Friday, 29 April 2022

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2021- जाहिर

             जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) -   जळगाव जिल्हयाच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या व्दारे जिल्हा क्रीडा पुरस्कार सन  2021 जाहिर करण्यात आलेला आहे.

          पुरस्काराचा प्रकार -  जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार ( बुध्दिबळ) – श्री. नरेद्र रामदास पाटील – यांचा बुध्दिबळ हा खेळ असुन त्यांनी वर्ल्डयुथ चेस चेस चाम्पीयनशिप, ऑल इंडीया फिडे ब्रीडस, ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धा, इंटरनॅशनल ग्रॅडमास्टर चॅम्पीयनशिप, नॅशनल चॅलेजर्स चेस  चाम्पीयनशिप, वर्ल्ड ज्युनिअर चेस चाम्पीयनशिप,मध्ये प्राविण्य प्राप्त करणारे अनेक खेळाडू घडविलेले आहेत. ते गो.से.हाय. पाचोरा जि. जळगाव येथे क्रीडा शिक्षण म्हणून कार्यरत आहेत.

          (2) जिल्हा गुणवंत खेळाडु पुरस्कार पुरुष ( वेटलिफटींग) – गोविंदा सुनिल महाजन – यांचा वेटलिफटींग हा खेळ असुन त्यांनी ऑल इंडीया वेटलिफटींग स्पर्धा, राष्ट्रीय शालेय 19 वर्षाआतिल वेटलिफटींग, कनिष्ठा राष्टीय वेटलिफटींग चॉम्पीयनशिप, राज्यस्तर चॅम्पीयनशिप र्स्प्धेमध्ये बरेच वेळा प्राविण्य प्राप्त केलेले आहे. हा खेळाडू जळगाव जिल्हयाचा रहिवासी आहे.

          (3) जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार महिला ( आटयापाटया) – सायली किरण बडगुजर – यांचा आटयापाटया हा खेळ असुन त्यांनी सिनिअर राष्ट्रीय आटयापाटया चांम्पीयनशिप स्पर्धेमध्ये सिनिअर राज्यस्तरीय आटयापाटया चॉम्पीयनशिप                                                                                                                                                 स्पर्धेमध्ये बरेच वेळा प्राविण्य प्राप्त केलेले आहे. ही खेळाडू जळगाव जिल्हयाची रहिवासी आहे.

          वरील जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थीना दि. 1 मे, महाराष्ट्र दिन 2022 रोजी पोलीस मुख्यालय जळगाव येथे होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमा प्रसंगी मा. पालकमंत्री महोदयांच्या शुभहस्ते पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

          सदर तीनही पुरस्कारार्थीचे मा. अभिजीत राऊत जिल्हाधिकारी जळगाव तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती जळगाव श्रीमती सुनंदा पाटील  उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, नाशिक तथा तथा सदस्य जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती जळगाव श्री. अजित दादासाहेब घारगे जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी सदस्य जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती जळगाव कु. कांचन चौधरी एकलव्य पुरस्कारार्थी सदस्य जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती जळगाव  श्री. मिलिंद दिक्षित जिल्हा क्रीडा अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती जळगाव श्रीमती सुजाता गुल्हाने क्रीडा अधिकारी जळगाव यांनी व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००


 

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन – 2020 जाहिर

           जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) -  जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे  जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या व्दारे जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2020 जाहिर करण्यात आलेला आहे.

   पुरस्काराचा प्रकार -      (1) जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार वेसबॉल

पुरस्कारर्थीचे नाव – श्री. अजय गोपाळराव देशमुख – कार्याचा तपशिल – यांचा बेसबॉल हा खेळ असुन त्यांनी ज्युनिअर सीनीअर राष्ट्रीय बेसबॉल चॅम्पीयन, सिनिअर पुरुष  गट राज्यस्तर व राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा, राष्ट्रीय व राज्यस्तर शालेय बेसबॉल स्पर्धा मध्ये प्राविण्या प्राप्त करणारे अनेक खेळाडु घडविलेले आहेत. ते राष्ट्रीय विदयालय ज्यु. कॉलेज स्टेशन रोड चाळीसगाव जि. जळगाव येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

   (2) जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार पुरुष ( सॉफटबॉल) – कल्पेश ईश्वर जाधव – यांचा सॉफटबॉल हा खेळ असुन त्यांनी 6 वी एशीयन ज्युनिअर ) 19 वर्षातील) मेन सॉफटबॉल चांमपीयनशिप, ऑल इंडिया युनिव्‍हरसीटी  सॉफटबॉल स्पर्धा, वरीष्ठ राष्ट्रीय मेन सॉफटबॉल चांमपीयनशिप, कनिष्ठ राष्ट्रीय सॉफटबॉल चांमपीयनशिप, सीनिअर राज्यस्तर सॉफटबॉल चॅम्पीयनशिप स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त केलेले आहे. हा खेळाडू व जळगाव जिल्हयाचा रहिवासी आहे.

   3) जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार महिला ( सॉफटबॉल) शिवानी राजेंद्र देशमुख – यांचा सॉफटबॉल हा खेळ असुन त्यांनी सीनिअर राष्ट्रीय सॉफटबॉल चॅम्पीयनशिप, ज्युनिअर राष्ट्रीय सॉफटबॉल चॅम्पीयनशिप, सीनिअर राज्यस्तर सॉफटबॉल चॅम्पीयनशिप स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त केलेले आहे. हा खेळाडू जळगाव जिल्हयाची रहिवासी आहे.

   (4) जिल्हा गुणवंत खेळाडू थेट पुरस्कार (04 खेळाडू पात्र ठरलेले आहेत) शासन निर्णयातील नियम क्र. 6 मधील (V) आंतरराष्ट्रिय स्पर्धेत सहभागी खेळाडूस जिल्हा क्रीडा पुरस्कार थेट देण्यात यावा. असा पुरस्कार जादाचा समजण्यात यावा असे नमुद कलेले आहे. 1)चित्रा राजेद्र नाईक  (2)सुरभी मिलींद दर्प 

             (3) सई अनिल जोशी  - शासन निर्णयतील नियम क्र. 6 मधील (V) 1. मधील एशियन गेम्स या स्पर्धेचा समावेश आहे. ही खेळाडू  11 वी एशियन  वुमेन सॉफटबॉल चॅम्पीयनशिप तायवान  दि. 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2017 स्पर्धेत सहभागी  झालेली आहे. थेट पुरस्कारा साठी ती पात्र ठरलेली आहे.

(४) सुमेध प्रदिप तळवेलकर – शासन निर्णयातील नियम क्र. 6 मधील (V) मुद्दा क्र.5 मधील एशियन अजिंक्यपद स्पर्धा (वरीष्ट गट) या स्पर्धेचा समावेश आहे.  10 वी आशियाई मेन सॉफटबॉल चांम्पीयनशिप तायवान  दि. 23 ते 28 एप्रिल 2018 स्पर्धेत हा खेळाडू सहभागी  झालेला  आहे. हे थेट पुरस्कारा साठी ते पात्र आहे.

             सदर वरील जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थीना दि. 1 मे, महाराष्ट्र दिन 2022 रोजी पोलीस मुख्यालय जळगाव येथे होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमा प्रसंगी मा. पालकमंत्री महोदयांच्या शुभहस्ते पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

             सदर चारही पुरस्कारार्थीचे मा. अभिजीत राऊत जिल्हाधिकारी जळगाव तथा अध्यक्ष क्रीडा पुरस्कार समिती जळगाव  श्रीमती सुनंदा पाटील उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, नाशिक विभाग नाशिक, तथा सदस्य जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती जळगाव          श्री. प्रशांत राजाराम जगताप जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी सदस्य जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती जळगाव डॉ. प्रदिप प्रभाकर तळवेलकर शिवछत्रपती पुरस्कारार्थी सदस्य जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती जळगाव, श्री. मिलिंद दिक्षित जिल्हा क्रिडा अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती जळगाव श्रीमती सुजाता गुल्हाने क्रीडा अधिकारी जळगाव यांनी व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.  असे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

शालेय शिक्षण महाविदयालय क्लासेस तसेच प्रवासी वाहतूक व्यवस्था या ठिकाणी मुलींवर अत्याचार रोखण्यासाठी परिवहन विभागातर्फे उपाययोजना

        जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा)- शालेय शिक्षण, महाविदयालय, क्लासेस तसेच प्रवासी वाहतूक व्यवस्था या ठिकाणी मुलींवर अत्याचार रोखण्यासाठी परिवहन विभागाने उपाययोजना करणेबाबत संदर्भिय पत्राव्दारे निर्देश दिलेले आहेत.

          स्कूल बस नियमावलीमधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शालेय स्तरावर स्कूलबस परिवहन समिती नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. यासर्व शाळेतील परिवहन समितीमार्फत स्कूल बसमधून शालेय मुलींची सुरक्षितपणे वाहतूक होण्यासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी महिलाविषयक कायद्यांची माहिती सर्व शाळांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थीनींना द्यावी व याबाबत जनजागृती करावी.

          मुलींची ने- आण करीत असलेल्या 12 पेक्षा जास्त आसन क्षमता असलेल्या स्कूल बसमध्ये स्त्री सहवतींची नेमणूक करणे बंधनकारक असून, याबाबतची खातरजमा शिक्षण विभाग, परिवहन विभाग व पोलीस विभाग यांनी करावी तसेच सर्व स्कूलबस वाहतूकदार व शालेय व्यवस्थापक यांनी त्यांच्या स्कूल बसेसमध्ये महिला सहवतींची नेमणूक करावी.

          ऑटोरिक्षा, टॅक्सी व खाजगी बसेसमधुन महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व संबंधित वाहतूकदार संघटनांच्या पदाधिकारी यांनी त्यांच्या सर्व सदस्यांना महिला प्रवाशांना त्रास व अत्याचार होणार नाही यांबाबत विशेष काळजी घेण्याबाबत सूचना द्याव्यात

          ऑटोरिक्षा, टॅक्सी व खाजगी बसेसमधुन प्रवास करतांना वाहनधारकांकडून / चालकाकडून / वाहकाकडून महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात त्यांच्या विरुध्द पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात येतो. अशा चालकांची वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती व परवानाधारकाचे परवाना निलंबन / रद्द करण्याबाबतची कार्यवाही परिवहन कार्यालयामार्फत करण्यात येईल याबाबतची संबंधितांनी नोंद घ्यावी. स्कूलबस, ऑटोरिक्षा, टॅक्सी व खाजगी बसेसमधून  प्रवास करणाऱ्या महिलांना तक्रार करण्यासाठी महिला हेल्पालाईन्‍ 102 वर संपर्क साधावा,  असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

Thursday, 28 April 2022

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव वाहन कर पर्यावरण कर थकीत असलेल्या व स्क्रॅप वाहनाचा लिलाव

        जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) – सदर जाहिर नोटीस महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम, 1966 अन्वये नोंदणी तथा कराधान प्राधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारात जारी करण्यात येत आहे. सदर नोटीसीव्दारे वाहनमालकांना / ताबेदारांना / वित्तदात्यांना जाहिररित्या कर व दंड भरुन वाहने सोडवून घेण्याबाबत अवगत करण्यात येत आहे.

          या कार्यालयातील वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्हयाखाली  अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या  वाहन मालकांना त्यांच्य नोंदणीकृत पत्त्यावर पोचदेय डाकेने नोटीस पाठविण्यात आलेली आहे. मोटार वाहन कायदा कलम 1988 मधील तरतुदीनुसार वाहन मालकांनी पत्त्यातील बदल नोंदणी प्राधिकाऱ्यास कळविणे बंधनकारक असतांना देखील सदर वाहनांच्य मालकांनी या कार्यालयास तसे कळविलेले नाही. त्यासाठी ही जाहिर नोटी जारी करण्यात येत आहे.

          वाहनांच्या मालकांनी ताबेदारांनी  वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकापर्यंत कार्याल्यात थकीत कर पर्यावरण कर शासकीय दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन वाहने सोडवून घ्यावीत किंवा लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास दिनांक 28एप्रिल, 2022 पर्यंत लेखी हरकत घ्यावी. अन्यथा त्यांच्या वाहनांचा लिलाव दिनांक 29 एप्रिल, 2022 रोजी दुपारी 4.00 वाजता करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

          लिलाव करण्यात येणाऱ्या वाहनांची यादी वाहनांच्या प्रकरणानुसार नोटीसबोर्डाव्र चिकटविण्यात आलेली आहे. लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी एकूण 22 स्क्रॅप वाहनांकरीता डिमांड ड्राफट  बंद लिफाप्फयात दि. 29 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 12.00 वाजेपर्यंत कार्यालयात जमा कराव, धनाकर्ष (डिमांड ड्राफट) हा Dy RTO. Jalgaon { payable at SBI Main Branch,Jalgaon} या नावे अंदाजित 12 वाहनांच्या बोली रकमेचा सी.टी.एस. मानंकाप्रमाणे नाव नोदणी करुन या कार्यालयात उक्त दिवशी जमा करणे आवश्यक आहे. लिलावाकरिता एकदा जमा केलेला डीडी कोणत्याही कारणास्तव परत केला जाणार नाही यांची नोंद घ्यावी. सोबत शॉप ॲक्ट लायसन्स जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र व आधारकार्ड ची प्रत सादर करणे आवश्यक आहे.

          लिलावात सहभागी झालेल्या व्यक्तीसमोर लिलावाच्या दिवशी सर्वासमक्ष जमा झालेले बंद लिफफयातील डिमांड ड्रॉफट खुले करण्यात येतील ज्या व्यक्तीने सर्वाधिक कितीचा डिमांड ड्रॉफट जमा केलेला असेल त्याच खरेदीदारास ते वाहन लिलावाव्दारे विक्री करण्यात येईल.

          जाहिर लिलवाचे स्थळ – उप प्रादेशिक परिवहन कार्यालय – जळगाव दिनांक 29 एप्रिल, 2022 रोजी वेळ 4.00 वाजता जाहिर लिलाव करावयाचे ठिकाण, अटकावून ठेवलेल्या  वाहनाची यादी व स्थळ , लिलावाच्या अटी व शर्ती या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. कोणतेही कारण न देता जाहिर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी त्यांचेकडे राखून ठेवले आहे.

          वाहनांची यादी

(1)एमएच-19/बीजे-8634 - ऑटोरिक्षा (2) एमएच-19/बीजे-8597 - ऑटोरिक्षा (3) एमएच-19/जे-5425 – ऑटोरिक्षा (4) एमएच-19/एएस-1184 – ऑटोरिक्षा (5) एमएच-19/व्ही-0281 – ऑटोरिक्षा (6) एमएच-19/व्ही-6294 – ऑटोरिक्षा (7) एमएच-19/बीजे-8342 – ऑटोरिक्षा

(2)     (8) एमएच-19/व्ही-0287 – ऑटोरिक्षा (9) एमएच-19/जे-8502 – ऑटोरिक्षा (10) एमएच-19/जे-6839 – ऑटोरिक्षा (11) एमएच-19/8175 – ऑटोरिक्षा (12) एमएच-19/डीजी-8887 – ऑटोरिक्षा ( चूकीचा वाहन नोंदणी क्रमांक) असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

00000

 

 

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य पुणे विषय मुद्रांक शुल्काचे दंडाबाबत सवलत योजना

        जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा)- मुद्रांक शुल्क रक्कमेवर आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये सवलत देण्याचा शासनाचा मनोदय होता. त्यासाठी शासनाचे 1 एप्रिल, 2022 चे आदेशान्वये शास्तीच्या कपातीची योजना  जाहीर केली आहे. सदर योजना ही दिनांक 1 एप्रिल, 2022 ते 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत (आठ महिने) कार्यान्वित राहणार आहे.

          आतापर्यंत शासनामार्फत सन 1994-95, 1997, 1998, 2004 व 2019 मध्ये माफी योजना राबविण्यात आल्या आहेत. परंतु नव्याने आलेली माफी योजना ही, मुद्रांक शुल्काच्या त्रुटीच्या भागावर देय शास्तीच्या सवलतीसाठी जाहीर करण्यात आहे. या योजनेची ठळक वैशिष्टये पुढील प्रमाणे आहेत.

          सदर योजना ही अधिसुचनेसोबतच्या परिशिष्टामध्ये नमुद दस्तऐवजांवर उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची -1 च्या अनुच्छेदांतर्गत आकारणी योग्य असलेल्या मुद्रांक शुल्काच्या त्रुटीच्या भागावर उक्त अधिनियमाच्या कलम 31 च्या पोट –कलम 4 च्या खंड  (दोन), कलम 32अ च्या पेाट कलम 2 आणि पोट - कलम 4 च्या पहिल्या तरतुदीनुसार तसेच कलम 39 च्या पोट कलम 1 च्या खंड (ख) च्या तरतुदीनुसार लागू होणारी एकूण शास्ती ही, अटी व शर्तीच्या अधीन राहून, 10% पर्यंत कमी केली आहे. आणि दि. 1 एप्रिल, 2022 ते 31 जुलै, 2022 या कालावधीसाठी असून दिनांक 1 ऑगस्ट, 2022 ते 30 नोव्हेंबर, 2022 या कालावधीसाठी 50% कमी केली आहे. त्यापूर्वी निष्पादित करण्यात आलेल्या या नमुद संलेख तथा दस्तांनाच लागू असेल.

          या आदेशाखालील  उक्त कपात, ज्या प्रकरणी, चुकवेगिरीची किंवा अडकवून ठेवण्याची किंवा अभिनिर्णयाची कार्यवाही सुरु करण्यात आलेली असेल आणि ज्या प्रकरणी या अधिनियमाची कलमे 31, 32अ, 33, 33अ, 46, 53(1अ) व  53अ यांच्या तरतदी अन्वये 31 मार्च, 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पक्षकारावर किवा निष्पादकावर किमान एक नोटीस बजावण्यात आलेली आहे. अशा प्रकरणीच केवळ लागू असेल, तसेच या आदेशाखालील या कपात, ज्या प्रकरणी या अधिनियमाच्या तरतुदी अन्वये कोणत्याही प्राधिकरणासमोर किंवा  न्यायालयासमोर अपील किंवा पुनर्विलोकन किंवा पुनरिक्षण अर्ज प्रलंबित आहे अशा प्रकरणी देखील लागू असेल.

          सदर माफी योजना ही मुद्रांक तुट व शास्तीची वसूली सुरु आहे. अशा प्रकरणांना लागू करण्यात आली  आहे.

          ज्या प्रकरणात मुद्रांक चुकविल्याबाबत वसुलीची अथवा अभिनिर्णयाची कार्यवाही सुरु झाली आहे. अशा प्रकरणांना दंड सवलत योजना लागू करण्यात आली आहे. या माफी योजनेव्दारे विभागात सुरु असलेली दंड प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे कमी करुन मुद्रांक व नोंदणी  विभागाचा या कामकाजात जाण्याऱ्या वेळेत बचत करणे व न्यायालयीन प्रकरणे कमी करणे हा मानस आहे.

          या माफी योजनेत मुद्रांक शुल्कावरील दंड रक्कमेत सवलत दिली आहे. तथापि दस्तावरील मूळ मुद्रांक शुल्काच्या त्रुटीची पूर्ण रक्कम शासनजमा करणे बंधनकारक आहे.

          या योजनेचा लाभ घेतांना अर्जदारास विनाशर्त न्यायालीयन प्रकरण मागे घेणे बंधनकारक आहे.

          ज्या प्रकरणात विभागाने मुद्रांक शुल्क त्रुटीबाबत आदेश अंतिम केला आहे. अथवा नोटीस दिली आहे. त्या रकमेप्रमाणे मुद्रांक शुल्क तुट रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. त्यानंतर कोणतेही अपील अनुज्ञेय असणार नाही.

          याकरिता सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

                    राज्यातील ज्या प्रकरणात मुद्रांक शुल्क तूट व दंड रक्कम भरणा करणे प्रलंबित आहे. त्या सर्व प्रकरणात नागरिकांनी मुद्रांक व नोंदणी विभागाच्या कार्यालयात संपर्क करुन या दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

          या विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रकाशने परिपत्रक मुद्रांक अभय योजना या सदराखाली दिनांक 2 मार्च 2019 रोजीचा शासन आदेश नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल आहे. अधिक माहिती साठी मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात संपर्क साधावा, लवकरच ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, याबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाचे कॉल सेंटर वर 8888007777  व ईमेल आय डी complaint{at}igrmaharashtra{dot}gov{dot}in  यावर संपर्क साधावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग -२ जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदानावर

  

            जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते रविवार, दिनांक 1 मे, 2022 रोजी पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे सकाळी ठिक 8.00 वाजता होणार आहे.

          या कार्यक्रमास जिल्ह्यातील  स्वातंत्रसैनिक, राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील  यांनी केले आहे.

०००००

दिव्यांगाना देण्यात येणारे ओळखपत्र 21 मे पासून बंद होणार

        जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा)- समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव मार्फत दिव्यांगाना या कार्यालयाकडुन दिव्यांग ओळखपत्र देण्यात येत होते, परंतु अपंग व्यक्ती अधिनियम 2016 अन्वये 40 टक्के दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगाना सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे. त्या अनुषंगाने मा. कक्ष अधिकारी सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्र. 2019/ प्र.क्र.80/ दिनांक 13.मे.2019 व  मा. आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांचे पत्र क्र. 99 दिनांक 4 ऑगस्ट, 2019 महाव्यवस्थापक वाहतुक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे पत्र क्रमांक 4635 दिनांक 18 सप्टेंबर, 2019 नुसार अपंग व्यक्तीना वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) प्रकल्पातंर्गत देण्यात आलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र रा.प. महामंडळाव्दारे देण्यात येणाऱ्या सवलती करिता गा्रहय धरणे बाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वाहतुक भवन मुंबई यांना कळविण्यात आले आहे.

          तरी या कार्यालयामार्फत दिव्यांग ओळखपत्र हे दिनांक 11 मे, 2022 पासून बंद करण्यात येत आहे. त्यानंतर कोणत्याही दिव्यांगाना ओळखपत्र दिले जाणार नाही यांची नोंद घ्यावी, त्या व्यक्तीकडे या पुर्वीचे ओळखपत्र आहे ते मुदत असे पर्यंत ग्राहय धरण्यात यावे, ज्या दिव्यांग व्यक्ती कडे वैश्विक ओळखपत्र आहे. त्यावर बस सवलत व इतर सवलतीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 6वी च्या प्रवेशासाठी शनिवार 30 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता निवड चाचणी परीक्षा नियोजित

        जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा)- जिल्हयातील मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी वर्ग यांना सुचित करण्यात येते की जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 6 वी च्या प्रवेशासाठी शनिवार दिनांक 30 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता निवड चाचणी परीक्षा नियोजित करण्यात आली आहे. हया परीक्षेस जिल्हयातील इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या 11831 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरुन नोंदणी केलेली आहे. हया सर्व परीक्षार्थ्यांनी आपले प्रवेश पत्र डाउनलोड करुन घ्यावेत व आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाची सही व शिक्का घेवून प्रवेशपत्र परिक्षेस येतांना घेवून यावे,

          सदर प्रवेशपत्र परीक्षे दरम्यान पर्यवेक्षक जमा करुन घेतील. जर विद्यार्थ्यांना प्रवेश पत्राची प्रत हवी असल्यास झेरॉक्स कॉपी विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत ठेवावी. मुख्याध्यापकाची सही –शिक्का असलेले प्रवेशपत्र  दिनांक 30 एप्रिल, 2022 रोजी परीक्षा केंद्रावर जमा करणे अनिवार्य आहे. यांची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय साकेगाव ता. भुसावळ जि.जळगाव डॉ. आर.आर.खंडारे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००


 

वायुप्रदुषण तपासणी दरात वाढ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी : श्याम लोही

    जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) –सर्व नागरिक/ वाहनधारक यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाचे दिनांक 25 एप्रिल,2022 च्या निर्देशानुसार राज्यातील पी.यु.सी चाचणी दरामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे.

             वाहनाचे प्रकार – (1) दुचाकी वाहन – सध्याचे दर - 35- सुधारित दर  50

(2) पेट्रोलवरील तीनचाकी वाहन – सध्याचे दर- 70- सुधारित दर  100

(3) पेट्रोल/सीएनजी/एलपीजी वर चालणारे चारचाकी वाहन – सध्याचे दर -  90- सुधारित दर  - 125 (4) डिझेलवर चालणारे वाहन – सध्याचे दर -  110 सुधारित दर  -150  असे उप प्रादेशिक परिवहन अधकारी जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

Tuesday, 26 April 2022

सामाजिक न्याय विभागातर्फे वक्तृत्व व निंबध स्पर्धांचे आयोजन ३० एप्रिल पर्यंत भाषणाचे व्हिडीओ सादर करावेत … सहाय्यक आयुक्त समाज कल्याण - योगेश पाटील

 

       जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) :-  सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न       डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम दिनांक6 ते 16 एप्रिल, 2022 या कालावधीत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने वक्तृत्वास्पर्धा व निंबधस्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या करीता सहभाग घेणाऱ्या इच्छुक स्पर्धकांनी खाली दिलेल्या तपशिला नुसार भाषणाचे व्हिडीओ  सुस्पष्ट आवाजासह तसेच लेखी निबंध PDF स्वरुपात मोबाईल नं. 8668758663   या WhatsApp No  वर      दि. 30 एप्रिल,  2022 पर्यंत पाठवावेत तसेच स्पर्धकांनी व्हिडीओ पाठवितांना खालील माहिती देखील सोबत दयावी  – नाव, संपर्क क्रमांक, पत्ता, स्पर्धेचे नाव, स्पर्धेचा गट, विषय,

विषय नमूद करणे आवश्यक आहे.  सदर स्पर्धेत प्रत्येक  गटातून तीन स्पर्धेकांसाठी पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात येईल

          वक्तृत्व स्पर्धा- इ. 6 वी ते 8 वी- ( वेळ मर्यादा 3 मिनिंट)  1) मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलतोय    2) लोकशाहीत समतेचे महत्व इ. 9 वी ते 10 वी ( वेळ मर्यादा 5 मिनिट)

1)अरे माणसा माणसा कधी होशील माणूस  2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग -  इ. 11 वी ते 12 वी  (वेळ मर्यादा – 7 मिनिट)   

1) समतेचे हे तुफान ऊठवू   2) सामाजिक न्याय आणि समता, पदवी व पदवीत्तर ( वेळ मर्यादा – 9 मिनिट )

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत  2)   आधुनिक राष्ट्र उभारणी महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, शिक्षक व शिक्षकेत्तर –

( वेळ मर्यादा – 10 मिनिट )

1) गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी 2) समता: लोकशाहीतील महत्व, दशा आणि दिशा

2) निबंध स्पर्धा -  इ– 6 वी ते 8 वी- (350 शब्द)

 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचे विविध पैलु  2) महापुरुषांची गाऊ गाथा,  आदराने टेकवू माथा  - इ. 9 वी ते 10 वी  ( 500 शब्द)

1)समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर  2) मानवता हाच धर्म माणुसकी हीच जात -         इ.11 वी ते 12 वी  ( 700 शब्द)

1) समता : सामाजिक वास्तव एक चिंतन   2) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पदवी व पदवीत्तर ( 1000 शब्द,)

1)  घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2)  स्वातंत्र समता बंधुता : परस्पर संबंध,  शिक्षक व शिक्षकेत्तर – ( 1000 शब्द,

1) वर्ग, वर्ण, लिंग आणि जात: सामाजिक परिभाषा  2) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली सामाजिक समता… काल, आज आणि उद्या, 

          सदर स्पर्धेत प्रत्येक गटातून तीन स्पर्धेकांसाठी पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

Monday, 25 April 2022

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व सिस्को लाँचपॅडव्दारे स्टार्टअप आणि नाविन्यता आधारित ज्ञान या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

       जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत  स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत राज्यात नाविन्यपुर्ण कल्पनांना पाठिंबा देण्याचे उद्देशाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व सिस्को लाँचपॅड च्या सहकार्याने भारताच्या टेक्नोप्रेन्योरशिप मालिकेच्या महाराष्ट्र आवृत्तीचे आयोजन करण्यात येत आहे.

            या कार्यक्रमात सुरवातीच्या टप्प्यात तरुण विद्यार्थ्यांसाठी स्टार्ट –अप व्यवसाय उद्योजकतांसाठी आधारित ज्ञान सत्र, आणि तंत्रज्ञान आयोजित केले जाईल जेथे शिर्ष नवोदित आणि स्टार्ट – अप्सना त्यांच्या कल्पना संबंधित भागधारकांपर्यत पोहोचविण्यासाठी एक व्यासपीठ  मिळेल. ज्ञानसत्र उद्योग आणि पर्यावरणातील तज्ञांव्दारे दि. २५ ते २९ एप्रिल, २०२२ व दि. २ ते ६ मे,२०२२ या कालावधीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

          या उपक्रमाव्दारे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीव्दारा एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जेथे नवोदित आणि उद्योजकांना त्यांची कल्पना कशी तयार करावी. टिकवुन ठेवावी. विस्तारीत व्हावे आणि मोठे कसे करावे याचे ज्ञान दिले जाईल. तसेच या कार्यक्रमात उत्पासद विकास, डिझाइन विचार, तंत्रज्ञान व आर्थिक व्यवस्थापन व्यवसाय ज्ञानाचा एक भाग म्हणून निधी कसा उभारावा यासारख्या विस्तृत विषयांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातील उत्सुक उद्योजक, विद्यार्थी आणि सुरवातीच्या टप्प्यातील स्टार्ट-अप्सचे संस्थापक यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिका चौकशीसाठी  technopreneurship@cisco.com वर संपर्क करावा.

०००००

एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस व्याज रक्कमेत 50% सवलत

       जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळमार्फत लाभार्थीनी घेतलेल्या कर्ज प्रकरणांत संपुर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस व्याज रक्कमेत 50% सवलत देण्याबाबतची सुधारीत एकरक्कमी परतावा (OTS ) योजना राबविण्यात येत असुन दि. 31 मार्च, 2023 पर्यंत महामंडळाच्या  थकीत कर्जदारांनी या योजनेचा लाभ घेवून थकीत कर्ज भरुन मुक्त व्हावे, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी      डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, मायादेवी मदिरा समोर महाबळ दुरध्वनी      क्र. 0257-2261918 येथे संपर्क साधावा, असे आवाहन,  जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,  जिल्हा कार्यालय जळगाव यांच्याकडून  करण्यात आले आहे.

०००००

जिल्हयात ग्रामीण भागात 25 एप्रिल, 2022 ते 2 मे, 2022 पर्यंत राष्ट्रिय जतंनाशक मोहिम राबविण्यात येणार

       जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : जतंनाशकचा उच्चाटन करण्याच्या व्यापक उद्दिष्टांच्या भावनाने आपल्या जिल्हयात ग्रामीण भागात संस्था स्तरावर दि. 25 एप्रिल, 2022 रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन व दिनांक 29 एप्रिल, 2022 रोजी मॉपअप दिन शाळेत व अंगणवाडीत  जतंनाशक गोळया वाटप ) राबवयाचा असुन समुदाय स्तरावर दि. 25 एप्रिल, 2022 ते 2 मे, 2022 पर्यंत राष्ट्रिय जतंनाशक मोहिम राबविण्यात येणार आहे. असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००००

जिल्हाधिकारी कार्यालयात 2 मे रोजी लोकशाही दिन ऑनलाइन व ऑफलाईन होणार

             जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 2 मे, 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ऑनलाईन  तसेच ज्यांना ऑफलाईन सहभागी व्हायचे असेल त्यांचेकरिता ऑफलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आलेला आहे. सदर लोकशाही दिनी ज्या नागरिकांना अर्ज करावयाचा असेल त्यांनी आपला अर्ज (वैयक्तिक स्वरुपाचेच अर्ज)                               lokshahidinjalgaon@gmail.com ”  या ई-मेल आयडीवर पाठविण्यात यावा. सार्वजनिक स्वरुपाचे अर्ज सादर केल्यास ते प्रशासकीय अर्ज म्हणून ग्राहय धरण्यात येऊन लोकशाही दिनांत स्विकारले जाणार नाहीत.

          तसेच अर्जामध्ये Whatsapp no. नमुद करावे, जेणेकरुन सदर लोकशाही दिनाची link व  passward  अर्जदारास उपलब्ध करुन दिला जाईल. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                    00000


 

Friday, 22 April 2022

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी किसान भागीदारी प्राथमिकता हमारी मोहिमेचे आयोजन

        जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : - भारतीय स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सव वर्षातर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभाथ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी दि. २४ एप्रिल, २०२२ ते १ मे, २०२२ या कालावधीत किसन भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत प्राधान्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या मोहिमेचा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी       श्री अभिजीत राऊत यांनी केले आहे.

          राज्यात पी.एम.किसान नोंदणीकृत एकुण ११४.९३  लाख लाभार्थ्यापैकी ८१.३६ लाख लाभार्थी किसान क्रेडिट कार्ड धारक आहेत. राज्यात जवळपास ३३.५७ लाख पी.एम. किसान नोंदणीकृत लाभार्थी हे अद्यापही किसान क्रेडिट कार्ड धारक नाहीत. यासाठी दि.२४ एप्रिल, २०२२ रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पी.एम.किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. या विशेष ग्रामसभेत पी.एम.किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज देण्यात येतील.

          जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली किसान भागीदारी प्राथमिकता हमारी ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सहाकार, महसूल, ग्रामविकास, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विभाग, नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक या सर्व यंत्रणाच्या समन्वयाने माहिम राबविण्यात येईल.

          यानुसार सर्व संबंधित बँक किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्याच्या विहित कार्यपध्दतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत घेऊन १ मे, २०२२ पर्यंत त्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करण्याची कार्यवाही पूर्ण करतील यासाठी जिल्हा अग्रणी बँक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित सर्व बँकांनी योजनेतील लाभार्थ्यांना किंसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्याची आणि त्यांचे पी.एम.किसान योजनेचा लाभ मिळत असलेले बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी अधिकृत करुन घेण्यासठी संनियंत्रण करावे.

          प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा कंपन्यांचे जिल्हा व्य्वस्थापक व कृषि विभागाने २४ एप्रिल रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत पीकविमा योजनेविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात येईल. शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी २६ एप्रिल, २०२२ रोजी गावनिहाय पीक विमा पाठशाला चे आयोजन करण्यात येणार आहे.  या पाठशाळेमध्ये शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत सविस्तर माहिती देवून शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करुन सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करुन किसान भागीदारी प्राथमिकता हमारी मोहीम यशस्वी करावी. तसेच या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत  यांनी केले आहे.

          या अनुषंगाने संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करुन किसान  भागीदारी प्राथमिकता हमारी  मोहिम यशस्वी करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी आयोजीत केलेल्या सभेस नमुद सुचना निर्गमित केल्या आहेत. सदर सभेस डॉ. पंकज आशिया, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव (IAS) श्री. राहुल पाटील निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव, श्री. संतोष बिडवाई जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, श्री. श्रीकांत झांबरे विभागीय व्यवस्थापक, नाबार्ड श्री. अरुण प्रकाश, मुख्य व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक,       श्री. जितेद्र देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा बॅक व पशुसंवर्धन, मत्सयव्यवसाय, राष्टी्यकृत बॅकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. असे जिल्हा उपनिबंधक संहकारी संस्था जळगाव संतोष बिडवाई, यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

 

 

अनुसूचित जमातीच्या 7 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशसाठी 15 मे पर्यंत अर्ज सादर करावेत

           जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : - आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या एकलव्य निवासी पब्लिक स्कूल, पेठरोड नाशिक, पिंप्रीसद्योदिन ता.इगतपुरी नंदुरबार, अजमेर सौदाणे, बागलाण  मवेशी ता. अकोला व पिपंळनेर ता. साक्री जि.धुळे टिटव, डोगरसांगळी , चणकापुर, शिदेदिगर, धडगाव, अक्कलकुवा येथे सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वी मध्ये तसेच इयत्ता  7 वी ते 9 वी च्या वर्गांतील अनुशेष भरून काढण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दहिवद ता.अमळनेर जि.जळगाव व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गंगापूरी ता.जामनेर जि.जळगाव या दोन परिक्षा केंद्रांवर स्पर्धा परिक्षा रविवार 5 जून 2022 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेदरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे.

अनुसूचित जमातीचे जे विद्यार्थी 2021-2022 या चालू शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 5 वीत शिकत असून परिक्षेस प्रविष्ठ झालेले असून पुढील वर्षी इयत्ता 6 वी मध्ये आणि याच क्रमाने इयत्ता 7 वी ते 9 वी मध्ये प्रवेश घेणार असतील अशा इच्छूक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल याच्याकडे 15 मे,2022 पर्यंत अर्ज करावेत. अर्जाचा नमुना प्रकल्प कार्यालय, यावल तसेच संबंधित मुख्याध्यापक व सर्व गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती येथे उपलब्ध आहेत.

सदर परिक्षा शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व इतर मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेले इ. 5 वी पास ते 9 वी च्या विदयार्थ्यां करीता पूर्णत: खुली आहे. तथापी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक कमाल उत्पन्न रु. सहा लाखाच्या आत असावे. व पालक शासकीय व निमशासकीय नोकरीत नसावे अर्जा सोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला पालकांच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.

 अर्जा सोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला पालकांच्या वाष्रिक उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. अनुसूचित जमातीतील अपंग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 जागा आरक्षित राहतील. तरी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

कोविड -19 या आजारामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्रदान

        जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : - मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ४ ऑक्टोंबर,२०२१ रोजी दिलेल्या आदेशानुसार शासन निर्णय, महसुल व वनविभाग                  दि. २६ नोव्हेंबर, २०२१ अन्वये कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. ५०,०००/-  मात्र इतके सानुग्रह सहाय्य देण्याची योजना दि. ०१ डिसेंबर, २०२१ पासुन ऑनलाईन पध्दतीने कार्यान्वित करण्यात आली आहे.

      मा. सर्वोच्च न्यायालयाने  या प्रकरणी दिनांक – २४ मार्च, २०२२ रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन महसुल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक –सीएलएस-२०२१/ प्र.क्र-२५/म-३, दिनांक ११ एप्रिल, २०२२ अन्वये खालील प्रमाणे आदेश दिलेला आहे.

          कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास                रु. ५०,०००/-  इतके सानुग्रह सहाय्य देण्याच्या योजनेसाठी अर्ज करणेची मुदत पुढीलप्रमाणे राहील.

          कोव्हीड-१९ या आजारामुळे  दि. २० मार्च, २०२२ पुर्वी मृत्यु झालेला असल्यास   दिनांक – २४ मार्च, २०२२ पासून ६० दिवसाच्या आत म्हणजेच दि. २४ मे, २०२२ पर्यंत,  कोव्हीड-१९ या आजारामुळे  दि. २० मार्च, २०२२ पासुन पुढे मृत्यू झाल्यास मृत्युच्या दिनांकापासून ९० दिवसाच्या आत, या योजनेखाली अर्ज करणेसाठी  वर नमुद केलेल्या मुदतीच्या नंतरचे अर्ज केवळ गाऱ्हाणे निवारणे समिती (GRC) मार्फत करता येतील.

