अधिकारी अरुण प्रकाश यांनी माहिती देतांना सांगितले
की, बॅकांकडे मोठया प्रमाणात प्रकरणे मंजूरीसाठी प्रलंबित असून बॅकांनी आठ दिवसात
प्रकरणे मंजूर केली नाहीत तर अशा बॅकांचे अहवाल जिल्हाधिका-यांना तात्काळ सादर केला जाईल असे
त्यांनी यावेळी सांगितले.
०००
No comments:
Post a Comment