मुंबई, दि. 5 : - माजी मंत्री अनिल भैया राठोड यांच्या निधनाने आपण एक अजात शत्रू व दिलदार मित्र गमावला आहे. अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, अनिल भैय्या हे शिवसेनाप्रमुख व शिवसेनेवर कायम निष्ठा ठेवणारे नेते होते. एका सर्वसाधारण कुटुंबात जन्म घेऊनही त्यांना आपल्या कामाच्या जोरावर विधानसभेवर सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून जाण्याची संधी मिळाली. त्यांचे संघटन कौशल्य अतिशय प्रभावी असे होते. अशा दिलदार मित्राला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
00000
No comments:
Post a Comment