Friday, 28 June 2024

निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची हॉर्टीनेट प्रणालीवर शेत नोंदणी करण्याचे आवाहन मोहन वाघ, विभागीय कृषि सहसंचालक नाशिक

         जळगाव, दि. २८  (जिमाका वृत्तसेवा) :-  महाराष्ट्र राज्य है फलोत्पादन पिकांच क्षेत्र उत्पादन व निर्यातीमध्ये अग्रेसर असून राज्यातुन तसेच नाशिक विभागातून मोठ्या प्रमाणात विशेषत द्राक्ष, केळी, आंबा डाळिंब व इतर फळ पिकाची तसेच कांदा, भेड़ी व इतर भाजीपाला पिकांची अपेडाच्या सहकार्याने निर्यात यूरोपियन यूनियन, सार्क देश व इतर देशांना केली जाते.

            राज्यातून फळ व भाजीपाला पिकांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी व आयातदार देशाच्या किडनाशक उर्वरित अश व किड रोग मुक्तची हमी देण्यासाठी सन २००४-०५ पासून ग्रेपनेट या ऑनलाइन कार्यप्रणालीची यशस्वीपण अंमलबजावणी करण्यात येत आहे. नियांतीला चालना देण्यासाठी राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला बागांची नोदणी तपासणी किड व रोगमुक्त हमी, अंगमार्फ प्रमाणीकरण, फायटोसॅनिटरी प्रमाणीकरण या सर्व बाबीचे ट्रेसबीलीटीनेट  प्रणालीदार प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. नाशिक विभागात सन २०२३-२४ मध्ये द्राक्षाची ग्रेपनेट प्रणालीवर २८६२४. आंब्याची मँगोनेट प्रणालीवर १३८. भाजीपाल्यासाठी व्हेजनेट प्रणालीवर १६५. केळीची आदर फ्रुटनेट प्रणालीवर २०१ प्लॉटची नोंदणी झाली हाती. नाशिक विभागात सन २०२३-२४ मध्य हॉर्टीनेट प्रणालीवर एकूण २९१९५ शेतकऱ्यांची शेत नोंदणी झालो होतो. राज्यामध्ये नाशिक विभाग निर्यातक्षम शेत नोदणीत प्रथम स्थानी आह.

            सन २०२४-२५ वर्षामध्ये फळ व भाजीपाला निर्यातीस चालना देण्यासाठी कृषि विभागामार्फत खास उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर कृषि माल नियांत मागदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच फळे व भाजीपाला ऑनलाईन नोंदणीसाठी फार्म रजिस्ट्रेशनची माबाईल अॅपचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. निर्यातीबरोबरच स्थानीक बाजारपेठेत ग्राहकांना किड व रोगमुक्त फळे व भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक विभागाला या वर्षी एकूण ४६९९० जागांची नोंदणीचे लक्षांक देण्यात आल आह

            सन २०२४.२८ मध्ये द्राक्ष पिकाची शेत नोंदणी  १ सप्टेंबर  व आंबा पिकाची १ डिसेंबर रोजी सुरु होणार असुन  इतर पिकाची नोंदणी वर्षभर सुरु असते. सन २०२४-२५ मध्ये निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची ट्रेसेबिलीटी नेटव्दारे  नोंदणी करण्याकरीता  नाशिक जिल्हा ४५०९०, धुळे जिल्हा ३५०. नंद‌वार जिल्हा ३५० व जळगाव जिल्हा १२०० असा एकूण ४६९९० लक्षांक  जिल्ह्याना वितरीत करण्यात आलेला आहे. द्राक्ष बागांची नोंदणी करण्यास ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत, आंबा बागांची नोदणी करण्यास ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच इतर फळे व भाजीपाला पिकांची नोंदणी वर्षभर सुरु आहे.

            गतवर्षीच्या तुलनेत सध्य स्थितीत शेत नोंदणी अत्यंत अल्प झाली असून शेत नोंदणी करण्यासाठी व निर्धारित लक्षांक वेळेत पूर्ण  करण्यासाठी जास्तीत जास्त शेतक-यांनी निर्यातक्षम पिकांची शेत नोंदणी संबंधित प्रणालीवर करावी. अधिक माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालु‌का कृषि अधिकारी कायालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक मोहन वाघ यांचे मार्फत करण्यात येत आहे.

00000000

क्रीडा प्रबोधिनीतील प्रवेशासाठी आवाहन

 जळगाव, दि. २८  (जिमाका वृत्तसेवा) :-  शिव छत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधणी मध्ये सन २०२४-२५ करिता सराव व कौशल्य चाचणी निवासी व अनिवासी खेळाडू करिता नवीन प्रवेश देणे. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू देण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूची निवड करून त्यांना  संतुलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवणे सुसंघटीत करण्यासाठी क्रीडा युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे शिव छत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगी बालेवाडी पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधनी कार्यरत आहे. सदर प्रबोधनी प्रवेशाकरिता ५०% सरळसेवा व ५०% कौशल्य चाचणीच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहे. त्या करिता खालील नियम व अटी शर्ती राहनार आहे.

१) राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपुर, औरंगाबाद, गडचिरोली अशा ९ ठीकाणी क्रीडा प्रबोधनी  निवड प्रक्रीया देणार आहे.

२) खेळ प्रकार :- ज्युदो, जिम्नॅस्टीक, हॉकी, शुटीग, फुटबॉल, जलतरण, अंथलेस्टीक, कुस्ती, बॅडमिंटन, अर्चरी, हॅन्डबॉल, वेटलिफ्टरों अशा एकूण १७ क्रीडा प्रकारात प्रशिक्षण दिले जाईल.

३) प्रवेश प्रक्रीया सरळ प्रवेश व कौशल्या चाचणी करिता अटी प्रवेश देण्यात येईल.

१) सरळ प्रेवश :- क्रीडा प्रबोधनीतील असलेल्या संबधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनीधीत्व केलेले खेळाडू ज्याचे वय हे १९ वर्ष आतील आहे अशा खेळाडून संबधित खेळाच्या चाचणीत समिती समक्ष देऊन प्रा देण्यात येईल.

२) खेळ निहाय कौशल्या चाचणी:- क्रीडा प्रबोधिनीत असलेल्या खेळ प्रकारात राज्यस्तरावर सहभागी खेळाडू ज्याचे वय १९ वर्ष आहे.अशा खेळाडून संबधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्या चाचणीचे आयोजन करुन गुणनुक्रमे प्रवेश निश्चित केला जाईल. ३) वैदयकीय चाचणी :- उपरोक्त चाचणी मधून निवड झालेल्या खेळाडूस वैद्यकीय पथकाव्दारे चाचणी घेण्यात येईल व त्यानंतर निवड होईल. 

  सदर अटी शर्थीनुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव या ठिकाणी जिल्हास्तरवर चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळांडूनी त्यांची नोंदणी करण्या करीता ५ जुलै २०२४ पर्यंत संपर्क साधावा. त्यानंतर विभागीय क्रीडा प्रबोधिनी चाचण्याचे आयोजन हे  ८ ते ९ जुलै या दरम्यान विभागीय क्रीडा संकुल मीनाताई ठाकरे संकुल या ठिकाणी आपली प्रवेशिका दोन दिवस आगोदर सादर करावी त्यानंतर निवड चाचणीतून पात्र ठरलेल्या खेळाडूची राजयस्तर निवड चाचणी / कौशल्य विकास चाचणी ही संबधित खेळ प्रबोधणीत किंवा पुणे या ठिकाणी  १५ ते१६ जुलै दरम्यान घेण्यात येईल. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे. सदर बाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव येथील क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात यांचेशी संपर्क साधावा. (टिप जन्माचा दाखला आणि क्रीडा प्रमाणपत्रे आवश्यक आहे)

00000000

Thursday, 27 June 2024

राज्यातील अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलमध्ये राईट टू गिव्ह निवडण्याचे आवाहन

          जळगाव, दि. २७  (जिमाका वृत्तसेवा) :-  जळगाव जिल्हयातील सर्व प्राचार्य/मुख्याध्यापक व जळगाव जिल्हयात मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणारे सर्व अनूसूचित जमातीच्या प्रवर्गातील विद्याथ्यांना याव्दारे कळविण्यात येते की, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आदिवासी  विकास विभागाच्या विविध शिष्यवृत्तीचा लाभ देणेसाठी महाराष्ट्र शासनामार्फत सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टल सुरु करण्यात आलेले असून महाडीबीटी पोर्टलमध्ये राइट टू गिव्ह अप पर्याय निवडलेल्या  अर्जदारांना  या पर्यायाबाबत पुन्हा निवड करू देण्याची तरतूद, संस्थेच्या 'प्रिन्सिपल लॉगिनमध्ये उपलब्ध आहे. संबंधित  अर्जदारांनी राइट टू गिव्ह अप पर्यायांबाबत पुन्हा निवड करण्यासाठी संबंधित संस्थेशी संपर्क साधावा राइट टू गिव्ह अप पर्याय निवडलेल्या अर्जासंदर्भात पुन्हा निवड करू देण्याची तरतूद ३० जून, २०२४ पर्यंत संस्थेच्या principal   लॉगिनमध्ये  उपलब्ध  असेल याची सर्वांनी नोंद  घ्यावी, असे  आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल अरुण पवार यानी आहे.

                                                                              00000000

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व आयोजन

          जळगाव, दि. २७  (जिमाका वृत्तसेवा) :-  राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमीत्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव या कार्यालयातर्फे २६ जून २०२४ ते ०२ जुलै २०२४ या कालावधीत राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व आयोजित  करण्यात आला आहे.

            राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वात वर्ग १२ विज्ञान शाखेतील २०२४ – २५ मधील सर्व प्रवेशीत  मागासवर्गीय विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

            या मोहिमेदरम्यान विज्ञान शाखेतील प्रवेशीत सर्व मागासवर्गीय अनु, जाती. विदयार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तालुका व महाविदयालय निहाय संख्यात्मक माहिती समान संधी केंद्रांच्या माध्यमातून महाविदयालय तसेच जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार आहेत,

            राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वात सीईटी देणारे विदयार्थी, डिप्लोमाच्या  तृतीय वर्षाती  प्रवेशित विदयार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज देखील भरण्यात येऊन अर्ज भरतांना विदयार्थ्यांना येणा-या अडचणीच्या पार्श्वभूमीवर  विदयार्थ्यांसाठी  संबंधीत महाविदयालयातील समानसंधी केंद्रामार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे.

            समान संधी केंद्राच्या माध्यमातून सर्व मागासवर्गीय विदयाध्यांचे अर्ज जमा करण्यात येणार असून प्राप्त अर्जावर  तात्काळ कार्यवाही करुन वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जात पडताळणी समितीच्या वतीने करण्यात आले आहे

            राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व निमतीत्त ०१ ते २ जुलै, २०२४  या कालावधी त्रुटी पुर्तता मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून सदर मोहिमेत मागासवर्गीय विदयाथ्यांचे अर्जांची त्रुटी पुर्तता करुन सदर अर्ज निकाली काढण्यात येणार आहे.

जिल्हयातील विज्ञान शाखेतील प्रवेशीत विदयार्थी, सीईटी परिक्षा देणा-या  विदयार्थ्यांनी  आपआपल्या  महाविदयालयात परिपूर्ण अर्ज सादर करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे व या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन  संशोधन अधिक तथा सदस्यसचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

००००००००

साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जळगांव मार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणा-या पुढील 12 पोटजातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य आनुदान योजना व बिजभांडवल योजना

          जळगाव, दि. २७  (जिमाका वृत्तसेवा) :-  दारिद्र रेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग समाजातील लोकांचे जिवनमान उंचविणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. या महामंडळास चालु आर्थिक वर्षा साठी सन 2024-25 या अर्थिक वर्षासाठी शासनाने जळगांव जिल्हया करीता खालील प्रमाणे उद्दिष्ट दिलेले आहे.

          या अर्थिक वर्षासाठी 50 लाभार्थीना अनुदान योजनेचे उद्दिष्ट व 25 लाभार्थीना बीजभांडवल योजने अंतर्गत उदिष्टा नुसार कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. असे एकूण 75 लाभार्थीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.

          या महामंडळामार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणा-या पुढील 12 पोटजातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य करण्यात येते (1) मांग (2) मातंग (3) मिनी मादींग (4) मादींग  (5) दानखणी मांग (6) मांग महाशी (7) मदारी (8) राधेमांग (9) मांग गारुडी (10) मांग गारोडी (11) मादगी (12) मादिगा.,

महामंडळा मार्फत राबविण्यात येणा-या योजनांमधून आर्थिक लाभ मिळण्यास आवश्यक बाबी :

1) अर्जदार या जिल्हयाचा रहीवासी असावा, 2) अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापेक्षा जास्त नसावे, 3)अर्जदार हा मातंग समाजातील 12 पोट जातीतील असावा, 4)अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव असावा, 5) केंद्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीन/शहरी भागातील अर्जदाराचे वार्षीक उत्पन्न रु. 3,00,000/- पेक्षा कमी असावे 6)राज्य शासनाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीन / शहरी भागातील अर्जदाराचे वार्षीक उत्पन्न रु. 1,00,000/- पेक्षा कमी असावे, 7) अर्जदाराने या महामंडळाकडून यापूर्वी व इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून लाभ घेतलेला नसावा, 8)कुटूंबातील पती वा पत्नी या दोघा पैकी एकालाच महामंडळाच्या योजनेचा लाभ घेता येईल. 9) महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहातील.

अर्जाचा नमुना व सोबत जोडावयाची कागदपत्रे:

1)अर्जाचा नमुना / फॉर्म कार्यालयात मोफत / विनामुल्य उपलब्ध आहे.  2) अर्जदाराचा जातीचा दाखला (सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा.), 3)अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा.) 4)नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या दोन प्रती जोडाव्यात               5) अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, 6) रेशनकार्डाच्या झेरॉक्सप्रती / आधार कार्ड झेरॉक्स प्रती / मोबाईल नंबर,       7) ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेचा उपलब्धतेबाबतचा पुरावा, 8)ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा. 9) वाहन व्यवसाया करीता ड्रायव्हींग लायसन्स व आर.टी.ओ. कडली प्रवाशी वाहतुक  परवाना इत्यादी  10) वाहन व्यवसाया बाबत - वाहनाच्या बुकींगबद्यल / किंमती बाबत अधिकृत विक्रेता/ कंपनी कडील दरपत्रक 11)व्यवसायसंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच आनुभवाचा दाखला 12) व्यवसायासंबधी प्रकल्प अहवाल / खरेदी करावयाच्या मालाचे कोटेशन. 13)प्रतिज्ञा पत्र (स्टॅम्प पेपर वर), 14) विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपुर्ण कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात द्यावयाचा आहे.

कर्जमंजुरीची प्रक्रीया खालील प्रमाणे आहे.

1). जिल्हा कार्यालयात अनुदान /बिजभांडवल योजनेखाली अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व्यवस्थापक यांनी अर्जासोबत जोडलेल्या संपुर्ण कागदपत्रांची छाननी करुन व आवश्यक त्या प्रकरणांत प्रत्यक्ष स्थळ पहाणी करुन व लाभार्थी निवड समितीची मंजुरी घेऊन प्रस्ताव संपुर्ण अहवालासह स्थानिक सेवाक्षेत्रात येणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेस मंजूरीसाठी शिफारस करतात.     2) राष्ट्रीयकृत बँकेने कर्जप्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर सदर मंजुरी कर्जप्रस्ताव मा. प्रादेशिक कार्यालयाकडे संपूर्ण कागदपत्रासह सादर करण्यात येतो.3) मा. प्रादेशिक कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर कर्जप्रकरणांची नोंद घेऊन अर्जासोबत पाठविण्यात आलेल्य कागदपत्रांची शाहानिशा करण्यात येते व कर्जप्रकरणांची  मुख्यकार्यालयाकडे शिफारस करण्यात येते.

4) मुख्यालयात संबंधित शाखेत प्रादेशिक कार्यालयाकडून व्यवसायनिहाय आलेल्या कर्ज प्रकरणांची  नोंद घेतली जाते व कर्ज प्रकरणांची छाननी करुन निधी उपलब्धतेनुसार ज्येष्ठेतेनुसार निधी वितरणास मंजुरी प्रदान केली जाते. 

 महामंडळा मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना -  महामंडळाच्या अनुदान / बीजभांडवल योजना राबविण्यात येत असतांना कार्यालयात लाभार्थीकडून प्राप्त झालेल्या विविध योजनांची सर्व कर्जप्रकरणे गठीत केलेल्या लाभार्थी निवड समिती समोर ठेवण्यात येतात.  सदर लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष मा. उपजिल्हाधिकारी असतात. समितीने मंजुर केलेले प्रस्ताव कर्ज मंजुरीसाठी महामंडळ मार्फत राष्ट्रीयकृत बँकेकडे शिफारस केली जाते.

 अनुदान योजना :- प्रकल्प मर्यादा रु.50,00/- पर्यंत गुंतवणूक असलेल्य कर्जप्रकरणांत महामंडळाकडून अनुदान देण्यात येते. प्रकल्पखर्चाच्य 50% किंवा रु. 10.000/- या पैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येते.

 बॅककर्ज :- अनुदान वगळुन बाकीची सर्व रक्कम बँकेचे कर्ज असते या कर्जावर बॅकेच्या दराप्रमाणे व्याज अकारणी होते.

   बीजभांडवल योजना :- प्रकल्प मर्यादा –रु. 50,001 ते 7,00,000 पर्यंत बँककर्ज:- 1) - रु.50,001 ते 7,00,000 पर्यंतच्या मंजुर कर्जप्रकरणांमध्ये रु.10,000 अनुदान वगळता उर्वरीत कर्ज राशीमध्ये पुढील प्रमाणे कर्जची विभागणी असेल. 2) 5% अर्जदाराचा सहभाग     3) 45% महामंडळाचे कर्ज (रु.10,000 अनुदानासह) 4) 50% बँकेचे कर्ज.

परतफेड - बँक कर्जाची परतफेड बँकेच्या व्याजासह बँकेकडे करावयाची असून महामंडळाचे कर्ज द.सा.द.शे. 4% व्याजासह महामंडळाकडे परत फेड करावयाचे आहे. अशा प्रमाणे महामंडळाच्या योजना राबविण्यात येत आहेत. तरी संबधीत होतकरु समाजातील महीला / पुरुष याचा फायदा घ्यावा, असे जिल्हा व्यवस्थापक  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ  साठे विकास महामंडळ (मर्या) ताराचंद कसबे, यानी  एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.                                                                                  000000000

Wednesday, 26 June 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी पाणी वापर संस्था, व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा व्दैवार्षिक (बारावे वर्ष) पाणी वापर संस्थांना आवाहन

         जळगाव, दि. २६  (जिमाका वृत्तसेवा) :-  महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी बापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा व्दैवार्षिक सन २०२१-२३ करीता (बारा वर्ष अभियान राबविणेबाबतचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. तरी सर्व कार्यान्वित पाणी वापर संस्था यांनी या पुरस्कार स्पर्धत सक्रीय महभाग घ्यावा,

            सदर स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येणार असून या स्पर्धेसाठी १. लघु पाटबंधारे प्रकल्प, मध्यम पाटबंधारे प्रकल्प,  मोठे प्रकल्प, कोल्हापूर पदधतीचा बंधारा व  साठवण तलाव यावरील कार्यान्वित असलेल्या पाणी वापर संस्थाकडून नामांकने मागविण्यात येत आहेत या स्पर्धेसाठी इच्छुक पाणी वापर संस्थानी सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित कार्यकारी अभियंता यांचेकडे १० जूलै, २०२४ च्या आत नामांकन (प्रस्ताव) दाखल करावीत.

            सदर योजनेअंतर्गत मोठे पाटबंधारे प्रकल्प, मध्यम पाटबंधारे प्रकल्प, लघु पाटबंधारे प्रकल्प, कोल्हापुर पदधतीचा बंधार व साठवण तलाव या प्रत्येक गटातील प्रकल्पावरील प्रथम,  व्दीतीय, तृतीय  क्रमांकाच्या पाणी वापर संस्थाची निवड करण्यात येईल असे एकूण १५ पुरस्कार  राज्य स्तरावर देण्यात येतील  सदरच्या प्रत्येक गटामध्ये पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक  रु पाच लाख   व्दीतीय क्रमांक रु तीन लाख व तुतीय क्रमांक-रु एक लाख या प्रमाणे राहील.

            तसेच सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त पाणी वापर संस्था यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मा, कार्यकारी संचालक, तापी पाटबंधार विकास महामंडळ, जळगांव अध्यक्ष (खान्देश प्रदेश) यांनी केले आहे.

            सदर नामांकन (प्रस्तावासाठीचे) विहीत नमुन्यातील प्रपत्र सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित कार्यकारी अभियंता/उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत, असे  आवाहन कार्यकारी अभियंता अ.गि.कुलकर्णी जळगांव पाटबंधारे विभाग, जळगांव तथा सदस्य सचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा खान्देश प्रदेश स्तरीय समिती यांनी केले आहे.

000000000

जुलै महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

         जळगाव, दि. २६  (जिमाका वृत्तसेवा) :-  जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

        नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024   चा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार 31 मे, 2024 ते 05 जुलै, 2024 पासून  ज्या क्षेत्रांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे. अशा ठिकाणी आचारसंहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येवू नये असे निर्देश आहेत.

             त्यामुळे जुलै महिन्यात पहिल्या सोमवारी (01 जुलै, 2024)  रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

मतदान यादीत नाव आहे का खात्री करा ; प्रारूप यादी 25 जुलै रोजी प्रसिद्ध होणार

 जळगाव, दि. २६  (जिमाका वृत्तसेवा) :-  आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 विचारात घेऊन 1 जुलै, 2024 या अर्हता दिनांकावर (Qualifying Date ) आधारित मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत 25 जून,2024 ते 24 जुलै, 2024 पर्यंत पुर्नरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केला आहे. तसेच पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 25 जुलै, 2024 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करावयाची असून 20 ऑगसट, 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करावयाची आहे.

  पुनरिक्षण उपक्रम – मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडून घरोघरी पडताळणी , मतदान केंद्रांचे तर्कशुध्दीकरण / पुनर्रचना, मतदार यादी  EPICS मधील तफावत दूर करणे, अस्पष्ट, निकृष्ट दर्जाची छायाचित्रे बदलून चांगल्या प्रतीची छायाचित्रे सुनिश्चित करुन प्रतिमा गुणवत्तेत सुधारणा करणे आणि रोलमध्ये विनिर्देशन आणि गैर – मानवी प्रतिमा बदलणे, विभाग / भागांची पुनर्रचना करणे आणि मतदान केंद्राच्या विभाग / भाग सीमांच्या प्रस्तावित पुनर्रचनेचे अंतिम रुप देणे आणि मतदान केंद्राच्या यादीला मंजुरी मिळवणे, कंट्रोल टेबल अद्ययावत करणे, नमुना 1 ते 8 तयार करणे, 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत एकत्रितकृत प्रारुप यादी तयार करणे – कालावधी – 25 जून 2024 (मंगळवार) ते 24 जुलै, 2024 (बुधवार) 

पुनरिक्षण उपक्रम  -  

 एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करणे – 25 जुलै, 2024 (गुरुवार)

दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी - 25 जुलै, 2024 (गुरुवार ) ते 9 ऑगस्ट, 2024 (शुक्रवार)

विशेष मोहिमांचा कालावधी – दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी निश्चित केलेले शनिवार आणि रविवार 

दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डेटाबेसचे अद्यावतीकरणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे – 19 ऑगस्ट,2024 (सोमवार) पर्यंत 

अंतिम मतदार यादी प्रसिध्दी करणे – 20 ऑगस्ट, 2024 (मंगळवार) 

  असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अतुर्लीकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००००

Tuesday, 25 June 2024

शासकीय भरडधान्य (ज्वारी) खरेदी केंद्रांचे आज उद्घाटन

         जळगांव,दि. 25 ( जिमाका ) -जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित जळगाव या अभिकर्ता संस्थेच्या वतीने २६ जून, २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता चिंचोली शिवारातील गोदामात उपाध्यक्ष रोहित दिलीपराव निकम दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबई यांचे हस्ते खरेदी केंद्राचे उद्घाटन आयोजित केलेले आहे. यावेळी जळगाव तालुक्याच्या तहसिलदार, शितल राजपुत व गोदामपाल श्रीकांत माटे यांचे उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. तरी यावेळी जळगाव तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवानी ऑनलाईन ज्वारीची नोंदणी केलेली आहे. त्यांना नोंदणीक्रमाने एस. एम. एस देवून खरेदीसाठी बोलविण्यात आलेले आहे. तरी शासकीय भरडधान्य ( ज्वारी) नोंदणी झालेल्या शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाने केले आहे.

000000000

राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ फर्दापुर ते जळगाव ( भाग-३) चौपदरीकरणाचे काम सुरु, पर्यायी रस्ता उपलब्ध

             जळगाव, दि. २५ (जिमाका वृत्तसेवा) : जामनेर तालुक्यातील वाकोद या गावातील वाघुर नदीवरील छात्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील  क्र. ७५३   एफ  डाव्या बाजुस असलेल्या जुन्या मोठया  पुलाची परिस्थिती अत्यंत कमकुवत झालेला  असुन सदर पुल हा पुर्णपणे जिर्ण झालेला आहे.

            त्यामुळे सदर पुल वाहतुकीकरिता धोकादायक झालेला असुन या ठिकाणी मोठा अपघात होऊन जीवीत हाणी होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे व जळगाव ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गाची वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.

            पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या पत्रान्वये काढण्यात आलेल्य अधिसुचनेनुसार जामनेर तालुक्यातील मौजे वाकोद या गावातील वाघुर नदीवरील छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या मार्गावरील डाव्या बाजुने असलेला जुना मोठा पुल हा रविवार दि. १६ जून, २०२४ पासून पुलाची दुरुस्ती होई पर्यंत बंद करण्यात येत आहे.

पर्यायी बदल

            पर्याय क्र. ०१- अ) -       जड वाहतुक (दुहेरी वाहतुक मार्ग)  – नेरी - एरंडोल- चाळीसगाव –नांदगाव- शीरुर बंगला- छत्रपती संभाजीनगर , ब)  जळगाव (अजिंठा चौफुली) – मुक्ताईनगर- मलकापुर- बुलढाणा-जालना- छत्रपती संभाजीनगर ,

        हलकी वाहतुक – पर्यायी मार्ग (एकेरी वाहतुक मार्ग) अ)- जळगाव ते छत्रपती संभाजीनगर , जळगाव -पहुर- वाकोद- फर्दापुर - छत्रपती संभाजीनगर ,

            ब) छत्रपती संभाजीनगर  ते जळगाव - छत्रपती संभाजीनगर  - फर्दापुर - फर्दापुर तांडा (सोयगाव रोड) वरखेडी तांडा फाटा- वाकोद – पहुर  असा बदल करण्यात मंजूरी दिली आहे, असे कार्यकरी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग जालना यांनी कळविले आहे.

०००००


 

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे २७ जुन, रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह मेळाव्याचे आयोजन

        जळगाव, दि. २५  (जिमाका वृत्तसेवा) :-  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जळगाव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) यांच्या संयुक्त विद्यमाने       २७ जुन, २०२४ रोजी सकाळी १०:३० दुपारी २: ३० वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी नोकरी इच्छुक उमदेवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारण १० वी, १२ वी, सर्व पदवीधारक/आय टी आय सब ट्रेड धारक/सर्व डिप्लोमा धारक / असे एकूण १५० रिक्तपदे भरण्याविषयी कंपन्यांनी कळविलेले आहे- सदरील प्लेसमेंट ड्राईव्ह मेळाव्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) या ठिकाणी करण्यांत आलेले आहे.

            तरी रोजगार मेळाव्यात नमूद पात्रता धारक केलेल्या ईच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी केलेल्या उमेदवारांनी मेळाव्यांत सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अप्लॉय करण्यासाठी आपल्या युजर आयडी व पासवर्ड ने लॉग ईन करुन अप्लॉय करावा. तसेच, ज्या उमेदवारांनी नांव नोंदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रासह रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. व विभागाच्या www.mahaswayam.gov.in /www.ns.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी देखिल करुन घ्यावी,

            याबाबत काही तांत्रिक अडचणी आल्यास अथवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) या कालावधीत सकाळी ०९.४५ ते सांयकाळी ०६.१५ वाजेपर्यंत स्थानिक जळगाव कार्यालयाशी ०२५७-२९५९७९० वर कार्यालयीन वेळेत दूरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त रवीकुमार एम पंतम,  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.

            मेळाव्याचे ठिकाण औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मेस हॉल नॅशनल हायवे क्रमांक ०६ ता. जि. जळगाव. (चंद्रकांत दुसाने) क. मार्गदर्शन अधिकारी कौशल्य विकास रोजागर व उद्योजकता जळगाव यांनी केले आहे.

0000000000

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024 मतदान साहित्याचे वाटप : अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

 






            जळगांव,दि. 25 ( जिमाका ) -नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी 26 जून रोजी मतदान होत असून याकरीता जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात 1, यावल तालुक्यात 1, रावेर तालुक्यात 1, मुक्ताईनगर तालुक्यात 1, बोदवड तालुक्यात 1, भुसावळ तालुक्यात 2, जळगांव तालुक्यात 3, धरणगांव तालुक्यात 1, अमळनेर तालुक्यात 2, पारोळा तालुक्यात 1, एरंडोल तालुक्यात 1, भडगांव तालुक्यात 1, चाळीसगांव तालुक्यात 2, पाचोरा तालुक्यात 1, जामनेर तालुक्यात 1 असे एकूण 20 मतदान केद्र आहे. जिल्ह्यात 13 हजार 122 शिक्षक मतदार असून त्यात 9 हजार 673 पुरुष तर   3 हजार 449 स्त्री मतदार आहे. मतदानासाठी 120 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक केंद्रासाठी  केंद्राध्यक्ष, कर्मचारी, सुक्ष्म निरीक्षक, एक शिपाई, तसेच बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले असून आज कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचले आहे. 

            या निवडणूकीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री.आयुष प्रसाद यांनी केले आहे यांनी केले आहे.

00000000


Monday, 24 June 2024

औद्योगिक प्रशिक्षण संस्था एरंडोल येथे ३० जून पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावे

           जळगाव, दि. २४  (जिमाका वृत्तसेवा) :-  सर्व नागरीकांना व युवकांना कळविण्यात येते की, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय आयटिआय एरंडोल जिल्हा जळगाव येथे केंद्रिय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया २०२४ दिनांक ३ जून, २०२४ पासुन सुरु करण्यात आलेली असून इच्छुक उमेदवारांनी  https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरवेत. सद अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३० जून, २०२४ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

            शासकीय आयटिआय एरंडोल येथे प्रवेश साठी कोपा, इलेक्ट्रिशियन, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मशिनिष्ट हे व्यवसाय उपलब्ध आहे. अधिक माहिती साठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था एरंडोल येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000000000

दुचाकी वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक मालिका

          जळगाव दि. 24 ( जिमाका )उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी  एमएच 19/ईएल-0001 ते 9999 पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येत आहे.       

            ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी दि. 26 व 28 या दोन दिवसांपर्यंत दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज  करावेत.  या अर्जासोबत शासकीय शुल्काचा डीडी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे द्यावा.  शुल्क भरल्यावर 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी न केल्यास भरलेले शुल्क हस्तांतरीत होणार नाही.  नवीन मालिका दि.1 जुलै, 2024 पासून नियमित सुरु करण्यात येईल. अधिक माहितीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

०००००

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024; मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

         नाशिक,दि. 24 जून,2024 (विमाका वृत्तसेवा) - नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान 26 जून,2024  रोजी होणार आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

हे पुरावे असणार ग्राह्य

            1)         आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) भारतीय पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित शिक्षक मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे  मुळ प्रमाणपत्र 10) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

0000000000

शिष्यवृतीचे अर्ज रद्दबातल झाले असतील अशा विद्यार्थ्यांनी परत 30 जून, पर्यंत अर्ज सादर करावे

         जळगाव दि. 24 ( जिमाका ) – राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांनी अनावधानाने अथवा नजरचुकीने Right to Giveup  हा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृतीचे अर्ज रद्दबातल झाले असतील केवळ अशा विद्यार्थ्यांना राज्यशासनातर्फे 30 जून, 2024 पर्यंत अंतिम संधी देण्यात आलेली आहे.

            याबाबत विद्यार्थ्याने आपले महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य  login  मधून आपला अर्ज  Revert Back  करुन घेणे आवश्यक आहे. Revert Back   झालेला अर्ज विहित वेळेत विद्यार्थ्याच्या  Login  मधून ऑनलाईन फेर सादर करणे आवयक राहील. विहित वेळेत विद्यार्थ्याने अर्ज फेर सादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्याची राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन सहाय्य्क आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी केले आहे.

०००००००

 

विविध पिकांसाठी जिल्ह्यात पीक स्पर्धा ; शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

 जळगाव दि. 24 ( जिमाका )  - राज्यातील पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडुन विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येत अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकते बाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल यामुळे कृषि उत्पादकतामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्यातील एकुण उत्पादनास मोलाची भर पडेल हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना आदिवासी गट व सर्वसाधारण गट असे दोन गटानमध्ये राबविण्यात येत आहे.

    पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रूपये सर्वसाधारण गटासाठी रक्कम रूपये ३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रू १५० राहिल

  पिक स्पर्धा मध्ये खरोप हंगामात मुग उडीद या दोन पिकांसाठी सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत दिनांक ३१ जुलै २०२४ असुन ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तुर सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या पिकासाठी अंतिम मुदत दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ आहे. 

  बक्षिसाचे स्वरूप व वितरण

 स्पर्धा पातळी - तालुका पातळी - सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रूपये तालुका पातळी  पहिले - ५,००० दुसरे -३,००० तिसरे - २,०००, जिल्हा पातळी - पहिले - १०,००० दुसरे - ७,००० तिसरे - ५,००० राज्य पातळी -पहिले - ५०,००० दुसरे - ४०,००० तिसरे - ३०,०००

  तरी जिल्हयातील जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्हावे भाग घेण्यासाठी व अधिकच्या माहिती साठी संबंधित गावाचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी अथवा तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क करावा,असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  कुब्रान तडवी यांनी केले आहे.

                                                                     000000000

योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यभरातील ITI मध्ये १ लाख विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग

 







            मुंबई, २१ जून : २१  - जून रोजी जगभरात आंतराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो, त्याचेच औचित्य साधून आज महाराष्ट्रातील ४१९ औद्योगिक शासकीय संस्थांमध्ये योग दिनानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जवळपास १ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शासकीय औद्योगिक संस्थांव्यतिरिक्त राज्यातील शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई, मुख्य कार्यालय, ६, सहसंचालक, प्रादेशिक कार्यालय, ३६ जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी / कार्यालय, ४३ मूलभूत प्रशिक्षण संस्था तथा अनुषंगिक सूचना केंद्र अश्या राज्यातील सर्व कार्यालये व संस्थांमध्ये योगदिवस साजरा करण्यात आला.

आरोग्याच्यादृष्टीने योग साधनेचे अनन्यसाधारण महत्व असून, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग साधनेची गोडी वृद्धिंगत व्हायला हवी. या उद्देशानेच कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी योग दिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने प्रत्येक ITI  मध्ये योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमात प्रशिक्षणासाठी स्थानिक प्रशिक्षकांना पाचारण केले गेले किंवा आयुष मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध ऑडिओ व्हिज्युअलची मदत घेण्यात आली. योग साधनेचे महत्व विद्यार्थ्यांना नक्कीच या उपक्रमामुळे पटेल आणि त्यातून एक आरोग्यदायी सवय त्यांना लागेल असा विश्वास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला. 

"आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात योग साधेनेला अनन्य साधाराण महत्व प्राप्त करून दिले आहे. त्यांच्यामुळे जगभर भारतीय संस्कृतीचा जागर झाला. आज संपूर्ण जग उत्स्फूर्तपणे योग साधना आत्मसात करत असताना आपण देखील आपली संस्कृती विसरता कामा नये. आपल्या तरुण पिढीने हा वारसा पुढे न्यायलाच हवा. या वेगवान जीवनात सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे कौशल्य त्यांनी अंगिकारायला पाहिजे आणि त्यासाठी हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरेल" अश्या शुभेच्छा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कार्यक्रमासाठी दिल्या होत्या. 

            महाराष्ट्रात नगर, संभाजीनगर, नाशिक, धुळे, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर आणि मुंबईसह सदर कार्यक्रम ३६ जिल्ह्यात साजरा करण्यात आला. दादर आणि ठाणे येथे महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या ITI मधील मुलींचा सहभाग यावेळी उल्लेखनीय ठरला. तसेच आयटीआय रत्नागिरी येथे योग शिक्षक श्री विश्वनाथ वासुदेव बापट वय वर्ष 73 हे हजर होते. येथे योग दिनाचे औचित्य साधून, ओपन जिमचे उद्घाटन केले गेले व सर्व प्रशिक्षणार्थींसाठी व्यायामाचे दालन सुरु करण्यात आले. यासारख्या अनेक उल्लेखनीय घटनांसह आजचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

००००००

Friday, 21 June 2024

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे जागतिक योग दिवस' उत्साहात साजरा

 




        जळगाव दि. 21 ( जिमाका ) - आज दहावा आंतरराष्ट्रीय योगा दिन जळगावातील बँक ऑफ महाराष्ट्र ने ऑफिसर्स क्लब जळगाव येथे  जिल्हा प्रशासन यांच्या सहकार्याने  जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले.

            योग दिना साठी जळगाव जिल्हयाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (भा.प्र. से.), बँक ऑफ महाराष्ट्र जळगाव अंचल प्रबंधक श्री प्रवीण कुमार सिंह , सहायक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील , ऑफिसर्स क्लब जळगाव चे सर्व सदस्य व बँक ऑफ महाराष्ट्र जळगाव शहरातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

            या योग शिबिरासाठी योग गुरु आचार्य श्री आदित्य जहागीरदार व श्रीमती तनया पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. योग गुरु आचार्य श्री आदित्य जहागीरदार यानी योगा चे महत्व सांगीतले योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योग मन व शरीर, विचार व कृती, संयम व पूर्णता, मनुष्य व निसर्ग यांच्यातील ऐक्याला मूर्त रूप देतो. आरोग्य व स्वत:च्या कल्याणसाठी सर्वांगीण दृष्टिकोन प्राप्त करून देतो.  त्याच बरोबर सर्वांनी योग करुण जागतिक योग दिवस साजरा केला.  ऑफिसर्स क्लब जळगाव ने बँक ऑफ महाराष्ट्र जळगाव अंचल प्रबंधक श्री प्रवीण कुमार सिंह यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करुन आभार व्यक्त केले.

००००००००


Thursday, 20 June 2024

जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न ▪दोन हजारा पेक्षा अधिक खेळाडू, विद्यार्थी यांचा सहभाग






         जळगाव दि. 21 ( जिमाका )  - आज दहावा आंतरराष्ट्रीय योगा दिन जळगाव मधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दोन हजारापेक्षा अधिक खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागाने उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या राष्ट्रीय महासभेत दिनांक 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन " म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने 21 जून रोजी जळगाव जिल्ह्यात आज सकाळी हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला.

          जळगांव जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगांव, नेहरू युवा केंद्र संघटन, जळगांव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ, जळगांव जिल्हा क्रीडा संघटना महासंघ, जळगांव जिल्हा योग संघटना, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान न्यास, जळगांव, यांचे संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे सकाळी ७.०० वाजता जळगांव जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद साहेब यांचे हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.

           यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकीत,प्रशिक्षणार्थी        आय. ए. एस. अधिकारी वेवोतोलु केजो,  शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री विकास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, श्री नरेंद्र, समन्वयक नेहरू युवा केंद्र संघटन जळगांव, श्रीमती सरला पाटील गट शिक्षणाधिकारी,           श्री खलील शेख, गट शिक्षणाधिकारी, श्री विनोद बियाणी, रेड क्रॉस, श्रीमती जयश्री पाटील, श्री समाधान बर्कले, पतंजली योग समिती, जळगांव, श्रीमती डॉ अनिता पाटील, जळगांव जिल्हा हौशी योग असोसिएशन, प्रा डॉ नारायण खडके, शिव छत्रपती पुरस्कारर्थी, श्री किशोर चौधरी, श्री सुमेध तळवेलकर, शिव छ्त्रपती क्रीडा पुरस्कारार्थी आदी मान्यवर उपस्थीत होते.

             जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुरुवातीला सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या, श्री रविंद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सर्व मान्यवरांचे योगा चे पुस्तक देऊन स्वागत केले. त्या नंतर कॉमन योगा प्रोटोकॉल नुसार सर्व उपस्थितांनी योगासने आणि प्राणायाम केले. या कॉमन योगा प्रोटोकॉल चे प्रात्यक्षिक जळगांव जिल्हा हौशी योग असोसिएशन च्या खेळाडूंनी सादर केले. अनुभुती इंग्लिश मेडियम स्कुल द्वारा म्युझिकल योगा विद्यार्थ्यांमार्फत प्रात्यक्षिक क्रीडा शिक्षक श्रीमती स्मिता बुरकुल, श्रीमती श्वेता कोळी यांचे मार्गदर्शनाखाली सादर केले.

            सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. उपस्थितांचे आभार श्रीमती सुजाता गुल्हाणे, क्रीडा अधिकारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्या करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे श्री मिनल थोरात, श्री किशोर चौधरी, श्री भारत देशमुख, श्री विनोद कुलकर्णी , श्री उमेश मराठे, श्री गोविंद सोनवणे, श्री विनोद माने, श्री संजय महिरे, श्री सुरज पवार, श्री अविनाश महाजन यांनी परिश्रम घेतले.

00000000000

अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व नियम व नियमने २०११, कायदयाअंतर्गत स्टिअरींग कमेटीमध्ये अशासकीय सदस्य यांचे नेमणूक करणेबाबत

         जळगाव दि. 20 ( जिमाका ) :-   जिल्हयामध्ये अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या प्रभावी अंमलबजावणी, नियंत्रण आणि  समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१२/प्र.क्र.३५८/औषधे-२, दि. १५डिसेंबर, २०२१ अन्वये जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. सदर जिल्हास्तरीय समितीमधील खालील अशासकीय सदस्य यांची नियुक्ती ही मा. अध्यक्ष महोदय यांनी मा. पालकमंत्री यांच्याशी चर्चा करुण अंतिम करण्याबाबत शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१२/प्र.क्र.३५८/औषधे-२, दि. १५डिसेंबर, २०२१ नुसार करावयाची अशासकीय सदस्यांची पात्रतेचे निकष हे शासन निर्णयाप्रमाणे खालीलप्रमाणे आहेत.

अन्न सुरक्षा व पोषण विषयातील ०२ तज्ञ - अन्न पदार्थ पॅकेज्ड इंडस्ट्रीतील ०१ प्रतिनिधी हा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेला स्वतंत्र अन्न् व्यावसायिक किंवा सीआयआय (CII), एफआयसीसीआय ( FICCI), एएसएसओसीएचएएम (ASSOCHAM), असोसिएशन ऑफ फुड प्रोसेसर्स ऑफ इंडीया ( AFTI), यांचे राज्यस्तरीय/विभागस्तरीय प्रतिनिधी, इंडीयन चेंबर्स ऑफ कॉमर्स, पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स किंवा इतर राष्ट्रीय, विभागीय औदयोगिक संघटना यांनी नामनिर्देशित केलेली व्यक्ती असावी.

अन्न व्यावसायीक यांचे ०२ प्रतिनिधी - हॉटेल, रेस्टॉरंट व केंटरींग व्यावसायिकांचा ०१ प्रतिनिधी हा नॅशनल रेस्टॉरंटस असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI), फेडरेशन ऑफ हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंटस असोसिएशन ऑफ इंडिया (FHRAI), फेडरेशन ऑफ ऑल इंडिया कॅटरर्स (FAIC), ऑल इंडिया हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंटस असोसिएशन (AHAR), इंडियन फेडरेशन ऑफ कुलिनरी असोसिएशन (IFCA), इ. नॅशनल लेवल ऑर्गनायझेशन्स यांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती असाव्या.

ग्राहक संस्थेचे ०२ प्रतिनिधी - ग्राहक संस्थाचे ०२ प्रतिनिधी हे स्वतंत्र व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले कंझ्युमर राईटस अॅक्टीव्हिस्ट किंवा रिजनल/स्टेट चॅप्टर्स ऑफ नॅशनल लेवल कंझ्युमर्स ऑर्गनायझेशन्स् यांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती असाव्या.

            तरी पात्र इच्छुक सदस्यांनी दिनांक 16 जुलै, 2024 पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन जळगाव या कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००००००

 

वन महोत्सव 2024-या कालावधीत मोफत व सवलतीच्या दरात रोपे वाटप करणेबाबत

         जळगाव दि. 20 ( जिमाका ) :-   दिनांक 15 जून ते 30 सप्टेंबर 2024  हा काळ वनमहोत्सवचा काळ म्हणून दरवषी साजरा करण्यात येतो, या कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत असतो. या व्यतिरिक्त केंद्र शासनाकडून अलिकडेच एक पेड माँ के नाम - Plant4 Mother" ही संकल्पना राबविण्याच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत९.

            १५ ऑगस्ट २०२२ मध्ये आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाली असून अमृतकाळ सुरु झालेला आहे महाराष्ट्र राज्याने सुरु केलेली हरित चळवळ अधिक लोकाभिमुख व्हावी, आणि प्रत्येकाचा यात सहभाग मिळावा तसेच येणाऱ्या काळात पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या हेतुने वर्ष २०२४ मध्ये महाराष्ट्र वनविभागामार्फत वनमहोत्सव काळात 'अमृतवृक्ष आपल्या दारी ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे सदर योजनेव्दारे प्रत्येक नागरिकास अमृत वृक्ष लागवडीच्या चळवळीमध्ये सहभाग घेता येऊ शकेल व पर्यावरण संवर्धनामध्ये सहभाग घेता येईल.

            वृक्षारोपन व पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांवर होणेकरिता शाळा / महाविदयालय यांनी रोपांची मागणी केल्यास त्यांना वन महोत्सव कालावधीत मागणीनुसार मोफत रोपांचा पुरवठा उपलब्धतेनुसार करण्यात येईल तसेच सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी यांना वृक्ष लागवडीसाठी लहान रोपे दर प्रति रोप 21/- रुपये तर मोठी रोपे दर 53/- प्रति रोप तसेच बांबू कंद प्रति कंद 08 रुपये व पिशवीतील बांबू प्रति रोपे 13/- या प्रमाणे सामाजिक वनीकरण जळगाव विभागामार्फत रोपे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

            सामाजिक वनीकरण विभागाच्या जळगाव जिल्हयात एकूण 16 रोपवाटीका असुन जळगाव मधील मेहरुन व कुंभारखोरी रोपवाटीका, चाळीसगाव मधील बिलाखेड रोपवाटीका, चोपडा मधील नारोद रोपवाटीका, भुसावळ स्थित मुक्ताईनगर मधील मुसळतांडा व निमखेडी रोपवाटीका, एरंडोल मधील चोरटक्की रोपवाटीका, जामनेर मधील गंगापुरी रोपवाटीका, पाचोरा मधील चिंचपुरा रोपवाटीका, पारोळा मधील मोढाळे रोपवाटीका, रावेर मधील पुनखेडा व लालमाती रोपवाटीका, यावल मधील यावल रोपवाटीका, अमळनेर मधील पळासदरे रोपवाटीका, भडगाव मधील कोठली व वलवाडी रोपवाटीका असुन त्याठिकाणी निम, शिसु, बांबू, आंबा, पेरु, सिताफळ, बकाम, वड, बेल, आवळा, चिंच, विलायती चिंच, गुलमोहर, काशिद, या प्रजातीची जोमदार व सुदृढ रोपे उपलब्ध आहेत. रोपे मागणीसाठी श्री. अनिल गोराणे, (9405058653) व श्री अमोल ढोबळे, (8806803446) यांचेशी संपर्क साधावा,  असे विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग,  संजय पाटील जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000000000

शेतकरी बंधूनी डिएपी (Di-Ammonium phosphate ) खतास पर्यायी खते वापरावीत

 जळगाव दि. 20 ( जिमाका ) :- महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे. राज्यामध्ये सद्या पेरणीला सुरुवात झाली असून डिएपी खताची शेक-यांकडून जास्त मागणी आहे. डिएपी (Di-Ammonium Phosphate) खता मध्ये १८ ट्क्के नत्र तर ४६ टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत.

            डिएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठो पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-१६ ट्क्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामूळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन  गोणी खतांचा वापर डिएपीस चांगला पर्याय आहे.

            एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके-१०:२६:२६, एनपीके-२०:२०:०:१३, एनपीके- १२:३२:१६ व एनपीके-१५:१५:१५ या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुध्दा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो.

            त्याच बरोबर टिएसपी (Tripple Super Phosphate) या खता मध्ये ४६ टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असुन डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टिएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखिल टिएसपी खतास उत्तम पर्याय आहे.

            चालू खरिप हंगामामध्ये शेतक-यांनी केवळ टिएसपी खतावरच अवलंबून न राहता बाजार मध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकरी बांधवाना करण्यात येत आहे.

                                                                       0000000000

Wednesday, 19 June 2024

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु

       जळगाव, दि.१९ (जिमाका वृत्तसेवा) : - राज्यात विभागीय, जिल्हा तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी विकास विभागाव्दारे शासकीय वसतीगृह योजना कार्यन्वित आहे.

             2) विभागीय व जिल्हास्तरावर तालुका व ग्रामीण स्तरावर इयत्ता 8  वी पासून 12 वी पर्यंत  ( प्री मॅट्रीक व कनिठ महाविद्यालयापर्यंत शिक्षण घेणाऱ्या नविन व जुने विद्यार्थ्यांनी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावयाची आहे.

            ३) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत एकूण 17 आदिवासी मुला / मुलींचे शासकीय वसतीगृह कार्यरत आहे. या सर्व वसतीगृहामध्ये ऑनलाईन प्रणालीव्दारे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करीता प्रवेश अर्ज  www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर  स्विकारण्यात येत आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी नविन व जूने महाविद्यालय प्रवेशाच्या आधारावर विविध अभ्यासक्रमासाठी खालील वेळापत्रकानुसार दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज भरावेत.

५) नविन व जुन्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी वरील संकेतस्थळावर दिलेल्या user manual  चे वाचन करून त्या आधारे अचूक अर्ज भरावा 6) विदयार्थ्यांनी सदर संकेत स्थळावर अर्ज भरण्याकरीता प्रथम नोंदणी (registration) करावे. नावनोंदणी नंतर प्राप्त user id व passward चा उपयोग करून अर्ज भरावा. अर्ज भरण्यासाठी नविन विद्यार्थ्यांनी Hostel Addmission मधील  New Addmission हा पर्याय काळजीपूर्वक निवडावा 7) जे विद्यार्थी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात (जूने विद्यार्थी) प्रवेशित होते अशा विद्यार्थ्यानी चालू शैक्षणिक वर्षात देखील अर्ज भरणे आवश्यक आहे. या करीता Hostel Addmission यामध्ये Renew Hostel Addmission  हा पर्याय काळजीपूर्वक निवडून पुढील अर्ज भरावा.

8)जुन्या विद्यार्थ्यानी युझर आयडी व पासवर्ड मिळणेसाठी www.swayam.mahaonline.gov.in या वेबसाईडच्या होम पेजवर  forgot passward चा वापर करावा यामध्ये आवश्यक ती माहिती भरून पासवर्ड रिसेट करून घ्यावा 9) वसतिगृह प्रवेशअर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्याने प्रथम महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे. 10) वसतीगृहासाठी अर्ज करताना ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे (उदा. मागील वर्षी मिळालेले गुण/ गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र क्रमांकासहीत टी. सी. चालू वर्षी प्रवेश घेतलेल्या शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड/ प्रवेश पावती, आधारकार्ड, वडीलांचा (पालकाचा) चालू वर्षांचा उत्पन्नाचा दाखला, राष्ट्रीयकृत बँकेतील आधार संलग्न खात्याचे पासबुक झेरॉक्स, वैद्यकीय ताखला व इतर आवश्यक कागदपत्रे) विद्यार्थ्यांनी सोबत बाळगावीत. 11) याबाबत अधिक माहितीसाठी आपण प्रवेश घेवू इच्छीत शासकीय वसतीगृह भेट दयावी. असे आवाहन प्रकल्कप  अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल  अरुण पवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००००

राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी विशेष कार्यक्रम

         जळगाव दि. 19 ( जिमाका ) :- कापुस सोयाबीन व इतर तेलबिया आधारीत पीक पध्दतीस चालना देवून शेतक-यांच्या उत्पादनात  वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस  चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस  सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४- २५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.

            जळगांव जिल्हयात राज्यपुरस्कृत कापुस उत्पादता वाढ अंतर्गत २७९३० हेक्टर व गळीत धान्य सोयाबीन उत्पादकता वाढ २२७० हेक्टर क्षेत्रावर सदरील कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

            सन २०२४-२५ अंतर्गत राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांच्या उत्पादकता वाढ व मुल्यसाखळी विकास योजनेतर्गत खालील निविष्ठा पुरविण्यात येणार आहे.

१. मेटाल्डिहाईड किटकनाशक घटकाकरीता सोयाबीन लागवड करणा-या शेतक-यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावे

२ सदर योजने अंतर्गत खालील निविष्ठांचा लाभ खालीलप्रमाणे प्रति लाभाची १ हेक्टर च्या मर्यादत देणे प्रस्तावित आहे

* मेटलडीहाइड कोटकनाशक हेक्टरी ५ किलो/हे

* नॅनो यूरिया व नॅनो डिएपी:

अ) सोयाबीन पिकामध्ये हेक्टरी १.२५० लिटर प्रमाणकानुसार (५०० मिली बॉटल ०.४० हेक्टर साठी १ बॉटल, ०.८० हेक्टर साठी २ बॉटल) लाभ देय राहील.

ब) कापूस पिकामध्ये हेक्टरी २.५०० लिटर प्रमाणकानुसार (५०० मिली बॉटल) लाभ देय राहील.

* कापूस साठवणूक बैंग हेक्टरी ८ बैंग देय राहील

* बैटरी ऑपरेटेड फवारणी पंपः प्रति लाभाची ५ याप्रमाणे देय राहील.

            या निविष्ठाचा पुरवठा करण्या करीता लाभाथीची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दिनांक ३० जून, २०२४ पर्यंत https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे. बियाणे, औषधे व खते या टायटल अंतर्गत  शेतकऱ्यांना अर्ज करता येतील, तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी, जवळच्या तालुका कृषि कार्यालयास संपर्क साधावा असे  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

00000000