जळगाव, दि. १० (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्हयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून. या अधिसुचित क्षेत्रातील पिकांसाठी महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरुन ही योजना रब्बी पिकासाठी आय.सी.आय सी.आय लोमबार्ड विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात दिनांक ७ ते ९ मार्च, २०२२ या कालावधी मध्ये अमळनेर, चोपडा व धरणगाव किंवा इतर तालुक्यांमध्ये जिल्ह्याध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized calamities ) या बाबी अंतर्गत वीज कोसळणे, गारपिट, वादळ, पूर, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग आणि तत्सम नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले असल्यास विमा कंपनीला ७२ तासांच्या आत कळवणे आवश्यक आहे.
या
योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीमेतर्गत
शेतपिकाचे नुकसान झाल्यास पिक विमा घेतलेल्या अधिसूचित पिकांचे पिक नुकसान भरपाई
मिळण्यासाठी पिक नुकसानीच्या पुर्वसुचना (initmition) नुकसानग्रस्त पिकाच्या फोटोसह प्रथम विमा
कंपनीस क्रॉप इन्शूरन्स ॲप, विमा कंपनी टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२ व्दारे, विमा कंपनीचा ई
– मेलव्दारे (prabhas.arbain@icicilombard.com) विमा कंपनीचे तालुकास्तरावरील कार्यालय, ज्या
बॅकेत विमा जमा केला ती बँक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना कळविण्यात यावे.
तसेच प्रत्येक तालुक्याला विमा कंपनीचे कार्यालय कार्यन्वीत असून ऑफलाईन पध्दतीने
पुर्वसुचनांचे अर्ज विमा कंपनी कार्यालय / तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावित,
असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी
दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment