Thursday, 28 April 2022

दिव्यांगाना देण्यात येणारे ओळखपत्र 21 मे पासून बंद होणार

        जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा)- समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव मार्फत दिव्यांगाना या कार्यालयाकडुन दिव्यांग ओळखपत्र देण्यात येत होते, परंतु अपंग व्यक्ती अधिनियम 2016 अन्वये 40 टक्के दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगाना सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे. त्या अनुषंगाने मा. कक्ष अधिकारी सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्र. 2019/ प्र.क्र.80/ दिनांक 13.मे.2019 व  मा. आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांचे पत्र क्र. 99 दिनांक 4 ऑगस्ट, 2019 महाव्यवस्थापक वाहतुक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे पत्र क्रमांक 4635 दिनांक 18 सप्टेंबर, 2019 नुसार अपंग व्यक्तीना वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) प्रकल्पातंर्गत देण्यात आलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र रा.प. महामंडळाव्दारे देण्यात येणाऱ्या सवलती करिता गा्रहय धरणे बाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वाहतुक भवन मुंबई यांना कळविण्यात आले आहे.

          तरी या कार्यालयामार्फत दिव्यांग ओळखपत्र हे दिनांक 11 मे, 2022 पासून बंद करण्यात येत आहे. त्यानंतर कोणत्याही दिव्यांगाना ओळखपत्र दिले जाणार नाही यांची नोंद घ्यावी, त्या व्यक्तीकडे या पुर्वीचे ओळखपत्र आहे ते मुदत असे पर्यंत ग्राहय धरण्यात यावे, ज्या दिव्यांग व्यक्ती कडे वैश्विक ओळखपत्र आहे. त्यावर बस सवलत व इतर सवलतीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment