जळगाव, दि. १६ (जिमाका वृत्तसेवा) :- राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, यांचे कार्यालयामार्फत निवडणूक संदर्भात जनजागृती व्हावी या हेतूने जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या निमित्त्ताने “ अनुभव लेखन कशासाठी ?लिंगभाव (Gender) समतेसाठी ” या विषयावर अनुभव लेखन उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यातील निवडक लेखाचे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. जिल्हयातील नागरिकांनी “अनुभव लेखन कशासाठी? लिंगभाव (Gender) समतेसाठी” या विषयावर त्यांचे अनुभव लेख २५ मार्च, २०२२ पर्यंत http://forms.gle/EjnmX6jvspa7cEh48 या गूगल लिंकवर पाठवावेत असे आवाहन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment