जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) – राज्यातील शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे’ या योजनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
सन 2024-25 या वर्षात शेतकऱ्यांची निवड करताना किमान बारावी
उत्तीर्ण आणि वयोमर्यादा 25 ते 60 वर्षे अशी अट होती. मात्र, मा. आयुक्त कृषी
यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत शिक्षण आणि
वयोमर्यादा यासंबंधी अटी रद्द करण्यात आल्या आहेत.
योजनेअंतर्गत महिलांचे शेतीतील योगदान लक्षात घेता, सन
2025-26 या वर्षासाठी महिला शेतकऱ्यांना अभ्यासदौऱ्याकरिता प्राधान्य देण्यात
येणार आहे.
2024-25 मध्ये युरोप, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि थायलंड या
देशांची निवड अभ्यासदौऱ्यासाठी करण्यात आली होती. तर 2025-26 या आर्थिक वर्षात
युरोप, इस्राईल, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स आणि दक्षिण कोरिया या
देशांचा समावेश करण्यात आला आहे.
नवीन निकष व दौऱ्याचे देश बदलण्यात आले असल्यामुळे 2024-25
मध्ये करण्यात आलेली शेतकरी निवड रद्द करण्यात आली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांची
यापूर्वी निवड झाली होती, त्यांनी नव्याने अर्ज केल्यास आणि पात्र ठरल्यास
त्यांचाही विचार या योजनेंतर्गत केला जाणार आहे, असे तंत्र अधिकारी, कृषि
आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000000
No comments:
Post a Comment