          या योजनेकरीता ज्या अर्जदारांनी सानुग्रह सहाय्यासाठी चुकीचा दावा दाखल केलेला आहे. त्यांच्याविरुध्द जिल्हा आपत्ती व्यपस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या कलम ५२ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००००

वैरणीकरिता शेवगा लागवडीसाठी अनुदान उपलब्ध

        जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : - केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवड करणे (अनुसूचित जाती उपयोजना) या योजने करिता प्रती हेक्टर रु. ३० हजार प्रती लाभार्थी अनुदान उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

            सदर योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी १५ हेक्टर  क्षेत्राकरिता ४.५ लक्ष निधी वितरीत करण्यात आलेला आहे.  सदर योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी / पशुपालकांना वैरणीकरिता शेवगा लागवड करण्यासाठी अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. प्रती हेक्टर रु. ३०,०००/- अंतर्गत ७.५ किलो शेवगा ( पीकेएम-१ ) बियाणाची किंमत रु. ६७५०/- व उर्वरित अनुदान रु. २३,२५०/- हे दोन टप्प्यांमध्ये वितरीत करण्यात येणार आहे. बियाणाचा थेट पशुपालकांना पुरवठा करण्यात येणार असुन, उर्वरीत अनुदानात जमिनीची मशागत व लागवड, खतांची खरेदी व इतर अनुषंगिक खर्च करावयाचा आहे.

            सदर योजनेकरिता इच्छुक असणाऱ्या पशुपालक / शेतकरी यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिष्द, पशुधन विकास अधिकारी         ( विस्तार), पंचायत समिती आणि नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

Wednesday, 20 April 2022

दुचाकी वाहनांसाठी 27 एप्रिलपासून नवीन क्रमांकाच्या मालिकेस प्रारंभ

             जळगाव, (जिमाका) दि. 20 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांत परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी MH19DY-0001 to 9999  पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यांत येणार आहे.

             नवीन मालिकेस 27 एप्रिल, 2022 पासून सुरूवात होत आहे.  ज्या वाहनधारकांना आपल्या दुचाकी वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्या वाहनधारकांनी आपली मागणी  उप प्रादेशिक कार्यालय, जळगाव येथे 25 एप्रिल, 2022 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत सादर करावी.

            पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत वाहनधारकांनी शासकीय शुल्काचा डीडी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे नावे तसेच ओळखपत्र कार्यालयात सादर करावे. एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत 26 एप्रिल, 2022 रोजी सायंकाळी 4.00 वाजेपर्यत वाढीव शुल्काचा धनाकर्ष (डीडी) स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. 26 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वाजता लिफाफे उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश संबंधितांना परत करण्यात येतील याची सर्व संबंधित वाहनधारकांना नोंद घ्यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000

 

शेतकरी बांधवांनी बीटी कापसाच्या बियाण्यामध्ये परवानगी नसलेले वाणाची लागवड करु नये व बिना बिलाने खरेदी करु नये

                जळगाव, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा) : -शेतकरी बांधवाना आवाहन करण्यात येते की, बीटी कापसाच्या बियाण्यामध्ये परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशिल असणारे Transgenic Glyphosate / Herbicide Tolerant trait  वापरुन अनेक बोगस कंपन्या / व्यक्ती / संस्था कापूस बियाणे विकत आहे.

 एचटीबीटी या अवैध कापूस बियाण्यापासुन पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपीकता नष्ट  हेण्याचा धोका संभवत आहे. नागरीकांच्या अन्न्‍ सुरक्षेला असलेला धोका विचारात घेता, खरीप हंगाम २०२२ मध्ये कोणत्याही परिस्थीती शेतकरी बांधवांनी अशा वाणांची लागवड करु नये, तसेच या वाणाचे अवैधरीत्या व बिना बिलाने खरेदी करु नये. अशा कापुस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसुन आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. ०२५७- २२३९०५४ वर माहिती दयावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्व्ये कळविले आहे.  

 

०००००


 

Tuesday, 19 April 2022

केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

        जळगाव, दि.19 (जिमाका वृत्तसेवा) : - केंद्रीय मंत्री वाहतुक व रस्ते, भारत सरकार          ना.श्री. नितीन गडकरी हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा शुक्रवार दि. 22 एप्रिल, 2022 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

          शुक्रवार दि. 22 एप्रिल, 2022 रोजी दुपारी 3.15 वाजता धुळे येथुन विशेष विमानाने जळगावकडे प्रयाण, दुपारी  3.45 वाजता जळगाव विमानतळावर आगमन व प्रेसिडेंट कॉटेज रिसॉर्ट, एमआयडीसी  जळगाव कडे प्रयाण, दुपारी 4 ते 5  वाजता राखीव,  सायं. 5 ते 5.30 वाजता भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्या बरोबर संवाद स्थळ :- प्रेसिडेंट कॉटेज रिसॉर्ट, एमआयडीसी जळगाव. सायं 5.45 ते 6.45 वाजता जळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा स्थळ :- जी.एस. ग्राऊंड, जिल्हा कार्टासमोर, जिल्हापेठ जळगाव. सायं 7.15 वाजता जळगाव विमानतळ येथून विशेष विमानाने नागपुरकडे प्रयाण.

०००००

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भ.नि.नि खाते उतारे जि.प च्या संकेतस्थळावर उपलब्ध

        जळगाव, दि.19 (जिमाका वृत्तसेवा) : - जिल्हा  परिषद कर्मचऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे सन २०२०-२१ चे खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

          मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे कामकाज सोयीचे होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यावर अधिकाधिक भर दिला जात आहे. त्याच दृष्टीने भविष्य निर्वाह निधीचे उतारे वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांना १८ एप्रिल, २०२२ पासून जिल्हा परिषदेच्या  http://zpjalgaon.gov.in/ या संकेतस्थळावर जावून एका क्लिकवर हे उतारे बघता येणार आहेत. त्याची प्रिंटही काढता येणार आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी         राजेंद्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून सदर लेखे पूर्ण करण्यासाठी लेखाधिकारी  दिलीप वानखेडे, कनिष्ठ लेखाधिकारी किरण पराशर व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.  

          संबधित खाते उताऱ्यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास एक महिन्याच्या आत सबंधीत खाते प्रमुखा मार्फत अर्थ विभागाच्या भनिनि शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य लेखा

वित्त अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग यांचेमार्फत सामाजिक समता सप्ताह 6 ते 14 एप्रिल, 2022 या कालावधीत राबविण्यात आला

        जळगाव, दि.19 (जिमाका वृत्तसेवा) : - दि.06 ते 14 एप्रिल 2022 या कालावधीत सामाजिक समता सप्ताह निमित्त जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग जळगाव यांचेमार्फत राबविण्यात जात प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याबाबत येणाऱ्या अडचणी व त्यानुंषगिक माहिती संदर्भात  विशेष मोहिम राबविण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने खालील प्रमुख कार्यक्रम राबविण्यात आले. 

          मागासवर्गीय विद्वयार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्र मिळविणे सोपे व्हावे, त्यांना कोणताही त्रास होऊ नये तसेच वेळेत प्रमाणपत्र मिळावे जेणेकरुन त्यांचे भविष्यात नुकसान होणार नाही हा या सप्ताहाचा प्रमुख उ्ददेश  आहे.  या सामाजि‍क सप्ताहात तालुका स्तरावरील संबंधित महाविदयालयात  खालीलप्रमाणे कॅम्पचे आयोजन करण्यात आले. 

1.     त्रिमूर्ती पॉलीटेकनिक कॉलेज, पाळधी,ता.धरणगाव              दि. 08/04/2022

2.    मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, जळगाव             दि. 13/04/2022

3.    नूतन मराठा महाविदयालय, जळगाव                                 दि. 14/04/2022

4.   नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव              दि.14/04/2022

5.    एम.जे.कॉलेज, जळगाव                                                 दि. 16/04/2022 

         तसेच दिनांक – 12 एप्रिल, 2022 रोजी ऑनलाईन जिल्हयातील महाविदयालयाचे प्राचार्य, संबंधित लिपीक व विदयार्थी यांचे वेबिनारसुध्दा आयोजित करण्यात आलेले होते. या वेबिनारमध्ये मुख्यता विदयार्थ्याना जात पडताळणी अर्ज भरतांना येणाऱ्या प्रमुख अडचणी, त्यासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी व या सर्व प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. दिनांक 14 एप्रिल, 2022 रोजी जिल्हा नियोजन भवन, जळगाव येथे प्रतिनिधीक स्वरुपात मा.जिल्हाधिकारी महोदयांचे शुभहस्ते जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 

त्याचप्रमाणे दिनांक – 12 ते 14 एप्रिल, 2022 या कालावधीत जात पडताळणीचे   अर्जातील त्रृटीची पूर्तता करण्यासाठी विशेष मोहित राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये विदयार्थ्याना प्रत्यक्षात ज्या अडचणी येतात त्या समजावून सांगण्यात आल्या तसेच त्यांचे अर्जात ज्या तृटी आहेत त्या तृटींची वेळीच पूर्तता करण्याबाबतसुध्दा त्यांना आवाहन करण्यात आले. यामध्ये

दिनांक - 06 ते 16 एप्रिल, 2022 या दरम्यान राबविण्यात आलेल्या सामाजिक समता सप्ताहामध्ये विशेष बाब म्हणून तपासणी करुन 1237 इतके अर्ज वैध ठरविण्यात आले. मागील 5 महिन्यात 15000 वैधता प्रमाणपत्र समितीकडून ऑनलाईन निर्गमित करण्यात आले. 

               जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे जाहिर आवाहन.

            इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेले विदयार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यास इच्छूक असलेले विदयार्थी, प्राधान्याने विज्ञान शाखेतील विदयार्थी/सीईटी देणारे/डिप्लोमा तृतीय वर्षात शिकत असलेले विदयार्थ्यानी त्यांची जात पडताळणीची प्रकरणे दिनांक – 30 एप्रिल, 22 पर्यत सादर करावीत. अर्जामध्ये आपला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करावा, जेणेकरुन विदयार्थ्याना त्यांचे प्रकरण वैध झाल्याचा SMS मिळेल आणि जर काही त्रृटी असल्यास त्याबाबतची सुध्दा माहिती वेळीच ई-मेलवर प्राप्त होईल. तसेच प्रकरण ऑनलाईन सादर केल्यानंतर हार्डकॉपी 15 दिवसांचे आंत समिती कार्यालयास सादर करावी,  असे बी. यु. खरे संशोधन अधिकारी तथा सदस्यसचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००  

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्याबाबतची मोहीम सुरु

             जळगाव, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) : - केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याबाबतची मोहीम सुरू केली आहे. सदरची मोहीम ही भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षांतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून देशभर राबविण्यात येत आहे.

यासाठी "किसान भागीदारी प्राथमिकता हमारी" नावाची मोहीम दि. 24 एप्रिल, 2022 ते 1 मे, 2022 या कालावधीत देशभर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्राधान्याने प्रधानमंत्री  किसान सन्मान निधि योजनेच्या सर्व पात्र शेतक-यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) उपलब्ध करण्यात येतील.

राज्यात पी.एम.किसान नोंदणीकृत एकुण 114.93 लाख लाभार्थ्यांपैकी 81.36 लाख लाभार्थी किसान क्रेडिट कार्ड धारक आहेत.  राज्यात जवळपास 33.57 लाख पी.एम.किसान नोंदणीकृत लाभार्थी हे अद्यापही किसान क्रेडिट कार्ड धारक नाहीत. यासाठी दि. 24 एप्रिल, 2022 रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पी.एम.किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. या विशेष ग्रामसभेत पी.एम.किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज देण्यात येतील.

केंद्र शासनाने या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यप्रणाली (SOP) उपलब्ध करून दिलेली असून किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषि, पशुसंवर्धन , दुग्धविकास व मत्स्य विभाग, नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने करावयाची आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सदरची मोहिम राविण्यात येईल.

संबंधित सर्व बँक किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याच्या विहित कार्यपध्दतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत घेऊन दि. 01 मे, 2022 पर्यंत त्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करणेची कार्यवाही पुर्ण करतील. यासाठी जिल्हा अग्रणी बँक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित सर्व बँकांनी योजनेतील लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची आणि त्यांचे पी.एम.किसान योजनेचा लाभ मिळत असलेले बँक खाते आधार आधारीत पेमेंटसाठी अधिकृत करून घेण्यासाठी संनियंत्रण करावे असे निर्देश मा. आयुक्त  कृषि यांनी दिले आहेत.

तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा कंपन्यांचे जिल्हा व्यवस्थापक व कृषि विभाग हे  दि. २४ एप्रिल २०२२  रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत पीक विमा योजने विषयी शेतकऱ्यांना माहिती देतील. तसेच राज्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत भाग घ्यावा यासाठी दि. 26 एप्रिल 2022 रोजी गावनिहाय पीक विमा पाठशाला चे आयोजन करण्यात येत आहे. या पाठशाळेमध्ये शेतक-यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत सविस्तर माहिती देऊन शेतक-यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी निर्देश      

 मा. आयुक्त  कृषि यांनी दिले आहेत.

           या अनुषंगाने संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करून  किसान भागीदारी प्राथमिकता हमारी मोहीम यशस्वी करण्यासाठी मा. आयुक्त  कृषि यांनी सुचना निर्गमित  केल्या आहेत.असे उपायुक्त (कृषि गणना) तथा पथक प्रमुख पी.एम. किसान कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.            

                                          000000