जळगाव, दिनांक 4 (जिमाका) :-धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे दिनांक 25 फेब्रुवारी, 2022 रोजीच्या आदेशानुसार या कार्यालयामार्फत दिनांक 14 ते 25 मार्च, 2022 या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील या कार्यालयात नोंदणीकृत न्यासांचे / संस्थांचे प्रलंबित बिनवाद बदल अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
या
कार्यालयात दाखल केलेल्या बिनवाद बदल अर्ज प्रकरणांमध्ये काही दस्तऐवजांची पुर्तता
करण्याचे राहिले असल्यास न्यसाचे विश्वस्तांनी दिनांक 14 ते 25 मार्च, 2022 या
कालावधीत किंवा तत्पुर्वी आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता करावी व आपल्या न्यासाच्या
संदर्भात असलेल्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी या कार्यालयास सहकार्य
करावे, असे धर्मादाय उप आयुक्त ग.श्री. जोशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment