जळगाव, दि. 28:- तेरा कोटी वृक्ष लागवड मोहिमेत यंदा जळगाव
जिल्हयात 42 लाख 43 हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने दिले आहे. मात्र जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी
जिल्हयात 43 लाख 44 हजार झाडे लावण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी जिल्हयातील
सर्व यंत्रणांना त्यानुसार झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले असून जिल्हयात वृक्ष लागवडीसाठी 43 लाख खड्डे खोदले आहेत
यावरुन यावर्षी उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षांची लागवड होणार आहे.
तेरा कोटी वृक्ष
लागवड मोहिमेसाठी जिल्हयात 43 लाख खड्डे खोदले गेले असून 42 रोप वाटीकांमध्ये 80
लाख रोपे तयार असून जिल्हयात आहेत. यात सामाजिक वनीकरण विभाग 4 लाख 13 हजार 520
वन्यजीव विभाग 39 हजार 187, ग्रामपंचायती 12 लाख 95 हजार 953, प्राथमिक व माध्यमिक
शाळांनी 42 हाजर 139, सार्वजनिक बांधकाम विभाग 45 हजार 600, कृषी विभाग 6 हजार
492, नगर विकास विभाग 45 हजार 558, सहकार विभाग 32 हजार 410, तर आदिवासी विकास
विभाग 16 हजार 226 खड्डे खोदण्यात आली आहे. खड्डे खोदलेल्या विभागांना वन विभागाकडून रोपे
पुरविण्यात आले आहेत.
जिल्हयातील सर्व
ग्रामपंचायती व शासकीय विभागांना मोफत रोपे पुरविण्यात आली असून ग्रामपंचायतींना जागेवर रोपे उपलब्ध करुन दिलेले आहेत. जनतेला
विक्रीसाठी 8 रुपये प्रमाणे रोपे उपलब्ध करुन दिले असून, जनतेने मोठया प्रमाणात रोपे लावावेत असे आवाहन ही
जिल्हाधिका-यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment