Friday, 25 March 2022

कोविड -19 मुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या 18 वर्ष आतील बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी अर्जाचा विहित नमुना घेऊन आवश्यक कागदपत्रासह व मुळ अर्जासह प्रस्ताव खाली दिलेल्या तीन कार्यालयापैकी एका कार्यालयास जमा करावे

           जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : - मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल संकीर्ण प्रकरण  377/2018 (श्वेता ता दणाणे वि केंद्र शासन व इतर) मध्ये 20 ऑक्टोंबर,2021 रोजी देण्यात आलेले आदेशान्वये मा. सर्वाच्च न्यायालयाने महिला व बाल विकास विभागाच्या बाल न्याय निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील बाल न्याय निधी हा मा. आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य , पुणे यांनी मा. अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या खात्यात सदरचा निधी जमा केलेला आहे. सदर रकमेचा विनियोग कोविड -19 मुले एक वा दोन्ही पालक गमावलेल्या वयोगट 18 आतील बालकांच्या शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क, शैक्षणिक साहित्य खरेदी खर्चासाठी प्रति बालक कमाल मर्यादा रु. 10,000/- इतकी  मान्यता देण्यात आलेली आहे.

                या करिता जळगाव जिल्हयातील बाल न्याय निधी जळगाव जिल्हयातील कोविड -19 मुले एक वा दोन्ही पालक गमावलेल्या 18 वर्ष आतील बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रति बालके कमाल मर्याद रु. 10,000/- वितरीत करावयाचा असल्याने पात्र लाभार्थी यांनी आपले तालुक्यातील 1) तहसीलदार सर्व तालुके  2)एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सर्व तालुके  3)जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव पिन नं. 425001 यांचेकडुन अर्जाचा विहित नमुना घेऊन आवश्यक कागदपत्रासह व मुळ अर्जासह प्रस्ताव वरील या तीन कार्यालयापैकी एका कार्यालयास जमा करावे, अधिका माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती  प्रशासकीय इमारत , दुसरा मजला, आकाशवाणी केंद्राजवळ जळगाव फोन नं. 0257-2228828 येथे संपर्क साधावा,       

सोबत – अर्थसहाय्य मिळण्याकरिता आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.

1)       अर्ज,  2) बालकाचे आधाकार्ड झेरॉक्स प्रत,  3) बॅक पासबुक ची झेरॉक्स प्रत, 4) शाळेत दाखल असल्याचा पुरावा, 5)आई / वडील कोविड 19 मुळे मयत झाल्याबाबतचा पुरावा/ Covid Positive Report  झेरॉक्स प्रत इ.

 असे सदस्य सचिव जिल्हास्तरीय कृतीदल तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                     ०००००

महाराष्ट्र गट –क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा – 2021 परिक्षा केंद्राजवळच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्यूटर दुकाने व ध्वनीक्षेपक बंद ठेवण्याचे आदेश

         जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : - महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचेमार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट –क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा – 2021 ही जळगाव शहरातील एकुण 26 उपकेंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत घेण्यात येणार आहे. या परिक्षेच्या वेळी गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच परिक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता आहे.

            3 एप्रिल, 2022 रोजी जळगाव शहरातील एकुण 26 उपकेंद्रावर सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 पेपर सुरु झालेपासून ते संपेपर्यतच्या कालावधीसाठी जिल्हयातील या काळात परिक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी. म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (1)(2) व (3) खाली प्रदान केलेल्या अधिकारानुसार या कालावधीत पेपर सुरु झालेपासून ते संपेपर्यतच्या कालावधीसाठी जिल्ह्यातील सर्व परिक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये. हा आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागु होणार नाही.

            तसेच परिक्षा केंद्राजवळच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक पेपर सुरु असलेल्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जारी केले आहेत.

०००००

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल विकास विभाग अंतर्गत कोवीड 19 प्रादुर्भाव बालकांचे पुर्नवसन संदर्भात जिल्हास्तरीय कृती दल जिल्हा बाल संरक्षण समिती, जिल्हा महिला सल्लागार समिती व जिल्हा पुर्नवसन समिती व जिल्हा परिविक्षा समिती बैठक संपन्न्

             जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : -जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल विकास विभाग अंतर्गत कोवीड 19 प्रादुर्भाव बालकांचे पुर्नवसन संदर्भात जिल्हास्तरीय कृतीदल जिल्हा बाल संरक्षण समिती, जिल्हा महिला सल्लागार समिती व जिल्हा पुर्नवसन समिती व जिल्हा परिविक्षा समिती बैठक 21 मार्च, 2022 रोजी घेण्यात आली. सदर बैठकीत सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली रिट याचिकेनुसार रस्त्यावर रहाणाऱ्या बालकांबाबत सर्वेक्षणाच्या माध्यमातुन मिळुन आलेल्या 191 बालकाबाबत जिल्हयातील जिल्हास्तरीय कृतीदल समितीतील सदस्य, शासकीय अशासकीय कार्यालये, सामाजिक संस्था यांनी आवश्यक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणेबाबत कार्यवाही करणे, कोवीड-19 मुळे एक पालक गमावलेल्या बालक 763 व व्दिपालक गमावलेल्या बालक 27 यांच्या पैकी 706 बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. तसेच 27 व्दिपालक बालकांना 5 लक्ष मुदत ठेव प्रमाणपत्र वितरीत करणेबाबत 20 बालकांना लाभ देण्यात आला असुन 7 बालकांची संयुक्त  बॅक खाते उघण्यात आालेले आहे. तसेच पी. एम. फन्ड अंतर्गत 10 लक्ष आर्थिक मदत उपलब्ध करुन देणेबाबत मान्यता देण्यात आलेली आहे. याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी माहिती दिली व सदर बालकांना आवश्यकतेनुसार तालुकास्तरावरील विधी सेवा प्राधिकरण यांच्या सहाय्याने वारस हक्क तसेच इतर आवश्यक गरजांची पुर्तता सर्व शासकीय, अशासकीय व सामाजिक संस्था यांनी करावी व जिल्हयातील बाल संरक्षणाच्य दृष्टीकोनातुन आवश्यक ती खबरदारी घेवून कार्यवाही करावी तसेच ग्राम, तालुका व नगर स्तरावर बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात यावे व आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

            कोवीड -19 मुळे एक पालक व व्दिपालक गमावलेल्या नोंदणी झालेल्या 790 ( एकपालक -763 व व्दिपालक – 27) बालकांना बाल न्याय निधी अंतर्गत प्राप्त अनुदानातुन मिशन वात्सल्य अंतर्गत तालुका समन्वय समितीमार्फत तहसिलदार व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या माध्यमातून सदर बाकांना शालेय साहित्य शैक्षणिक शुल्क व वसतिगृह शुल्क उपलब्ध करुन देणेबाबत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात यावे व सदर बालकांना बाल न्याय निधी अंतर्गत लाभ मिळवून देण्याचे निर्देश मा. जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

            मिशन वात्सल्य अंतर्गत तालुकास्तरीय समितीचा देखील आढावा जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत घेण्यात आला व एकुण 569 एकल/विधवा महिलांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. 325 एकल/ विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. 244 महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. 235 महिलांना शिधा पत्रिका वाटप करण्यात आली आहे. तसेच कोविड 19 मुळे एकल व विधवा महिलांच्या 706 बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. सदर मिशन वात्सल्य अंतर्गत एकल / विधवा महिलांचे पुर्नवसन कामी विविध योजनांचा लाभ देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले व त्याच प्रमाणे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासुन संरक्षण अधिनियमाअंतर्गत खाजगी आस्थापना मध्ये देखील अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे बंधन कारक असल्याचे सांगितले व सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

            सदर बैठकीस जिल्हास्तरीय कृतीदलाचे सर्व सदस्य तसेच इतर विभागाचे प्रमुख व सर्व संबधीत अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते. असे सदस्य सचिव जिल्हा स्तरीय कृतीदल तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  वनिता सोनगत यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

Wednesday, 23 March 2022

जिल्ह्यात 7 एप्रिलपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

             जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि.23:- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 7 एप्रिल,2022 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) लागू करण्यात आले आहे.

            या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेत यात्रा व लग्न समारंभ यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

0000

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

 



        जळगाव, दि. 23  (जिमाका वृत्तसेवा) :- शहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा शहिद दिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला.

                जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शहिद भगतसिंग, सुखदेव तसेच राजगुरु यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले,

                याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्यासह कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

0000


जिल्ह्यात 7 एप्रिलपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

             जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि.23:- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 7 एप्रिल,2022 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) लागू करण्यात आले आहे.

            या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेत यात्रा व लग्न समारंभ यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

0000

 

मूळजी जेठा महाविद्यालयात रंगले बहुभाषिक विद्यार्थी कवी संमेलन

         जळगाव, दि. 23  (जिमाका वृत्तसेवा) :-    मूळजी जेठा महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साहित्य, कला आणि  सांस्कृतिक मंडळाच्या वतीने बहुभाषिक विद्यार्थी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. आज शहीद दिन असल्याने काव्य संमेलनामध्ये विद्यार्थी कवी आणि कवियत्री यांच्याकडून स्वांतत्र्याचा लढा, स्वातंत्र्य सेनानी, भारत देश, स्वातंत्रोत्तर भारताची स्थिती, भारताचे भविष्य, युवा पिढी, भारताची निसर्ग संपदा आणि नारी शक्ती इत्यादी  विषयाशी निगडीत मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी भाषेतील कविता सादर करण्यात आल्या. त्यामध्ये  ‘शोधला जेव्हा देशा तुझा इतिहास, मला अनेक बलिदानाचे दाखले मिळाले’,  भारत भाग्य जगाना होगा, आलस्य, भेद भाव भगाना होगा’,  ‘ मिलता नहीं रास्ता जब मंजिल का, हम अपना हौसला बनाए रखे, चढ़ना जब कठिन लगे शिखर, हाथ अपनों का थामें रखे’, ‘‘या भूमीचा स्वर्ग करण्या आत अपुल्या भान पाहिजे,  हातात बदलाचा ध्वज आणि ओठी क्रांती गान पाहिजे’,  ‘महाराष्ट्राच्या दऱ्या खोर्यातून निनादला एकच स्वर,  स्वराज्य हे सुराज्य व्हावे’ ‘कौन कहता है, पुरुष रोता नहीं’, ‘ ‘बेटियां तो देश की शक्ति है, प्रकृति का रूप, ईश्वर की भक्ति है’, अशा विविध कविता या संमेलनामध्ये सादर करण्यात आल्या.

         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या भाषा प्रशाळा संचालक डॉ. भूपेंद्र केसुर हे होते. डॉ.केसुर  यांनी संमेलनाच्या आरंभी उद्घाटनाची औपचारिक घोषणा करून संमेलनास सदिच्छा दिल्या. या संमेलनात  खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळजी जेठा महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, आय.एम.आर. कॉलेज, मणियार लॉ कॉलेज आणि  स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण 32 विद्यार्थ्यांनी विविध भाषेतील स्वलिखित कविता सादर केल्या. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील संस्कृत विभागातील डॉ.अखिलेश शर्मा यांनी एक संस्कृत भाषेतील स्वलिखित कविता, मराठी विभागातील डॉ.योगेश महाले यांनी स्वलिखित मराठी भाषेतील कविता, प्रा.विजय लोहार यांनी हिंदी भाषेतील स्वलिखित कविता आणि प्रा.किर्ती सोनावणे यांनी इंग्रजी भाषेतील स्वलिखित कविता सादर केल्या.

         यावेळी  साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळ प्रमुख डॉ. भाग्यश्री भलवतकर, डॉ.विद्या पाटील, डॉ.रोशनी पवार, डॉ.विलास धनवे प्रा.देवेश्री सोनवणे, प्रा.गोविंद पवार, प्रा.गोपीचंद धनगर, प्रा.सुनिता तडवी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.चंचल धांडे व कु. मीनाक्षी ठाकूर यांनी केले व आभार प्रा. विजय लोहार यांनी मानलेत.

                                        ००००००

कौशल्य विकास , रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर या कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीतील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण

         जळगाव, दि. 23  (जिमाका वृत्तसेवा) :- आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर या कार्यालयामार्फत अनुसुचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परिक्षाकरिता                  1 एप्रिल,2022 ते 15 जुलै, 2022 असे एकुण 3 महिने 15 दिवसांचे प्रशिक्षण मोफत दिले जाते. प्रवेश मिळवण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in  या संकेत स्थळावर नांव नोंदणी करणे आवश्यक आहे.

                प्रवेशासाठी अटी :-

                उमेदवार हा अनुसूचित जमातीचा असावा. (जातीचा दाखला आवश्यक), उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवार हा शालांत परिक्षा (10 वी) उत्तीर्ण असावा, उमेदवार हा 18 वर्ष वय पुर्ण झालेला असावा,

                वरील प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्या आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध शासकीय / निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांची तयारी करुन घेतली जाते. प्रशिक्षण काळात उपस्थित प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा रु. 1000/- विद्यावेतन देण्यात येते प्रशिक्षणामध्ये प्रवेश मिळविण्याकरीता खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व मुळ प्रती असणे आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला, 10 वी, 12 वी गुण पत्रिकेची प्रत, आधारकार्ड, बॅक पासबुक झेरॉक्स,  दोन पासपोर्ट साईज फोटो, जातीचा दाखला  इ. अधिक माहितीसाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. 2, शनि मंदीरा मागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ रावेर येथे प्रत्यक्ष 10 ते 2 वाजेपर्यंत सपर्क साधावा,

तसेच  प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वत:करावी लागेल,           संर्पकासाठी दुरध्वनी क्रमांक – 02584-251906, भ्रमणध्वनी क्रमांक – 9623936488   असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी वि.जा. मुकणे रावेर, यांनी  एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.       

                                                                                      000000

Tuesday, 22 March 2022

ऊतीसंवर्धन रोप उत्पादन विक्री करणाऱ्या कंपन्यांनी अनधिकृत हार्डनिंग हाऊस स्थळांचा 30 एप्रिल, 2022 पर्यंत परवाना घेण्यात यावा

 

        जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) :-जिल्ह्यातील सर्व ऊतीसंवर्धन रोप उत्पादन / विक्री करणाऱ्या कंपन्यांना आवाहन करण्यात येते की, बियाणे कायदा 1966 मधील ऊतीसंवर्धन रोपांचा अंतर्भाव हा बियाणेच्या व्याख्यामध्ये होतो. सद्यस्थितीत बियाणे परवाना महापरवाना प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन्‍ पध्दतीने दिला जातो. त्यामध्ये ऊतीसंवर्धीत रोपांचे रोपवाटीकांना परवाना दिला जातो.

            सदर प्रकरणी असे निदर्शनास आलेले आहे की, ऊती संवर्धीत रोपांचे विक्री परवाना घेतला जातो, मात्र ऊतीसंवर्धीत रोपांचे होर्डनिंग करणेसाठी ज्या ठिकाणी रोपे स्थलांतरीत केली जातात त्या स्थळांचे बियाणे परवान्यात समावेश केलेला नसतो.

