जळगाव,
दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) :-जिल्ह्यातील सर्व ऊतीसंवर्धन रोप उत्पादन / विक्री करणाऱ्या
कंपन्यांना आवाहन करण्यात येते की, बियाणे कायदा 1966 मधील ऊतीसंवर्धन रोपांचा
अंतर्भाव हा बियाणेच्या व्याख्यामध्ये होतो. सद्यस्थितीत बियाणे परवाना महापरवाना
प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन् पध्दतीने दिला जातो. त्यामध्ये ऊतीसंवर्धीत
रोपांचे रोपवाटीकांना परवाना दिला जातो.
सदर प्रकरणी असे निदर्शनास आलेले आहे
की, ऊती संवर्धीत रोपांचे विक्री परवाना घेतला जातो, मात्र ऊतीसंवर्धीत रोपांचे
होर्डनिंग करणेसाठी ज्या ठिकाणी रोपे स्थलांतरीत केली जातात त्या स्थळांचे बियाणे
परवान्यात समावेश केलेला नसतो.
तरी जिल्ह्यातील सर्व ऊतीसंवर्धन रोप
उत्पादन/ विक्री करणाऱ्या कंपन्यांना आवाहन करण्यात येते की, अनधिकृत हार्डनिंग
हाऊस स्थळांचा 30 एप्रिल, 2022 पर्यंत परवाना घेण्यात यावा अन्यथा कृषि
विभागामार्फत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment