Wednesday, 16 March 2022

जिल्हयातील शेतकऱ्यांनी आवश्यक तेवढी खते साठवून ठेवावी …..संभाजी ठाकूर

           जळगाव, दि. १६ (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवाना आवाहन करण्यात येते की, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युध्दामुळे जागतिक खत बाजारात खत तुटवडा होण्याची शक्यता असून खताच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. भारत सर्वाधिक खतांची आयात करणारा देश असुन युध्दजन्य परिस्थीतीचा देशाला फटका बसण्याची शक्यता आहे.

                तरी शेतकरी बांधवांनी सद्यस्थितीत बाजारात मुबलक प्रमाणात खत साठा उपलब्ध असून येणाऱ्या खरीप हंगामासाठी खतांचा आवश्यक साठा करुन ठेवावा. रशिया व युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमिकवर ऐन हंगामात खतांचा तुटवडा भासणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शक्य असेल तेवढी आवश्यक खते खरेदी करुन ठेवावित असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                                    00000

No comments:

Post a Comment