Thursday, 13 June 2024

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात रिक्त जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया खालील वसतीगृहांमध्ये सुरु आहे

         जळगाव, दि. १३  (जिमाका वृत्तसेवा) :-  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष  सहाय्य विभागाच्या शासकीय वसतीगृहामध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातील एकूण १२ शासकीय वसतीगृहातील ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

            जिल्हयातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसुचितजाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग, दिव्यांग, अनाथ या प्रवर्ग निहाय आरक्षण निश्चित केल्यानुसार इयत्ता ७ वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच वरिष्ठ महाविदयालयातील इतर शैक्षणिक / व्यवसायीक अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश घेता येईल. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात रिक्त जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया खालील वसतीगृहांमध्ये सुरु आहे.

१)      डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, जळगाव, २)मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह जळगाव, ३) मागासवर्गीय तथा आर्थिक दृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह जळगाव, ४)    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह भुसावळ,५)  मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह भुसावळ, ६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, बोदवड, ७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह मुक्ताईनगर, ८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह अमळनेर,  ९) मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, अंमळनेर, १०)  मागासवर्गीय  तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, चाळीसगाव

११)मागासवर्गीय  तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, रावेर,     १२)  मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह .रावेर,

           वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून भोजन, निवास, निर्वाहभत्ता, शैक्षणिक साहित्यासाठ रोख रक्कम, गणवेश / ड्रेसकोड रक्कम, इत्यादी अनुषगिक इतर सोयी – सुविधा शासना मार्फत विनामुल्य पुरविण्यात येतात.

            विद्यार्थ्यांना ज्या वसतीगृहात प्रवेश घ्यायचा असेल त्यानी तेथुनच अर्ज प्राप्त करुन आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत.  विद्यार्थ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले प्रवेश अर्ज विहीत वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह संबंधित वसतीगृहातच सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित वसतीगृहातील गृहपाल जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन  वाय. पी. पाटील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000000

No comments:

Post a Comment