            तरी जिल्ह्यातील सर्व ऊतीसंवर्धन रोप उत्पादन/ विक्री करणाऱ्या कंपन्यांना आवाहन करण्यात येते की, अनधिकृत हार्डनिंग हाऊस स्थळांचा 30 एप्रिल, 2022 पर्यंत परवाना घेण्यात यावा अन्यथा कृषि विभागामार्फत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

व्हॉलीबॉल खेळाच्या कौशल्य वृध्दी व गुणवंत खेळाडु शोध 16 वर्षातील मुलांसाठी 20 दिवसाचे प्रशिक्षण शिबिर

जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) :- ´ÖÆüÖ¸üÖ™Òü ¸üÖ•µÖÖŸÖ ¾ÆüÖò»Öß²ÖÖò»Ö ÜÖêôûÖ“Öß ‹Ûú ¯ÖÓ¸ü¯Ö¸üÖ †ÖÆêü. †Ö¯Ö»µÖÖ ¸üÖ•µÖÖŸÖã®Ö ÆüÖ ÜÖêôû ï֬ÖÖÔŸ´ÖÛú ¾Ö ´Ö®ÖÖê¸Óü•Ö®ÖÖ“µÖÖ ´ÖÖ¬µÖ´ÖÖŸÖã®Ö ÜÖêôûÖ»ÖÖ •ÖÖŸÖÖê. µÖÖŸÖã®Ö“Ö †Ö¯Ö»µÖÖ ×•Ö»ÊÖŸÖᯙ †®ÖêÛú ¸üÖ™ÒüßµÖ ÜÖêôûÖ›ãü ×®Ö´ÖÖÔÞÖ —ÖÖ»Öê»Öê †ÖÆêüŸÖ. ÃÖª×Ã£ÖŸÖ ¸üÖ™ÒüßµÖ Ã¯Ö¬Öì´Ö¬µÖê ´ÖÆüÖ¸üÖ™ÒüÖ“Öß ÆüÖêŸÖ †ÃÖ»Öê»Öß ×¯Ö”êûÆüÖ™ü, †ÖÓŸÖ¸üÖ™ÒüßµÖ Ã¯Ö¬ÖìÃÖÖšüß ³ÖÖ¸üŸÖßµÖ ÃÖÓ‘ÖÖ´Ö¬µÖê ŸÖÃÖê“Ö †ÖµÖÛú¸ü ×¾Ö³ÖÖÝÖ, ¸êü»¾Öê, †Öê‹®Ö•ÖßÃÖß, ÃÖÙ¾ÆüÃÖêÃÖ ‡ŸµÖÖ¤üß ×šüÛúÖÞÖß †Ö¯Ö»µÖÖ ÜÖêôûÖ›ãÓü“Öê †×ŸÖ¿ÖµÖ †»¯Ö ¯ÖÏ´ÖÖÞÖ †ÃÖŸÖê ŸÖÃÖê“Ö ¸üÖ•µÖÖ“Öê ÜÖêôûÖ›ãü פüÃÖã®Ö µÖêŸÖ ®ÖÖÆüߟÖ. ŸµÖÖ®ÖãÃÖÖ¸ü ¾ÆüÖò»Öß²ÖÖò»Ö ÜÖêôû ¾Ö ÜÖêôûÖ›ãü“ÖÖ ×¾Ö“ÖÖ¸ü Ûú¹ý®Ö“Ö ×¾Ö³ÖÖÝÖÖ®Öê ÜÖêôûÖ›ãü ¿ÖÖê¬Ö ¯ÖÏ×ÛÎúµÖêŸÖã®Ö 16 ¾ÖÂÖÖÔŸÖ߻֠ ´Öã»ÖÖÓÃÖÖšüß 20 פü¾ÖÃÖÖÓ“Öê  ¯ÖÏ׿ÖõÖÞÖ ×¿Öײָü ׿־֔û¡Ö¯ÖŸÖß ÛÎúß›üÖ ÃÖÛãÓú»Ö, ¯ÖãÞÖê µÖê£Öê ´ÖÖÆêü ‹×¯ÖÏ / ´Öê ´Öׯü®µÖÖŸÖ Ûú¸üÞµÖÖŸÖ µÖêÞÖÖ¸ü †ÖÆêü. ÃÖ¤ü¸ü ¯ÖÏ׿ÖõÖÞÖ ×¿ÖײָüÖŸÖ ŸÖÖ×´Öôû®ÖÖ›ãü µÖê£Öᯙ †ÖŸÖÓ¸üÖ™ÒüßµÖ ¯ÖÏ׿ÖõÖÛú  ÁÖß ¯Öß ÃÖß ¯ÖÖÓ×›üµÖ®Ö µÖÖÓ“Öê ´ÖÖÝÖÔ¤ü¿ÖÔ®Ö ¾Ö ¯ÖÏ׿ÖõÖÞÖ ×´ÖôûÞÖÖ¸ü †ÃÖã®Ö, ×¾Ö×¾Ö¬Ö Ã¯Ö¬ÖÖÕ´Ö¬µÖê ÜÖêôûÞµÖÖ“Öß ÃÖÓ¬Öß ˆ¯Ö»Ö²¬Ö ÆüÖêÞÖÖ¸ü †ÖÆêü. ³Ö×¾ÖµÖÖŸÖ ÃÖ¤ü¸ü ¯ÖÏ׿ÖõÖÞÖ ×¿ÖײָüÖŸÖᯙ ÜÖêôûÖ›ãÓü®ÖÖ ¯Ö¸ü¤êü¿Öß ¯ÖÏ׿ÖõÖÛúÖÓ“Öê ´ÖÖÝÖÔ¤ü¿ÖÔ®Ö ¾Ö ¯ÖÏ׿ÖõÖÖÞÖ“µÖÖ ÃÖÖêµÖß ÃÖã×¾Ö¬ÖÖ ˆ¯Ö»Ö²¬Ö ÆüÖêˆ ¿ÖÛêú»Ö. ÃÖ¤ü¸ü ¯ÖÏ׿ÖõÖÞÖ ×¿ÖײָüÖÛú׸üŸÖÖ ×•Ö»ÊÖŸÖã®Ö 01-ÃÖë™ü¸ü, 02-†™òüÛú¸ü, 02-µÖã×®Ö¾ÆüÃÖÔ»Ö / ²»ÖÖòÛú¸ü  µÖÖ ÜÖêôûÖŸÖß»Ö Ã£ÖÖ®ÖÖ¯ÖÏ´ÖÖÞÖê / ÜÖêôûÖ›ãÓü“µÖÖ ÜÖêôûÖŸÖᯙ ÜÖêôûÞµÖÖ“Öß •ÖÖÝÖÖ µÖÖ®ÖæÃÖÖ¸ü ˆ¢Ö´Ö †ÃÖê ‹ÛãúÞÖ ¯ÖÖÓ“Ö ÜÖêôûÖ›ãÓü“Öß ×®Ö¾Ö›ü ¯ÖÏÖ×¾ÖÞµÖÖ“µÖÖ †Ö¬ÖÖ¸êü Ûú¸üÞµÖÖŸÖ µÖêÞÖÖ¸ü †ÖÆêü. ÃÖ¤ü¸ü ×®Ö¾Ö›ü “ÖÖ“ÖÞÖßŸÖ ÃÖÆü³ÖÖÝÖß ÆüÖêÞµÖÖÃÖÖšüß ¿ÖÖôêûŸÖ ׿ÖÛúŸÖ †ÃÖ»Ö껵ÖÖ ØÛú¾ÖÖ ®ÖÃÖ»Ö껵ÖÖ 16 ¾ÖÂÖÖÔŸÖᯙ ÜÖêôûÖ›ãü“ÖÖ •Ö®´Öפü®ÖÖÓÛú 01/01/2007 ¸üÖê•Öß ØÛú¾ÖÖ ŸµÖÖ®ÖÓŸÖ¸ü •Ö®´Ö»Öê»ÖÖ †ÃÖÖ¾ÖÖ ¾Ö ŸµÖÖÓ“Öß ˆÓ“Öß 6        (ÃÖÆüÖ ) ±ãú™ü  †ÃÖÖ¾Öß. ŸµÖÖ“Ö¯ÖÏ´ÖÖÞÖê ÃÖ®Ö 2019-20 ´Ö¬µÖê ¾ÆüÖò»Öß²ÖÖò»Ö µÖÖ ÜÖêôûÖ“µÖÖ ×•Ö»ÆüÖßָü, ×¾Ö³ÖÖÝÖßָü ¾Ö ¸üÖ•µÖßָü ï֬ÖìŸÖᯙ ¯ÖÏ£Ö´Ö “ÖÖ¸ü ÛÎú´ÖÖÓÛúÖ“µÖÖ ¿ÖÖôêûŸÖᯙ ÜÖêôûÖ›ãü 16 ¾ÖÂÖÖÔŸÖᯙ ¾ÖµÖÖêÝÖ™ü ¾Ö 6 (ÃÖÆüÖ ) ±ãú™ ˆÓ“Öß“Öß †™ü ¯ÖãÞÖÔ Ûú¸üŸÖ †ÃÖ»µÖÖÃÖ, †¿ÖÖ ÜÖêôûÖ›ãÓü®Ößü ×®Ö¾Ö›ü “ÖÖ“ÖÞÖßŸÖ ÃÖÆü³ÖÖÝÖß ¾ÆüÖ¾ÖêŸÖ, †ÃÖê †Ö¾ÖÖÆü®Ö ´ÖÖ.†Öê´Ö¯ÖÏÛúÖ¿Ö ²ÖÛúÖê¸üßµÖÖ, †ÖµÖ㌟Ö, ÛÎúß›üÖ ¾Ö µÖã¾ÖÛú ÃÖê¾ÖÖ ÃÖÓ“ÖÖ»Ö®ÖÖ»ÖµÖ, ´ÖÆüÖ¸üÖ™Òü ¸üÖ•µÖ, ¯ÖãÞÖê µÖÖÓ®Öß Ûêú»Öê †ÖÆêü.

                   ÃÖ¤ü¸ü ×®Ö¾Ö›ü “ÖÖ“ÖÞµÖÖÓ´Ö¬µÖê ÃÖÆü³ÖÖÝÖß ÆüÖêÞµÖÖÃÖÖšüß ×•Ö»ÊÖŸÖᯙ ÃÖ¾ÖÔ ¯ÖÏÖ£Ö×´ÖÛú  / ´ÖÖ¬µÖ×´ÖÛú ¿ÖÖôûÖ, ´ÖÆüÖ×¾ÖªÖ»ÖµÖê, ÃÖÓãÖÖ, †Öפü¾ÖÖÃÖß ¯ÖÏÛú»¯Ö, ÛÎúß›üÖ ´ÖÓ›üôêû ¾Ö ×¾Ö×¾Ö¬Ö ÛÎúß›üÖ ÃÖÓ‘Ö™ü®ÖÖ µÖÖÓ®Öß ¿ÖÖôêûŸÖ ׿ÖÛúŸÖ †ÃÖ»Öê»Öê ØÛú¾ÖÖ ®ÖÃÖ»Ö껵ÖÖ ¾ÆüÖ»Öß²ÖÖò»Ö“µÖÖ ÜÖêôûÖ›ãÓü®ÖÖ ÃÖÓ¯ÖãÞÖÔ ®ÖÖÓ¾Ö, ÝÖÖ¾ÖÖ“Öê ®ÖÖÓ¾Ö ¾Ö ¯Ö¢ÖÖ, •Ö®´Öפü®ÖÖÓÛ , †Ö¬ÖÖ¸üÛúÖ›Ôü ÛÎÓú´ÖÖÛú, ˆÓ“Öß, ÜÖêôûÞµÖÖ“Öê ãÖÖ®Ö /•ÖÖÝÖÖ, ´ÖÖê²ÖÖ‡Ô»Ö ÛÎÓú´ÖÖÛú, ‡Ô´Öê»Ö ‡ŸµÖÖ¤üß †Ö¾Ö¿µÖÛú ´ÖÖׯüŸÖß ¾Ö •Ö®´ÖŸÖÖ¸üÜÖêÛú׸üŸÖÖ †Ö¾Ö¿µÖÛú †Ö¬ÖÖ¸üÛúÖ›Ô / •Ö®´Ö¤üÖÜÖ»µÖÖ“µÖÖ ÛúÖÝÖ¤ü¯Ö¡ÖÖÓÃÖÆü פü.24 ´ÖÖ“ÖÔ,2022 ¸üÖê•Öß ÁÖß ”û¡Ö¯ÖŸÖß ×¿Ö¾ÖÖ•Öß ´ÖÆüÖ¸üÖ•Ö ×•Ö»ÆüÖ ÛÎúß›üÖ ÃÖÛãÓú»Ö, •ÖôûÝÖÖÓ¾Ö µÖê£Öê ÃÖÛúÖôûß ×šüÛú 08.00 ¾ÖÖ•ÖŸÖÖ ˆ¯Ö×Ã£ÖŸÖ ¸üÆüÖÞµÖÖ“Öê ÃÖã×“ÖŸÖ Ûú¸üÖ¾Öê. ŸÖÃÖê“Ö †×¬ÖÛú ´ÖÖׯüŸÖßÃÖÖšüß ×´Ö®Ö»Ö £ÖÖê¸üÖŸÖ (¸üÖ•µÖ ÛÎúß›üÖ ´ÖÖÝÖÔ¤ü¿ÖÔÛú ) - 8625946709 µÖÖÓ“Öê¿Öß ÃÖÓ¯ÖÛÔú ÃÖÖ¬ÖÖ¾ÖÖ, †ÃÖê †Ö¾ÖÖÆü®Ö וֻÆüÖ ÛÎúß›üÖ †×¬ÖÛúÖ¸üß, ÁÖß ×´ÖØ»Ö¤ü פü×õÖŸÖ µÖÖÓ®Öß एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आवाहन

         जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर सन 2021-22 शैक्षणिक वर्षात विविध योजना राबविण्यात येतात. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन,इमाव, विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना  आदींचा त्यात समावेश आहे. या योजनांचा अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर सन 2021-22 शैक्षणिक वर्षातील प्रथम (Fresh) वर्षाचे व नुतनीकरणाचे (Renewal) अर्ज भरण्यास 31 मार्च, 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

            सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी वरील योजनांचे प्रथम (Fresh) वर्षाचे व नुतनीकरणाचे (Renewal) अर्ज 31 मार्च 2022 पर्यंत https://mahadbtmahait.gov.in या शासनाच्या महाडीबीटी संकेत स्थळावर ऑनलाईन भरावेत. महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यास दिलेली मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर पुन्हा शासनाकडून कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी सदरील बाब विद्यार्थ्यांचे निदर्शनास आणूस द्यावी. तसेच याबाबत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमध्ये आपले स्तरावरुन विविध माध्यमाद्वारे जनजागृती करावी. दिलेल्या विहित मुदतीपुर्वी पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित प्राचार्य यांची राहील. महाडीबीटी प्रणालीवर पात्र अनूसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्यांची राहील, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                                                       00000

Monday, 21 March 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारासाठी विविध संस्थासाठी शिफारस

           जळगाव, दि. २१ (जिमाका वृत्तसेवा) :- डॉ.आंबेडकर फाऊंडेशन भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या स्वायत्त संस्थेने सामाजिक समज वाढवण्यासाठी आणि दुर्बलांच्या उन्नतीसाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या महिला पुरुष आणि संस्था संघटनांना प्रदान करण्यासाठी डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना केली आहे. भारतातील विविध विभाग व संस्थांसाठी हा पुरस्कार भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान केला जातो, पुरस्काराचे स्वरुप प्रशस्तीपत्र आणि    १० लाख रुपये रोख असा आहे.

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार-२०२२ प्रस्तावांची शिफारस करण्यात आलेल्यांची यादी

१) भारत सरकारचे मंत्रालये (२) राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेशांचे सरकार (३) संसद सदस्य (४) पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्ती (५) जूरीचे माजी सदस्य (६) भारतीय विद्यापीठांचे कुलगुरु (७)प्रतिष्ठित सामाजिक संस्था आणि अशासकीय संस्था (८) ज्युरी ज्यांना पुरस्कारासाठी नामांकन करण्यासाठी आमंत्रित करु इच्छित असेल अशी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था

००००

Thursday, 17 March 2022

१९ मार्च २०२२ पासून जळगाव शहरातील १० वी च्या परीक्षा केंद्रावर बैठे भरारी पथकाची नियुक्ती ….जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

                 जळगाव, दि. १७ (जिमाका वृत्तसेवा) :-माध्यमिक शालांत प्रमाणपत्र लेखी परिक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल, २०२२ या कालावधीत पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे आयोजित करण्यात येत असल्याने सदर परिक्षेच्या वेळी गैरप्रकार टाळण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली कायमस्वरुपी दक्षता समिती स्थापन केलेली आहे. या समिती व्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यातील परीक्षा केंद्रावर परीक्षांचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी  १८ फेब्रुवारी, २०२२ अन्वये परीक्षा चालू असतांना केंद्रावर भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

                १० वी च्या परीक्षेकरीता विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा , महाविद्यालयात परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्यात आलेले असल्यामुळे शाळा, महाविद्यालयात गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी दिनांक १९ मार्च, २०२२ रोजी जळगाव शहरातील १० वी च्या परीक्षा केंद्रावर बैठे भरारी पथकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

Wednesday, 16 March 2022

उन्हाळी हंगाम 2021-22 मधील हंगामी पिकासाठी पाणी अर्ज 30 जून पर्यंत सादर करावीत

          जळगांव, (जिमाका) दि. 16- कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे जिल्ह्यातील पांझर, मालनगांव, जामखेडी, बुराई, कनोली, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी अनेर, करवंद, अमरावती, सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्प असे एकूण 12 मध्यम प्रकल्प,  लघु 45 प्रकल्प, को.प. बंधारे 22 व वळण बंधारे 22 व वळण बंधारे 30 असे एकूण 109 प्रकल्प तसेच नंदूरबार जिल्ह्यातील , रंगावली , प्रकाशा, सारंगखेडा मध्यम प्रकल्प असे एकूण 3, लघु 33 प्रकल्प, को.प. बंधारे 6, वळण बंधारे 20 असे एकूण 62 तसेच धुळे व नंदूरबार, जिल्ह्यातील अधिसुचित नदी / नाले तसेच तापी नदी वरील उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा फायदा घेणारे तमाम बागाईतदारांना दि. 1 मार्च, 2022  ते 30 जून, 2022 या कालावधी करीता 1 मार्च, 2022 पासून सुरु होणाऱ्या  उन्हाळी हंगाम 2021-22 मध्ये भुसार/अन्नधान्न्ये/चारा/डाळी/ कपाशी/भुईमुग व इतर हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याची मंजुरी देण्याचे ठरले आहे.

तरी बागाईतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात दिनांक 15 एप्रिल, 2022 पर्यंत सादर करावेत असे आवाहन कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

 

जिल्हयातील शेतकऱ्यांनी आवश्यक तेवढी खते साठवून ठेवावी …..संभाजी ठाकूर

           जळगाव, दि. १६ (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवाना आवाहन करण्यात येते की, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युध्दामुळे जागतिक खत बाजारात खत तुटवडा होण्याची शक्यता असून खताच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. भारत सर्वाधिक खतांची आयात करणारा देश असुन युध्दजन्य परिस्थीतीचा देशाला फटका बसण्याची शक्यता आहे.

                तरी शेतकरी बांधवांनी सद्यस्थितीत बाजारात मुबलक प्रमाणात खत साठा उपलब्ध असून येणाऱ्या खरीप हंगामासाठी खतांचा आवश्यक साठा करुन ठेवावा. रशिया व युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमिकवर ऐन हंगामात खतांचा तुटवडा भासणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शक्य असेल तेवढी आवश्यक खते खरेदी करुन ठेवावित असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                                    00000

“अनुभव लेखन कशासाठी? लिंगभाव (Gender) समतेसाठी” या विषयावरील 25 मार्चपर्यंत अनुभव लेखन पाठवावेत … जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

                 जळगाव, दि. १६ (जिमाका वृत्तसेवा) :- राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, यांचे कार्यालयामार्फत निवडणूक संदर्भात जनजागृती व्हावी या हेतूने जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या निमित्त्ताने अनुभव लेखन कशासाठी ?लिंगभाव (Gender) समतेसाठी या विषयावर अनुभव लेखन उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यातील निवडक लेखाचे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. जिल्हयातील नागरिकांनी  अनुभव लेखन कशासाठी? लिंगभाव (Gender) समतेसाठी या विषयावर त्यांचे अनुभव  लेख  २५ मार्च, २०२२ पर्यंत http://forms.gle/EjnmX6jvspa7cEh48  या गूगल लिंकवर पाठवावेत असे आवाहन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

Friday, 11 March 2022

जळगाव येथील सैनिकी मुलां / मुलींचे वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

                 जळगाव, दि. ११ (जिमाका वृत्तसेवा) :- माजी सैनिक /विधवांना कळविण्यात येते की, जळगाव सैनिकी मुलांचे वसतिगृह, मध्यवर्ती शिवाजी पुतळयाजवळील, जी. एस. मैदान, जळगाव येथे सदर वसतीगृहामध्ये एकूण ४८ मुलांची राहण्याची व्यवस्था आहे. तसेच सैनिकी मुलींचे वसतिगृह हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळ, धुळे रोड, जळगाव येथे सदर वसतीगृहामध्ये एकूण ४८ मुलींची राहण्याची व्यवस्था आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात जे माजी सैनिक / विधवा जळगाव शहराच्या बाहेर राहतात व त्यांचे मुल जळगाव येथे उच्च शिक्षण घेत आहे.  त्याच्या मुलांना या वसतीगृहात प्रवेश दिला जातो. माजी सैनिकांच्या मुलांना अती अल्प दरात सैन्याच्या रँक प्रमाणे भोजनखर्च आकारले जाते व विधवांच्या पाल्यांना सदर वसतीगृहामध्ये विनामुल्य प्रवेश देण्यात येतो. प्रवेश जागा शिल्लक राहिल्यास इतर नागरिक पाल्यांना नियमानुसार प्रवेश दिला जाईल. प्रवेशासाठी प्रवेश पुस्तीका/ अर्ज वसतीगृह अधिक्षक/ अधिक्षीका व कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. तरी इच्छुक माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी संबंधित अधिक्षक / अधिक्षीका यांचेकडून प्रवेश पुस्तीका/ अर्ज खरेदी करुन आपला अर्ज त्यांचेकडे सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. अधिक माहितीसाठी खालील नमुद दुरध्वनीवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा

श्री. चंद्रकांत पाटील अशासकीय वसतीगृह अधिक्षक मो.न. ९०६७३५४६५८ व दूरध्वनी क्र. ०२५७-२२३३०८८

श्रीमती अनिता पाटील वसतीगृह अधिक्षीका मो.न. ८७८८२४५२८२ किंवा दूरध्वनी क्र. ०२५७-२२४१४१४  या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

Thursday, 10 March 2022

मासिक व वार्षिक विवरण पत्र प्रलंबित व्यवसायकर दात्यांनी ३१ मार्च पर्यंत विवरणपत्र सादर करावे

           जळगाव, दि. १० (जिमाका वृत्तसेवा) :- व्यवसायकर कादयांअंतर्गत ज्या व्य्वसायकरदारांची ३१ डिसेंबर,२०२१ पर्यंतची व्यवसायकराची सर्व मासीक व वार्षीक विवरणपत्रके प्रलंबित आहे. त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने विलंब शुल्क माफी योजना आणली आहे. तरी विलंब शुल्क माफी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुळ कर व व्याज भरुन विवरणपत्रे ३१ मार्च, २०२२ पर्यंत दाखल करावी. व अधिक माहितीसाठी व्यवसायकर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे व्यवसायकर अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

रब्बी हंगाम २०२१ हंगामातील नैसर्गिक आपत्ती संदर्भात पूर्वसुचना विमा कंपन्यांना तात्काळ दयावत

                 जळगाव, दि. १० (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्हयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून. या अधिसुचित क्षेत्रातील पिकांसाठी महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरुन ही योजना रब्बी पिकासाठी आय.सी.आय सी.आय लोमबार्ड विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे.  जिल्ह्यात दिनांक ७ ते ९ मार्च, २०२२ या कालावधी मध्ये अमळनेर, चोपडा व धरणगाव किंवा इतर तालुक्यांमध्ये जिल्ह्याध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized calamities ) या बाबी अंतर्गत वीज कोसळणे, गारपिट, वादळ, पूर, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग आणि तत्सम नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले असल्यास विमा कंपनीला ७२ तासांच्या आत कळवणे आवश्यक आहे.

                या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीमेतर्गत शेतपिकाचे नुकसान झाल्यास पिक विमा घेतलेल्या अधिसूचित पिकांचे पिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी पिक नुकसानीच्या पुर्वसुचना (initmition)  नुकसानग्रस्त पिकाच्या फोटोसह प्रथम विमा कंपनीस क्रॉप इन्शूरन्स ॲप, विमा कंपनी टोल फ्री क्रमांक  १८००१०३७७१२ व्दारे, विमा कंपनीचा       ई – मेलव्दारे  (prabhas.arbain@icicilombard.com)    विमा कंपनीचे तालुकास्तरावरील कार्यालय, ज्या बॅकेत विमा जमा केला ती बँक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना कळविण्यात यावे. तसेच प्रत्येक तालुक्याला विमा कंपनीचे कार्यालय कार्यन्वीत असून ऑफलाईन पध्दतीने पुर्वसुचनांचे अर्ज विमा कंपनी कार्यालय / तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावित, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

Wednesday, 9 March 2022

जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा संपन्न

         जळगाव, दि. ९ (जिमाका वृत्तसेवा) :-  8 मार्च, 2022 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन पत्रकार भवन येथे कोरोना काळात एकल विधवा झालेल्या महिलांचा महिला मेळावा मा. तहसिलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. सदर महिला मेळाव्यात जळगाव शहरी व ग्रामीण भागातील 100 महिला उपस्थित होत्या राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापुजन, दीपप्रज्वलन करुन मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मिशन वात्सल्याची माहिती मा. बाल विकास प्रकल्प अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी दिली.

                महानगरपालिका शिक्षण विभाग अधिक्षक श्री. चंद्रकांत वांद्रे यांनी शिक्षण विभागाकडुन देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. कृषी विभागाच्या योजनांबाबत माहिती दिली. आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय सपकाळे यांनी आरोग्य विभागातील योजना व कागदपत्रांची माहिती सांगितली. ॲङ भारती कुमावत यांनीविधी सेवा प्राधिकरणाकडुन देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सांगितले, महिला अशासकीय सदस्य श्रीमती तेजस्विता यांनी महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवितांना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले. श्री. मुक्कावर बाल संरक्षण कक्ष यांनी बालसंगोपन योजनेबाबत माहिती दिली.

                तहसिलदार श्री नामदेव पाटील यांनी तहसिल कार्यालयाकडुन देण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, रोजगार हमी योजना, रेशनकार्ड इ. बाबत माहिती दिली. व सर्व विभागातील उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागांतर्गत येणाऱ्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर केलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या निर्देशांकनुसार त्वरीत देणेविषयी आदेशित केले. महिला मेळाव्यामध्ये संजय गांधी योजनेचा लाभ मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उपस्थित महिलांच्या अडचणी समजुन घेतल्या व महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवित असतांना काही अडचणी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले.

                कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत बाल विकास प्रकल्प अधिकारी शहरी विजयसिंग परदेशी व अति. बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण श्रीमती भोईर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. मेळाव्याचे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती रत्ना चौधरी यांनी केले आभार श्रीमती नर्गिस तडवी यांनी मानले महिला मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजनासाठी पर्यवेक्षिका श्रीमती सुनिता नेरकर, श्रीमती नर्गिस तडवी, श्रीमती रत्ना चौधरी व सर्व अंगणवाडी सेविका शहरी व ग्रामीण यांनी विशेष परिश्रम घेतले असे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी विजयसिंग परदेशी यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

आंतरराष्ट्रीय महिला दिन 08 मार्च २०२२

        जळगाव, दि. ९ (जिमाका वृत्तसेवा) :-  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून यावर्षीच्या ‍दिनांक ८ मार्च २०२२ आंतरराष्ट्रीय महिला दिनाला मान्यता मिळाली आहे.  आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मा.मंत्री (कृषि) ना.श्री.दादाजी भुसे यांनी कृषि क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांशी ऑनलाईन संवाद साधला.  या कार्यक्रमामध्ये मा.राज्यमंत्री (कृषि) डॉ.विश्वजित कदम, मा.प्रधान  सचिव (कृषि व पदुम) श्री.एकनाथ डवले, मा.आयुक्त (कृषि) श्री.धीरज कुमार हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमात कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे व उपस्थित महिलांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मा.संचालक (विस्तार व प्रशिक्षण) श्री.विकास पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.      

मा.मंत्री (कृषि) ना.श्री.दादाजी भुसे यांनी महिलांशी संवाद साधत सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  शेती व शेतीवर आधारित पूरक उद्योगांमध्ये काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक आहे.  परंतु केवळ १४ टक्के महिलांच्या नावावर शेती आहे व महिलांच्या नावावर शेती नसल्याने विविध शासकीय योजनांपासून त्या वंचित राहतात.  कृषि विभागाच्या विविध योजनांच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टल अंतर्गत प्रत्येक योजनेमध्ये महिलांसाठली ३० टक्के निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे.  त्यामुळे कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढत आहे.  तसेच ७/१२ उताऱ्यावर महिलांचे नाव लागण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे.  कृषि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या वाढत आहे.  त्यांना सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन केले जात आहे.  विविध योजना, उपक्रम, प्रशिक्षण, चर्चासत्र, मेळावे यामध्ये महिलांचा सहभाग वाढविला जात आहे.  कृषि मालाची विक्री व्यवस्था करण्यासाठी कृषि विभागाची स्वतंत्र विंग स्थापन केलेली आहे.  त्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स तयार करण्यात आलेला आहे.  येत्या काही दिवसांत त्याचे परिणाम दिसून येतील. 

            मा.आयुक्त (कृषि) यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व भगिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  महिला शेतकरी वर्ष यांचे अनुषंगाने महिला धोरणाचा कच्चा मसुदा तयार केलेला आहे असे सांगितले.  महिला सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करीत आहेत. त्यांचा गौरव व प्रतिक म्हणून जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो.  यावर्षीच्या महिला दिनाची संकल्पना “Break the Bias”  ही असुन कृषि क्षेत्रामध्ये Technology and Education ही या दोन अस्त्रांचा वापर करुन सर्व योजना प्रभावीपणे अंमलात आणणार आहेत.  या दिनाचे औचित्य साधून कृषि क्षेत्रात जास्तीत जास्त महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे प्राधान्याने महिला शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देणे, महिला शेतकरी गट यांना अधिकाधिक प्रोत्साहन देणार आहे असे आश्वासन दिले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कृषि क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांनी आपले मनोगत सांगितले तसेच त्यांचे अनुभवातून इतर महिलांना मार्गदर्शन केले.  श्रीमती प्रतिभा चौधरी, जिजामाता कृषिभूषण पुरस्कारप्राप्त महिला शेतकरी यांनी महिलांचा विविध समित्यांमध्ये सहभाग वाढविणे, त्यांच्या उत्पादित मालासाठी विक्री व्यवस्था निर्माण करणे याबाबत माहिती दिली. श्रीमती अनिता माळगे यांनी महिलांना एकत्र करुन यशस्विनी ॲग्रो प्रोडयुसर कंपनीची स्थापना करुन त्या अंतर्गत विविध प्रक्रिया उद्योग उभारुन यशस्विनी नावाचा ब्रँड तयार केला व यातून सर्व महिलांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.  श्रीमती भाग्यश्री फरांदे यांनी महिलांचे शेतीतील श्रम कमी करण्यासाठी संशोधन होऊन नवीन तंत्रज्ञान, अवजारे यांचा विकास व्हावा तसेच कृषि पदवीधारक महिलांना कृषि प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण मिळावे असे सांगितले. श्रीमती वैशाली पाटील यांनी खपली गहू लागवड तंत्रज्ञान तसेच त्याचे वाढते क्षेत्र व विक्री व्यवस्थेची सोय करणे याबाबत मार्गदर्शन केले.  श्रीमती सविता येळणे यांनी सेंद्रिय शेती शेतकरी ते ग्राहक थेट विक्री याबाबत त्या करीत असलेल्या कार्याबाबत माहिती दिली.  श्रीमती सविता चव्हाण यांनी स्वत:च्या शेतामध्ये शेतामधील पिकांची पॅकिंग करुन विक्री करणे याबाबत माहिती दिली.  श्रीमती शारदा कागदे यांनी नर्सरी उद्योगाबाबत माहिती दिली.  सदर कार्यक्रम सकाळी 10.३० वाजता कृषी विभागाच्या यूट्यूब चॅनेल https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM वर लाईव्ह प्रसारित झाला.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अर्चना सुळ, तालुका कृषि अधिकारी, खालापूर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती प्रितम आगलावे, तंत्र अधिकारी, माहिती विभाग यांनी केले.

००००

ग्रामीण भागातील शेतकरी व ज्येष्ठ नागरिकांसाठी इंटर –ऑपरेबिलटी सेवा उपलब्ध

       जळगाव, दि. ९ (जिमाका वृत्तसेवा) :- २०२२ मध्ये, १.५ लाख पोस्ट ऑफिस १०० टक्के कोअर बँकिंग प्रणालीवर येतील, ज्यामुळे आर्थिक समावेश साध्य होऊ शकेल तसेच नेट बॅकिंग, मोबाईल बॅकिंग, एटीएम व्दारे या खात्यांमध्ये व्यवहार करणे शक्य होईल. पोस्ट ऑफिस आणि बँक खाती यांच्यामध्ये निधीचे ऑनलाईन हस्तांतरण करणे शक्य होण्यासाठी विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी इंटर – ऑपरेबिलटी आणि आर्थिक समावेशन सुविधा उपलब्ध होईल या सेवांचा सर्व नागरिकांनी व जनतेने या सुविधांचा जास्तीत जास्त  लाभ घ्यावा,

                 असे आवाहन अधीक्षक डाकघर  जळगाव विभाग जळगाव बी. व्ही. चव्हाण  यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.                                                                00000

जिल्हाधिकारी कार्यालय, व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे ८ मार्च, २०२२ जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा संपन्न

      जळगाव, दि. ९ (जिमाका वृत्तसेवा) :- ८ मार्च हा जागतिक महिला दिन असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे सकाळी ११.०० वाजता महिलांसाठी असलेले सामाजिक कायदे, विविध योजना व मतदार यादीत महिलांची नोंदणी वाढावी यासाठी जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,

 सदर जनजागृती कार्यक्रमासाठी मा. श्री. तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी ( निवडणुक), जळगाव हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच श्रीमती वैजयंती तळेले, अध्यक्ष बाल कल्याण समिती जळगाव डॉ. शैलजा चव्हाण, ॲङ प्रदिप आत्माराम पाटील, श्री. नितीन विसपुते, सदस्य- बाल कल्याण समिती जळगाव, ॲङ आशिष पाटील, सदस्य- स्थानिक तक्रार समिती, जळगाव हे उपस्थित होते.

 या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी कुटुंबात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी असलेला सामाजिक कायदा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा -२००५ बाबत मनियार विधी महाविद्यालयाचे        मा. ॲङ प्रा. विजेता सिंग यांनी कायद्यांतर्गत असलेल्या तरतुदी व महिलांचे अधिकार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा, २०१२ बाबत डॉ. प्रदिप जोशी, मानसोपचार तज्ञ जळगाव यांनी बालकांवर होणाऱ्या लैगिंक  अत्याचाराबाबत वस्तुनिष्ठ आकडेवारीसह माहिती सादर करुन बाल लैगिंक अत्याचाराच्या प्रकरणात बालकांच्या जवळच्या नातेवाईकांकडून अत्याचार होण्याचे प्रमाण अधिक अल्याचे सांगितले, तसेच कायद्यांतर्गत असलेल्या तरतुदी व बालकांचे अधिकार याबाबत विस्तुत माहिती दिली.

सदर कार्यक्रमात दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशिय संस्था, जळगावचे विनोंद ढगे व सहकारी यांनी मनोरंजनात्मक पथनाटयपर कार्यक्रम सादर करुन बेटी बचाओ, बेटी पढाओ व व्यसनमुक्ती या विषयांवर प्रबोधन केले. तसेच भारतीय गणराज्याच्या लोकशाहीचे बळकटीकरण व्हावे व त्यामध्ये महिलांचे प्रतिनिधीत्व व त्यांचा सहभाग वाढावा यासाठी अधिकाधिक महिलांनी मतदार याद्यांमध्ये आपली नावे नोंदवून मतदानाचा आपला अधिकार प्राप्त करावा यासाठी श्री तुकाराम हुलवळे उपजिल्हाधिकारी निवडणुक यांनी सादरीकरणाव्दारे उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले तसेच उपजिल्हाधिकारी हुलवळे यानी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करुन उपस्थित महिलांचे उदबोधन केले.

 सदर महिला दिनाच्या अनुषंगाने महिला सशक्तीकरणासाठी विशेष योगदान देणाऱ्या महिला, कोविड-१९ च्या कालावधीत विशेष योगदान देणाऱ्या महिला तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची चोख जबाबदारी सांभाळणाऱ्या एकल महिलांचा सत्कार सदर कार्यक्रमात करण्यात आला.

 या कार्यक्रमात जिल्हा व बाल‍ विकास अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

महिला लोकशाही दिनाचे २१ मार्चला ऑनलाइन आयोजन

                    जळगाव, दि. ९ (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार २१ मार्च, २०२२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. 

                समस्याग्रस्त व पीडीत महिलांना प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, शासकीय यंत्रणांकडून सोडवणुकीसाठी समाजातील पीडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होवून प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याचा तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी हा उपक्रम राबविण्यात येतो. त्यानुसार महिला लोकशाही दिन ऑनलाइन आयोजीत करण्यात आलेला आहे. या लोकशाही दिनी ज्या महिलांना अर्ज करायचा असेल त्यांनी आपला अर्ज आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ई- मेलवर पाठवावा. तसेच अर्जामध्ये आपला व्हॉटसॲप क्रमांक  नमूद करावा, जेणेकरुन या लोकशाही दिनाची लिंक व पासवर्ड अर्जदारास उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

            ई- मेल आयडी असे : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव- dwcwjal@gmail.com, तहसीलदार, जळगाव- tahasildarjalgaon@gmail.com, तहसीलदार, जामनेर- tah.jamner@gmail.com, तहसीलदार, एरंडोल-  erandoltahsil123@gmail.com, तहसीलदार, भुसावळ- tahsilbhusawal@gmail.com, तहसीलदार, धरणगाव- dharangaon2014@gmail.com,तहसीलदार, बोदवड- tahsilbodwad@gmail.com तहसीलदार, यावल- tyawal@gmail.com, तहसीलदार, रावेर- tahsilraver@gmail.com, तहसीलदार, भडगाव- tahsildarbhadgaon@gmail.com, तहसीलदार, चाळीसगाव- tahsildar40gaon@gmail.com, तहसीलदार, अमळनेर- amalnertahsil@gmail.com, तहसीलदार, पारोळा- parolatahsil@gmail.com, तहसीलदार, पाचोरा-  tahsilpachora@gmail.com, तहसीलदार, मुक्ताईनगर- tahsilmkt@gmail.com, तहसीलदार, चोपडा- tahsidarchopda@gmail.com.

00000

Tuesday, 8 March 2022

जिल्ह्यात 23 मार्चपर्यंत 37 (3) कलम जारी

           जळगाव, दिनांक 8 (जिमाका) : - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 23 मार्च, 2022 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) जारी करण्यात आले आहे.

          या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश लग्न समारंभ, व प्रेत यात्रा, यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव श्री. राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

000

Friday, 4 March 2022

नोंदणीकृत न्यासांचे / संस्थांचे प्रलंबित बिनवाद बदल अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

             जळगाव, दिनांक 4 (जिमाका) :-धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे दिनांक 25 फेब्रुवारी, 2022 रोजीच्या आदेशानुसार या कार्यालयामार्फत दिनांक 14 ते 25 मार्च, 2022 या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील या कार्यालयात नोंदणीकृत न्यासांचे / संस्थांचे प्रलंबित बिनवाद बदल अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

                या कार्यालयात दाखल केलेल्या बिनवाद बदल अर्ज प्रकरणांमध्ये काही दस्तऐवजांची पुर्तता करण्याचे राहिले असल्यास न्यसाचे विश्वस्तांनी दिनांक 14 ते 25 मार्च, 2022 या कालावधीत किंवा तत्पुर्वी आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता करावी व आपल्या न्यासाच्या संदर्भात असलेल्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी या कार्यालयास सहकार्य करावे, असे धर्मादाय उप आयुक्त ग.श्री. जोशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

जळगाव जिल्ह्यासाठी सुधारित निर्बंध लागू

             जळगाव, दिनांक 4 (जिमाका) :-  महाराष्ट्र राज्यात कोविड -19 विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नविन विषाणूचा प्रादुर्भाव / संसर्ग मोठया प्रमाणात होत असल्याने नमूद शासन आदेश दिनांक 8  व 9 जानेवारी, 2022 च्या सुधारीत निर्बध लागू करण्यात आलेले आहेत.

                 दिनांक 1 मार्च, 2022 अन्वये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 25 फेब्रुवारी, 2022 रोजी झालेल्या बैठकीत संपूर्ण राज्यात दिनांक 4 मार्च,2022 पासून सुधारीत निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.

                 सार्वजनिक सेवा पुरविणाऱ्या सर्व प्रकारच्या आस्थापनेच्या ठिकाणी काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी कोविड – 19 प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घेणे आवश्यक राहील, घरपोच सुविधा पुरविणारे कर्मचारी यांनी कोविड – १९ प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घेणे आवश्यक राहील, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी संबंधीत सर्व कर्मचारी यांनी कोविड -19 प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घेणे बंधनकारक राहील, मॉल्स, शिएटर, नाटयगृह, पर्यटन स्थळ, रेस्टॉरंट, क्रिडा स्पर्धा, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी येणारे सर्व अभ्यांगत, नागरिक यांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घेणे बंधनकारक राहील.   

                सर्व कार्यालये / आस्थापना, सार्वजनिक/ खाजगी ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी ज्यांचे सामान्य जनतेशी संपर्क येतो अशा सर्व कर्मचाऱ्यांना कोविड -19 प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घेणे बंधनकारक राहील. सर्व औद्योगिक कंपन्या / आस्थापना या ठिकाणी काम करणार सर्व कर्मचारी यांनी कोविड -19 प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण करुन घेणे बंधनकारक राहील, सामाजिक / क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सण-उत्सव संबंधित कार्यक्रम लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर प्रकारेचे मोठया प्रमाणावर गर्दी होणारे कार्यक्रम, सभा हे केवळ जागेच्या 50%  क्षमेतेच्या आत किंवा 200 लोकांच्या मर्यादेत साजरा करता येतील. सर्व शैक्षणिक संस्थेच्या ठिकणी ऑफलाईन क्लासेस हे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार सुरु राहतील. तसेच संबंधित शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांनी शिक्षणाचा फायदा देण्यासाठी  Hybrid model  नुसार ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीचा वापर करावा. सर्व प्राथमिक शाळा व अंगणवाडी सुरु राहतील, वर नमूद सर्व शैक्षणिक संस्था / आस्थापना यांनी कोविड अनुरुप वर्तनाचे ( Covid Appropriate Behaviour )  पालन करणे अनिवार्य राहील. सर्व घरपोच सुविधा पुरविणाऱ्या सेवा सुरु राहतील, सर्व शॉपींग कॉम्प्लेक्स, सिनेमा हॉल्स, रेस्टॉरंट व बार, स्पोटर्स कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, स्विमींग पुल, धार्मिक स्थळे, नाटयगृह, पर्यटन स्थळे, मनोरंजन पार्क इत्यादी ठिकाणे हे 50% क्षमतेसह सुरु राहतील.

                कोविड -19 प्रतिबंधात्मक लसीकरणाची मात्रा घेतलेल्या नागरिकांना आंतरराज्य व राज्यांतर्गत प्रवास करण्यास मुभा राहील. तथापि ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही. अशा नागरिकांना 72 तासाच्या आतील निगेटीव्ह RTPCR  चाचणीचा अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील, तसेच प्रवास करण्यासाठी कोणत्याही प्रवेश पासची आवश्यकत राहणार नाही, सर्व शासकीय, खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील, सर्व औद्योगिक कंपन्या/ आस्थापना, वैज्ञानिक संस्था पूर्ण क्षमतेने सुरु राहतील, वर नमूद केलेल्या कार्यक्रम / उपक्रमांव्यतिरीक्त इतर सर्व उपक्रम हे 50% क्षमतेसह सुरु राहतील

                वरील प्रमाणे जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तिकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.

                तसेच शासन आदेश दिनांक 27 नोव्हेंबर, 2021 मध्ये दिलेल्या निर्देषानुसार कोविड अनुरुप वर्तनाचे

( Covid Appropriate Behaviour )   उल्लघन करण्याऱ्या व्यक्ती /संस्था / घटक यांचेवर पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करावी व सदरची रक्कम शासनाच्या दिनांक 26 ऑक्टोंबर, 2021 रोजीच्या आदेशात नमूद केल्यानुसार   Revenue Receipt, (c) Other non-Tax Revenue, (1) General Services, ००७०-Other Administrative Services ८०० Other Receipt  या लेखाशिर्षाखाली शासन जमा करावी.

                सदर आदेशाचे उल्लघंन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ मधील तरतुीनुसार शिक्षेस पात्र राहील असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्व्ये कळविले आहे.

००००